शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

गोदाकाठावर ऊसाची विक्रमी लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:28 IST

राजेश राजगुरु तलवाडा : गेवराई तालुक्यातील शेतकरी यावर्षी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवडीकडे वळले असून बंधारे, कालव्याला सुटणाऱ्या पाण्यामुळे या ...

राजेश राजगुरु

तलवाडा : गेवराई तालुक्यातील शेतकरी यावर्षी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवडीकडे वळले असून बंधारे, कालव्याला सुटणाऱ्या पाण्यामुळे या भागात ऊसाचे विक्रमी क्षेत्र वाढले असले तरी कार्यक्षेत्रात साखर कारखाना मात्र एकच आहे. पुढच्या वर्षी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण होण्याची भीती मनात असतानाही ऊस लागवड सुरूच आहे.

गत काही वर्षांच्या चांगल्या पावसानंतर पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. गोदावरीवरील सर्वच बंधाऱ्यात पाणी साचल्याने गोदाकाठच्या विहिरी, बोअरच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. तसेच पैठणच्या उजव्या कालव्यातून वेळोवेळी पाणी सोडले जात असल्याने याचाही मोठा आधार शेतकऱ्यांना आहे. परिणामी यावर्षी जूनपर्यंत पाण्याचा म्हणावा असा तुटवडा जाणवणार नसल्याची आशा असल्याने, या भागातील शेतकरी ऊस लागवडीकडे वळले आहेत.

गेवराई तालुक्यातील अनेक गावांना गोदाकाठ लाभला असल्याने पाणी मुबलक आहे. यावर्षी कापसाचे पीक अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने शेतकऱ्यांनी लवकरच म्हणजे ऑक्टोबरपासूनच शेतकऱ्यांनी ऊस लागवडीस सुरुवात केली. ती आजपर्यंतही सुरूच आहे. ऊसाला मिळणारा दर, भरवशाचे उत्पन्न, कमी खर्चामुळे या पिकाकडे कल आहे. दोन वर्षांच्या अति पावसाने पाण्याचे बरेचसे स्रोत भरलेले आहेत. त्यामुळे तालुक्यातील सिंदफणा काठावरील गावे, उजव्या कालव्यावरील गावांसह कूपनलिका, विहिरीच्या पाण्याला पावसाने चांगला फरक पडल्याने तालुक्यात सगळीकडेच ऊस लागवड होत असल्याने ऊसाचे क्षेत्र प्रचंड प्रमाणावर वाढले आहे.

इतर पिकांवर शेतकऱ्यांचा भरोसाच नाय

कापसाला बोंडअळीचे संकट, तूर, बाजरी, ज्वारी, गहू याला मिळणाऱ्या अल्प दरासह कडधान्य पिकांचीही उत्पादन, दराची अवस्था बघता ऊस हे काही ना देते, या भावनेने शेतकरी ऊसाला प्राधान्य देत असल्याने ऊस लागवड वाढत आहे.

जयभवानीसह इतर कारखाने नेतात ऊस

तालुक्यात जयभवानी सहकारी साखर कारखाना हा एकमेव हक्काचा कारखाना आहे. या कारखान्यासह माजलगावच्या कारखान्यासह परजिल्ह्यातील औरंगाबाद येथील छत्रपती संभाजी राजे व पश्चिम महाराष्ट्रातील गंगामाई, केदारेश्वर, वृद्धेश्वर कारखानेही तालुक्यातील ऊस गाळपासाठी नेत आहेत. या कारखान्यांच्या भरवशावर शेतकरी आहे. पण पुढील वर्षी त्यांच्याच क्षेत्रात ऊसाची वाढ झाल्यास ते कितपत ऊस घेतात यावरही बरेचसे गणित अवलंबून आहे. तालुक्यातील जयभवानी सहकारी साखर कारखाना हा एकच कारखाना आहे.