शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

तीन कारखान्यातून १९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:35 IST

पुरुषोत्तम करवा माजलगाव : तालुक्यात मागील सहा महिन्यांपासून तीन साखर कारखान्यांमध्ये उसाचे सातत्याने गाळप सुरू असून, आतापर्यंत २१ ...

पुरुषोत्तम करवा

माजलगाव : तालुक्यात मागील सहा महिन्यांपासून तीन साखर कारखान्यांमध्ये उसाचे सातत्याने गाळप सुरू असून, आतापर्यंत २१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले. त्याद्वारे १९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादनही मिळवले. एवढ्या मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप करणारा माजलगाव तालुका हा मराठवाड्यात प्रथम आहे.

माजलगाव धरणामुळे संपूर्ण तालुका हा मागील वीस वर्षांपासून सुजलाम सुफलाम झाला आहे. तीस वर्षांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांनी तेलगाव येथे सहकारी साखर कारखाना उभारल्याने या भागातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी ऊस लागवड सुरू केली. त्यानंतर माजी आ. बाजीराव जगताप यांच्या पुढाकाराने छत्रपती सहकारी साखर कारखाना व नंतर डॉ. आर.जी. बजाज यांनी खासगी साखर कारखाना उभारून शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. माजलगाव तालुक्याच्या ऊस लागवडीवर तीन कारखाने अतिशय उत्तमरीत्या चालत असून, आजूबाजूच्या तालुक्यातील कारखानेदेखील या भागातील ऊस घेऊन जात आहेत. मागील दोन वर्षात माजलगाव तालुका व परिसरात चांगला पाऊस पडल्याने या भागात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली होती. यामुळे मागील सहा महिन्यापासून तीन कारखाने जोमाने उसाचे गाळप करत असून, आणखीन एक महिना गाळपासाठी लागेल एवढा ऊस शिल्लक आहे.

१८ एप्रिलपर्यंतची स्थिती

कारखाना गाळप (मे. टन) साखर उत्पादन (क्विंटल)

कै. सुंदरराव सोळंके सह. साखर कारखाना, ७ लाख ९४ हजार २०० ६ लाख २७ हजार ७७०

छत्रपती सहकारी साखर कारखाना ३ लाख ५७ हजार ७२० ३ लाख ५० हजार ८४५ क्विंटल

जय महेश शुगर्स ९ लाख १५ हजार १५४ ९ लाख १८ हजार ४०० क्विंटल

--------------

या तीन कारखान्यांनी २० लाख ६६ हजार ९७४ गाळप करत १८ लाख ९७ हजार १५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. माजलगाव तालुक्यातील तीन कारखाने आतापर्यंत २१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले. हे कारखाने आणखी महिनाभर चालतील व तीन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करतील, असा अंदाज या कारखान्यांकडून वर्तविला जात आहे. मराठवाड्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत माजलगाव तालुका गाळपात अग्रेसर राहिला आहे.

१५ मेपर्यंत चालणार गाळप

माजलगाव तालुका व कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक आहे. त्यामुळे कारखाने १५ मेपर्यंत चालतील, असा अंदाज आहे. यामुळे एकही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही.

- मोहन जगताप, उपाध्यक्ष, छत्रपती सहकारी साखर कारखाना

===Photopath===

190421\purusttam karva_img-20210310-wa0041_14.jpg