परळी : मंगळवारी नागापूर वाण धरण क्षेत्रातील गावांमध्ये पाऊस झाल्याने धरणात पाण्याची पातळी दोन फुटांनी वाढली. शहरात ही मंगळवारी रात्री अकरा वाजल्यानंतर जोरात पाऊस झाला. वीजपुरवठादेखील खंडित झाला होता. परळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नागापूर येथील वाण धरणात मोसमीपूर्व पावसानेच दोन फुटांपर्यंत पाणीसाठा वाढला.
सध्या परळी शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे धरणात पाणीसाठा असूनही कृत्रिम पाणीटंचाई केली जात आहे. परळी नगर परिषदेने नागरिकांची गैरसोय दूर करीत परळी शहराला एक दिवसाआड पाणी सोडण्याची मागणी भाजप युवा नेते अश्विन मोगरकर यांनी केली आहे.
सुदैवाने यावर्षी जूनप्रारंभी वाण धरणात ३० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. येणारा मान्सून चांगला होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. ही आनंदाची बाब आहे. भविष्यकाळात पडणाऱ्या पावसाचे पाणी वाण धरण भरून अतिरिक्त पाणी वायाच जाणार आहे म्हणून परळी शहराला एक दिवसाआड पाणी सोडण्याची मागणी मोगरकर यांनी केली आहे.
फोटो : परळी शहरातील औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी झालेल्या पावसाचे पाणी साचून रस्त्याची अशी अवस्था झाली.
===Photopath===
020621\img20210602080435_14.jpg