शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

गावात पिण्याचे पाणी कायम मिळण्यासाठी आराखडा तयार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:35 IST

ऋषिकेश यशोद : जलजीवन मिशनअंतर्गत बुधवारपासून तालुका पातळीवर प्रशिक्षण प्रतिनिधी : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पिण्याचे पाणी नळ ...

ऋषिकेश यशोद : जलजीवन मिशनअंतर्गत बुधवारपासून तालुका पातळीवर प्रशिक्षण

प्रतिनिधी : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पिण्याचे पाणी नळ जोडणीद्वारे पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत ७ ऑगस्टपर्यंत गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान राबविण्यात येणार आहे. पिण्याचे पाणी कायमस्वरुपी नळाने मिळण्यासाठी गाव आराखडा तयार करावा. या विशेष अभियानात जिल्हा, तालुका व गाव पातळीवर सर्वांनी सहभाग घेऊन पंधरवडा अभियान यशस्वीरित्या राबविण्याचे आवाहन जलजीवन मिशनचे राज्य अभियान संचालक डॉ. ऋषिकेश यशोद यांनी पत्राद्वारे केले आहे. पिण्याचे पाणी सर्वांना नळाने मिळण्यासाठी जलजीवन मिशन राज्य पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, डाटा एंट्री ऑपरेटर तसेच जिल्हा कक्षाच्या सनियंत्रण मूल्यमापन सल्लागार यांना गाव कृती आराखड्याबाबत ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामध्ये गाव कृती आराखडा मधील माहितीचे संकलन ,राबविण्याच्या प्रक्रिया ,कोबो टूलद्वारे माहिती अपलोड बाबत हे प्रशिक्षण आहे.

गाव कृती आराखडा पंधरवड्यात जिल्हा कक्षातील तज्ज्ञ सल्लागार तालुका पातळीवरील गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत उपअभियंता, शाखा अभियंता गावपातळीवर ग्रामसेवक, जलसुरक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी सहभाग घेऊन गाव कृती आराखडा अभियान यशस्वीरित्या राबविण्याचे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गिरी , ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रगुप्त सोनवणे यांनी केले आहे.

--------

आराखड्याची जबाबदारी गावांवरच

तालुका पातळीवर गटविकास अधिकारी २८ ते ३१ जुलै दरम्यान प्रशिक्षणाचे आयोजन करतील. यामध्ये गाव कृती आराखड्याबाबत सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पंप ऑपरेटर, आशा स्वयंसेविका, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे दोन प्रतिनिधींना प्रशिक्षण देतील. गाव कृती आराखडा निर्मितीची जबाबदारी ही गावांवरच देण्यात आली आहे.

-----

ग्रामसभेत मंजुरीसाठी विषय ठेवा

गाव पातळीवर १ ते ३ ऑगस्ट या कालावधीत गाव कृती आराखड्याच्या अनुषंगाने लागणारी माहिती कोबो टूल साधनांचा वापर करून संकलित करण्यात येईल तर ५ ते ७ ऑगस्टदरम्यान प्राप्त माहितीवरून गाव कृती आराखड्याची निर्मिती व गाव कृती आराखडा पडताळणी प्रक्रिया होणार आहे. १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये मंजुरीकरिता विषय कार्यक्रम पत्रिकेवर ठेवावा, असे डॉ. यशोद यांनी सूचित केले आहे.

-------------