शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पीक विम्यासाठी बीडमध्ये लाल वादळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:34 IST

बीड : खरीप हंगाम २०२० मध्ये झालेल्या नुकसानीपोटी पीक विम्याची रक्कम मिळावी म्हणून बीड जिल्हा अखिल भारतीय किसान सभेच्या ...

बीड : खरीप हंगाम २०२० मध्ये झालेल्या नुकसानीपोटी पीक विम्याची रक्कम मिळावी म्हणून बीड जिल्हा अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

२०२० च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्व पीक नुकसानीचे शासनाच्या महसूल विभागाने पीक पंचनामे केलेले आहेत. शेतकऱ्यांना मदतही मिळाली. मात्र जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असताना महसूल विभागाने केलेले नुकसानीचे पंचनामे गृहीत धरून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा देण्यात यावा. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना जाचक ठरणाऱ्या अव्यवहार्य अटी शर्तींचा फेरविचार करून त्या वगळून ही योजना शेतकऱ्यांना झालेल्या पीक नुकसानाची भरपाई मिळण्यास सुलभ करावी. आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने ही निदर्शने करण्यात आली. यावेळी किसान सभेचे नेते कॉ. ॲड. अजय बुरांडे, कॉ. दत्ता डाके,कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ. मोहन लांब आदीसह जिल्ह्यातील किसान सभेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------

पालकमंत्र्यांचे आश्वासन

आंदोलना दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. राज्य शासनाच्या वतीने

याबाबतीत लक्ष देऊन शेतकऱ्यांवर पीक विम्या संदर्भात अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.

---------

आंदोलनाने लक्ष वेधले

जिल्ह्याभरातून आलेले शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा झाल्यानंतर रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर शेतकऱ्यांच्या घोषणा व हातातील लाल झेंडे बीडकरांचे लक्ष वेधत होते.

300721\img_20210730_132243_14.jpg~300721\img_20210730_131327_14.jpg