शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सौताडा-जामखेड रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:36 IST

दोन दिवसांपासून धानोरा परिसरात पाऊस धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला. या पावसाने सर्वत्र ...

दोन दिवसांपासून धानोरा परिसरात पाऊस

धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला. या पावसाने सर्वत्र पाणीचपाणी झाले आहे. धानोरा परिसराला वरदान ठरणारा कांबळी प्रकल्प सलग दुस-या वर्षीही भरला आहे. यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. बुधवारी रात्री सावरगाव, शेडाळा, वेलतुरी, सुलेमानदेवळा परिसरात पाऊस झाल्याने कांबळी नदीला पुन्हा पूर आला होता.

...

सततच्या पावसाने कांदा पिकाचे नुकसान

धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस पडत आहे. या परिसरात शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर लाल कांद्याची लागवड केली आहे. मोलामहागाचे बियाणे आणून लागवड केली आहे. काहींनी कांदापेरणी केली आहे. परंतु, सततच्या पावसाने शेतात पाणी साठून कांदारोपे पिवळी पडून सडली आहेत. यामुळे कांद्याच्या उत्पादनात घट होण्याची चिन्हे आहेत. तरी, या परिसरातील कांदा पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.

...

अतिपावसाने कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव

धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरात यंदा कपाशीची लागवड कमी झाली आहे. यंदा शेतक-यांनी कांदा, तूर पिकांवर भर दिला आहे. परंतु, कांदापीकही पिवळे पडले आहे. कपाशीही सततच्या पावसाने खराब झाली आहे. कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र आहे. यामुळे यंदा कपाशीच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची चिन्हे आहेत. पर्यायाने याचा फटका शेतक-यांंना बसणार आहे.

...

दादेगाव-भोजेेवाडी रस्त्यावर खड्डेच खड्डे

धानोरा : आष्टी तालुक्यातील दादेगाव-भोजेवाडी रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे गेल्या दहा वर्षांपूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून काम झाले होते. परंतु, यंदा झालेल्या जोरदार पावसाने या रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. याचा दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना त्रास होत आहे. तरी, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी. अन्यथा, आंदोलनाचा इशारा परिसरातील नागरिकांंनी दिला आहे.

...

कांबळी नदीला पूर, वागजाई वस्तीचा संपर्क तुटला

धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरात सावरगाव, गंगादेवी, भोजेवाडी, सुलेमानदेवळा, कारखेल परिसरात बुधवार, गुरुवारी झालेल्या पावसाने कांबळी नदीला पूर आला होता. या पावसाने भोजेवाडी येथील तलाव भरला असून हिवरा येथील चव्हाणवस्ती, वागजाईवस्तीचा गेल्या तीन, चार दिवसांपासून संपर्क तुटला आहे. तरी, हिवरा-दादेगाव रस्त्यावर कांबळी नदीवर पूल उभारावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.