शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

गोदाकाठावर ऊसाची विक्रमी लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:28 IST

राजेश राजगुरु तलवाडा : गेवराई तालुक्यातील शेतकरी यावर्षी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवडीकडे वळले असून बंधारे, कालव्याला सुटणाऱ्या पाण्यामुळे या ...

राजेश राजगुरु

तलवाडा : गेवराई तालुक्यातील शेतकरी यावर्षी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवडीकडे वळले असून बंधारे, कालव्याला सुटणाऱ्या पाण्यामुळे या भागात ऊसाचे विक्रमी क्षेत्र वाढले असले तरी कार्यक्षेत्रात साखर कारखाना मात्र एकच आहे. पुढच्या वर्षी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण होण्याची भीती मनात असतानाही ऊस लागवड सुरूच आहे.

गत काही वर्षांच्या चांगल्या पावसानंतर पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. गोदावरीवरील सर्वच बंधाऱ्यात पाणी साचल्याने गोदाकाठच्या विहिरी, बोअरच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. तसेच पैठणच्या उजव्या कालव्यातून वेळोवेळी पाणी सोडले जात असल्याने याचाही मोठा आधार शेतकऱ्यांना आहे. परिणामी यावर्षी जूनपर्यंत पाण्याचा म्हणावा असा तुटवडा जाणवणार नसल्याची आशा असल्याने, या भागातील शेतकरी ऊस लागवडीकडे वळले आहेत.

गेवराई तालुक्यातील अनेक गावांना गोदाकाठ लाभला असल्याने पाणी मुबलक आहे. यावर्षी कापसाचे पीक अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने शेतकऱ्यांनी लवकरच म्हणजे ऑक्टोबरपासूनच शेतकऱ्यांनी ऊस लागवडीस सुरुवात केली. ती आजपर्यंतही सुरूच आहे. ऊसाला मिळणारा दर, भरवशाचे उत्पन्न, कमी खर्चामुळे या पिकाकडे कल आहे. दोन वर्षांच्या अति पावसाने पाण्याचे बरेचसे स्रोत भरलेले आहेत. त्यामुळे तालुक्यातील सिंदफणा काठावरील गावे, उजव्या कालव्यावरील गावांसह कूपनलिका, विहिरीच्या पाण्याला पावसाने चांगला फरक पडल्याने तालुक्यात सगळीकडेच ऊस लागवड होत असल्याने ऊसाचे क्षेत्र प्रचंड प्रमाणावर वाढले आहे.

इतर पिकांवर शेतकऱ्यांचा भरोसाच नाय

कापसाला बोंडअळीचे संकट, तूर, बाजरी, ज्वारी, गहू याला मिळणाऱ्या अल्प दरासह कडधान्य पिकांचीही उत्पादन, दराची अवस्था बघता ऊस हे काही ना देते, या भावनेने शेतकरी ऊसाला प्राधान्य देत असल्याने ऊस लागवड वाढत आहे.

जयभवानीसह इतर कारखाने नेतात ऊस

तालुक्यात जयभवानी सहकारी साखर कारखाना हा एकमेव हक्काचा कारखाना आहे. या कारखान्यासह माजलगावच्या कारखान्यासह परजिल्ह्यातील औरंगाबाद येथील छत्रपती संभाजी राजे व पश्चिम महाराष्ट्रातील गंगामाई, केदारेश्वर, वृद्धेश्वर कारखानेही तालुक्यातील ऊस गाळपासाठी नेत आहेत. या कारखान्यांच्या भरवशावर शेतकरी आहे. पण पुढील वर्षी त्यांच्याच क्षेत्रात ऊसाची वाढ झाल्यास ते कितपत ऊस घेतात यावरही बरेचसे गणित अवलंबून आहे. तालुक्यातील जयभवानी सहकारी साखर कारखाना हा एकच कारखाना आहे.