शहरं
Join us  
Trending Stories
1
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
2
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
3
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
4
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
5
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
6
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
7
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
8
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
9
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
10
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
11
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
12
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
13
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
14
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
15
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
16
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
17
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
18
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
19
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
20
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
Daily Top 2Weekly Top 5

पालेभाज्यांचे दर घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:25 IST

अपघात वाढले अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. अनेक ...

अपघात वाढले

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. कामे करण्यासाठी ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळे होत आहे. तर रस्त्यावरील खड्डे चुकविताना लहान-मोठ्या अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. आजपर्यंत अनेकांना या खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागला.

कार्यालयात शुकशुकाट, नागरिक त्रस्त

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात अनेक कार्यालयांमध्ये कर्मचारी स्वत:च्या टेबलवर न बसता कार्यालय परिसरात जास्त प्रमाणात थांबलेले असतात. तर अनेक कर्मचारी बेपत्ता असल्याचे दिसून येत आहे. नागरिक आपल्या कामासाठी विविध शासकीय कार्यालयात हेलपाटे घालतात; मात्र त्यांना कर्मचारी भेटत नसल्याने आल्या पावली परत जाण्याची वेळ येते. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांंनी लक्ष द्यावे. अशी मागणी होत आहे.

पार्किंग नसल्याने वाहतुकीस अडचण

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील सावरकर चौक ते सायगाव नाका या मुख्य रस्त्यावर पार्किंगची सुविधा नसल्याने वाहतुकीस मोठे अडथळे निर्माण होतात. या मुख्य रस्त्यावर बँका, रुग्णालय यांची मोठी संख्या आहे. प्रत्येक ग्राहक बँकेत जाताना दुचाकी बाहेर लावतो. यामुळे या परिसरात वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होते. या परिसरात पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अभिजित जगताप यांनी केली आहे.

विनामास्क प्रवाशांनाही ऑटोरिक्षामध्ये प्रवेश

अंबाजोगाई : विनामास्क प्रवाशांनाही अ‍ॅाटो रिक्षामध्ये प्रवेश दिला जात आहे. पूर्वी मास्क असल्याशिवाय रिक्षाचालक प्रवाशांना अथवा ग्राहकांना रिक्षात बसू देत नव्हते;मात्र आता बेफिकीरी वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जोमाने असतानाही पुन्हा नो मास्क नो एंट्री ही मोहीम सुरू करून ग्राहकांना मास्कची सक्ती करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ देशमुख यांनी केली आहे.

कमी दाबाने वीजपुरवठा, शेतकरी त्रस्त

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात शेतीसाठी होणारा वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने सुरू आहे. कमी दाबाने वीजपुरवठा होऊ लागल्याने विद्युत पंप सुस्थितीत चालत नाहीत. ते सतत बंद पडत आहेत. महावितरणने ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करून पूर्ण क्षमतेने व मोठ्या दाबाने विद्युत पुरवठा उपलब्ध करून दिला तर सिंचनाची गैरसोय दूर होईल.