शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

सौताडा-जामखेड रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:36 IST

दोन दिवसांपासून धानोरा परिसरात पाऊस धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला. या पावसाने सर्वत्र ...

दोन दिवसांपासून धानोरा परिसरात पाऊस

धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला. या पावसाने सर्वत्र पाणीचपाणी झाले आहे. धानोरा परिसराला वरदान ठरणारा कांबळी प्रकल्प सलग दुस-या वर्षीही भरला आहे. यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. बुधवारी रात्री सावरगाव, शेडाळा, वेलतुरी, सुलेमानदेवळा परिसरात पाऊस झाल्याने कांबळी नदीला पुन्हा पूर आला होता.

...

सततच्या पावसाने कांदा पिकाचे नुकसान

धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस पडत आहे. या परिसरात शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर लाल कांद्याची लागवड केली आहे. मोलामहागाचे बियाणे आणून लागवड केली आहे. काहींनी कांदापेरणी केली आहे. परंतु, सततच्या पावसाने शेतात पाणी साठून कांदारोपे पिवळी पडून सडली आहेत. यामुळे कांद्याच्या उत्पादनात घट होण्याची चिन्हे आहेत. तरी, या परिसरातील कांदा पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.

...

अतिपावसाने कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव

धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरात यंदा कपाशीची लागवड कमी झाली आहे. यंदा शेतक-यांनी कांदा, तूर पिकांवर भर दिला आहे. परंतु, कांदापीकही पिवळे पडले आहे. कपाशीही सततच्या पावसाने खराब झाली आहे. कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र आहे. यामुळे यंदा कपाशीच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची चिन्हे आहेत. पर्यायाने याचा फटका शेतक-यांंना बसणार आहे.

...

दादेगाव-भोजेेवाडी रस्त्यावर खड्डेच खड्डे

धानोरा : आष्टी तालुक्यातील दादेगाव-भोजेवाडी रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे गेल्या दहा वर्षांपूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून काम झाले होते. परंतु, यंदा झालेल्या जोरदार पावसाने या रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. याचा दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना त्रास होत आहे. तरी, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी. अन्यथा, आंदोलनाचा इशारा परिसरातील नागरिकांंनी दिला आहे.

...

कांबळी नदीला पूर, वागजाई वस्तीचा संपर्क तुटला

धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरात सावरगाव, गंगादेवी, भोजेवाडी, सुलेमानदेवळा, कारखेल परिसरात बुधवार, गुरुवारी झालेल्या पावसाने कांबळी नदीला पूर आला होता. या पावसाने भोजेवाडी येथील तलाव भरला असून हिवरा येथील चव्हाणवस्ती, वागजाईवस्तीचा गेल्या तीन, चार दिवसांपासून संपर्क तुटला आहे. तरी, हिवरा-दादेगाव रस्त्यावर कांबळी नदीवर पूल उभारावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.