शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

तीन कारखान्यातून १९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:35 IST

पुरुषोत्तम करवा माजलगाव : तालुक्यात मागील सहा महिन्यांपासून तीन साखर कारखान्यांमध्ये उसाचे सातत्याने गाळप सुरू असून, आतापर्यंत २१ ...

पुरुषोत्तम करवा

माजलगाव : तालुक्यात मागील सहा महिन्यांपासून तीन साखर कारखान्यांमध्ये उसाचे सातत्याने गाळप सुरू असून, आतापर्यंत २१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले. त्याद्वारे १९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादनही मिळवले. एवढ्या मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप करणारा माजलगाव तालुका हा मराठवाड्यात प्रथम आहे.

माजलगाव धरणामुळे संपूर्ण तालुका हा मागील वीस वर्षांपासून सुजलाम सुफलाम झाला आहे. तीस वर्षांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांनी तेलगाव येथे सहकारी साखर कारखाना उभारल्याने या भागातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी ऊस लागवड सुरू केली. त्यानंतर माजी आ. बाजीराव जगताप यांच्या पुढाकाराने छत्रपती सहकारी साखर कारखाना व नंतर डॉ. आर.जी. बजाज यांनी खासगी साखर कारखाना उभारून शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. माजलगाव तालुक्याच्या ऊस लागवडीवर तीन कारखाने अतिशय उत्तमरीत्या चालत असून, आजूबाजूच्या तालुक्यातील कारखानेदेखील या भागातील ऊस घेऊन जात आहेत. मागील दोन वर्षात माजलगाव तालुका व परिसरात चांगला पाऊस पडल्याने या भागात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली होती. यामुळे मागील सहा महिन्यापासून तीन कारखाने जोमाने उसाचे गाळप करत असून, आणखीन एक महिना गाळपासाठी लागेल एवढा ऊस शिल्लक आहे.

१८ एप्रिलपर्यंतची स्थिती

कारखाना गाळप (मे. टन) साखर उत्पादन (क्विंटल)

कै. सुंदरराव सोळंके सह. साखर कारखाना, ७ लाख ९४ हजार २०० ६ लाख २७ हजार ७७०

छत्रपती सहकारी साखर कारखाना ३ लाख ५७ हजार ७२० ३ लाख ५० हजार ८४५ क्विंटल

जय महेश शुगर्स ९ लाख १५ हजार १५४ ९ लाख १८ हजार ४०० क्विंटल

--------------

या तीन कारखान्यांनी २० लाख ६६ हजार ९७४ गाळप करत १८ लाख ९७ हजार १५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. माजलगाव तालुक्यातील तीन कारखाने आतापर्यंत २१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले. हे कारखाने आणखी महिनाभर चालतील व तीन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करतील, असा अंदाज या कारखान्यांकडून वर्तविला जात आहे. मराठवाड्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत माजलगाव तालुका गाळपात अग्रेसर राहिला आहे.

१५ मेपर्यंत चालणार गाळप

माजलगाव तालुका व कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक आहे. त्यामुळे कारखाने १५ मेपर्यंत चालतील, असा अंदाज आहे. यामुळे एकही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही.

- मोहन जगताप, उपाध्यक्ष, छत्रपती सहकारी साखर कारखाना

===Photopath===

190421\purusttam karva_img-20210310-wa0041_14.jpg