शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

अनुदान देऊन खतांचे दर कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:30 IST

अंबाजोगाई : रासायनिक खतांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्य शासनाने खतांवर अनुदान देऊन खतांचे ...

अंबाजोगाई : रासायनिक खतांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्य शासनाने खतांवर अनुदान देऊन खतांचे दर कमी करावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष कालिदास आपेट यांनी केली आहे.

केंद्र सरकारने खतांचे दर ठरविण्याचे अधिकार संबंधित कंपन्यांना दिल्याने त्यांची मनमानी वाढली आहे. 'इफको'सह इतर खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा स्थितीत पिकांना खतांचा डोस द्यायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. एकीकडे खतांचे दर वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला खतांच्या काळ्या बाजारामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यातच लिकिंग ही व्यवस्था त्याच्या माथी मारली जात आहे. अशा अडचणीत शेतकरी अडकला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी शासनाने खतांवर विशेष अनुदान देऊन खतांचे दर कमी करावेत. शेतकऱ्याला शेती करत असतांना रासयनिक खतेही महत्त्वपूर्ण बाब बनली आहे. ऊस, सोयाबीन, गहू, ज्वारी, उडीद, मूग, मका, अशा सर्वच पिकांना डीएपी, युरिया व विविध खतांची सातत्याने गरज भासते. ज्या तुलनेत खतांचे भाव वाढले आहेत, त्या तुलनेत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. खतांचे वाढलेले भाव, महागडी बियाणे व मजुरीचे वाढलेले दर अशा स्थितीत उत्पादनखर्च निघणेही दुरापास्त होते. त्यात पुन्हा रासायनिक खतांचे वाढलेले भाव शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे आहेत. यासाठी राज्य सरकारने अनुदान देऊन खतांचे दर कमी करावेत, अशी मागणी कालिदास आपेट यांनी केली आहे.