शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

गोदाकाठावर ऊसाची विक्रमी लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:28 IST

राजेश राजगुरु तलवाडा : गेवराई तालुक्यातील शेतकरी यावर्षी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवडीकडे वळले असून बंधारे, कालव्याला सुटणाऱ्या पाण्यामुळे या ...

राजेश राजगुरु

तलवाडा : गेवराई तालुक्यातील शेतकरी यावर्षी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवडीकडे वळले असून बंधारे, कालव्याला सुटणाऱ्या पाण्यामुळे या भागात ऊसाचे विक्रमी क्षेत्र वाढले असले तरी कार्यक्षेत्रात साखर कारखाना मात्र एकच आहे. पुढच्या वर्षी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण होण्याची भीती मनात असतानाही ऊस लागवड सुरूच आहे.

गत काही वर्षांच्या चांगल्या पावसानंतर पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. गोदावरीवरील सर्वच बंधाऱ्यात पाणी साचल्याने गोदाकाठच्या विहिरी, बोअरच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. तसेच पैठणच्या उजव्या कालव्यातून वेळोवेळी पाणी सोडले जात असल्याने याचाही मोठा आधार शेतकऱ्यांना आहे. परिणामी यावर्षी जूनपर्यंत पाण्याचा म्हणावा असा तुटवडा जाणवणार नसल्याची आशा असल्याने, या भागातील शेतकरी ऊस लागवडीकडे वळले आहेत.

गेवराई तालुक्यातील अनेक गावांना गोदाकाठ लाभला असल्याने पाणी मुबलक आहे. यावर्षी कापसाचे पीक अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने शेतकऱ्यांनी लवकरच म्हणजे ऑक्टोबरपासूनच शेतकऱ्यांनी ऊस लागवडीस सुरुवात केली. ती आजपर्यंतही सुरूच आहे. ऊसाला मिळणारा दर, भरवशाचे उत्पन्न, कमी खर्चामुळे या पिकाकडे कल आहे. दोन वर्षांच्या अति पावसाने पाण्याचे बरेचसे स्रोत भरलेले आहेत. त्यामुळे तालुक्यातील सिंदफणा काठावरील गावे, उजव्या कालव्यावरील गावांसह कूपनलिका, विहिरीच्या पाण्याला पावसाने चांगला फरक पडल्याने तालुक्यात सगळीकडेच ऊस लागवड होत असल्याने ऊसाचे क्षेत्र प्रचंड प्रमाणावर वाढले आहे.

इतर पिकांवर शेतकऱ्यांचा भरोसाच नाय

कापसाला बोंडअळीचे संकट, तूर, बाजरी, ज्वारी, गहू याला मिळणाऱ्या अल्प दरासह कडधान्य पिकांचीही उत्पादन, दराची अवस्था बघता ऊस हे काही ना देते, या भावनेने शेतकरी ऊसाला प्राधान्य देत असल्याने ऊस लागवड वाढत आहे.

जयभवानीसह इतर कारखाने नेतात ऊस

तालुक्यात जयभवानी सहकारी साखर कारखाना हा एकमेव हक्काचा कारखाना आहे. या कारखान्यासह माजलगावच्या कारखान्यासह परजिल्ह्यातील औरंगाबाद येथील छत्रपती संभाजी राजे व पश्चिम महाराष्ट्रातील गंगामाई, केदारेश्वर, वृद्धेश्वर कारखानेही तालुक्यातील ऊस गाळपासाठी नेत आहेत. या कारखान्यांच्या भरवशावर शेतकरी आहे. पण पुढील वर्षी त्यांच्याच क्षेत्रात ऊसाची वाढ झाल्यास ते कितपत ऊस घेतात यावरही बरेचसे गणित अवलंबून आहे. तालुक्यातील जयभवानी सहकारी साखर कारखाना हा एकच कारखाना आहे.