शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

लॉकडाऊन संपले तरी रेल्वे बंदच; प्रवाशांच्या खिशाला बसतेय झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:44 IST

संजय खाकरे लोकमत न्यूज नेटवर्क परळी : कोरोना काळात लावण्यात आलेले लॉकडाऊन संपल्यामुळे हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. ...

संजय खाकरे

लोकमत न्यूज नेटवर्क

परळी : कोरोना काळात लावण्यात आलेले लॉकडाऊन संपल्यामुळे हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. परंतु परळी रेल्वे स्थानकामार्गे धावणाऱ्या दहा पॅसेंजर व दहा एक्स्प्रेस रेल्वे गाड्या अजूनही बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून खिशालाही झळ बसत आहे.

महामंडळाच्या बससेवा चालू झाल्या आहेत. परंतु बंद केलेल्या पॅसेंजर, एक्स्प्रेस रेल्वे सुरू न झाल्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. स्वस्त प्रवासी सेवा असलेल्या रेल्वे सेवेऐवजी महाग असलेल्या बस, ट्रॅव्हल्स पर्यायांचा प्रवाशांना नाईलाजाने वापर करावा लागत आहे. त्यामुळे गंगाखेड, परभणी, उदगीर, औरंगाबाद, हैदराबाद येथे कायम प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला जास्त झळ बसत आहे. पॅसेंजर रेल्वे लवकरात लवकर चालू झाल्या, तर प्रवासी व छोटे-मोठे व्यापारी यांचा वेळ व पैसाही वाचेल. एक्स्प्रेस रेल्वे गाड्या सुरू नसल्याने मुंबई, पुणे, नागपूर येथे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

....

परळीतून धावतात सहाच रेल्वे, प्रवासी संख्या वाढतेय

परळी रेल्वे स्थानकातून सध्या नांदेड - बंगळुरू, बंगळुरू - नांदेड, औरंगाबाद - हैदराबाद, हैदराबाद - औरंगाबाद, काकीनाडा-शिर्डी, शिर्डी - काकीनाडा या सहा रेल्वे धावत आहेत. या रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद चांगला आहे.

....

हैदराबाद, औरंगाबादला आरक्षण

परळी रेल्वे स्थानकातून औरंगाबाद - हैदराबाद, हैदराबाद - औरंगाबाद या रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे एक दिवस अगोदर आरक्षण करावे लागते, तर बाकी रेल्वे गाड्यांना सहज सीट उपलब्ध होत आहे.

...

वर्षभरापासून पॅसेंजर रेल्वे बंदच

परळी रेल्वे स्थानक मार्गे धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वे गाड्या २२ मार्च २०२० पासून बंदच आहेत. परळी-अकोला, अकोला-परळी, परळी-पूर्णा, पूर्णा-परळी, आदिलाबाद-परळी, परळी- आदिलाबाद, निजामाबाद-पंढरपूर, पंढरपूर-निजामाबाद, मिरज-परळी, परळी-मिरज या पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद आहेत. या पॅसेंजर रेल्वे गाड्या कधी सुरू होणार,असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर यांनी उपस्थित केला आहे. लवकरात लवकर बंद रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

.....

..या एक्स्प्रेस रेल्वेही बंदच

पनवेल-नांदेड, नांदेड-पनवेल, अमरावती-पुणे, पुणे-अमरावती, कोल्हापूर-नागपूर, नागपूर-कोल्हापूर, सिकंदराबाद-शिर्डी, शिर्डी-सिकंदराबाद, विजयवाडा-शिर्डी, शिर्डी-विजयवाडा या एक्स्प्रेस रेल्वे बंद आहेत. त्याही सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे. बंद रेल्वे गाड्या कधी सुरू करणार, यासंदर्भात अद्याप रेल्वे प्रशासनाकडून माहिती आली नसल्याचे येथील रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

...