शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

‘दंड भरू; पण बाहेर फिरू’; विनाकारण फिरणारे ५३६ जण पॉझिटिव्ह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन केलेले आहे. परंतु, तरीही काही लोक विनाकारण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन केलेले आहे. परंतु, तरीही काही लोक विनाकारण बाहेर फिरत आहेत. ‘दंड भरू; पण बाहेर फिरू’, अशी भूमिकाच काही लोकांनी घेतली आहे. अशा भटकणाऱ्यांना पकडून आरोग्य विभागाने ॲंटिजन चाचणी केली. आतापर्यंत बीड शहरात आठ ठिकाणी सहा हजार ५७० लोकांची चाचणी केली असता ५३६ जण पॉझिटिव्ह आढळले. याचा टक्का तब्बल ८.१५ एवढा आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. असे असले तरी प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजनांकडे काही लोक दुर्लक्ष करत आहेत. अशा लोकांनाच पकडून कोरोना चाचणी करण्याची मोहीम ३ मे रोजी सुरू केली. आतापर्यंत जिल्ह्यातील सहा हजार ५७० लोकांची चाचणी केली असता तब्बल ५३६ लोक पॉझिटिव्ह आढळले. याचा टक्का ८.१५ एवढा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक विनाकारण फिरत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दरम्यान, बीड शहरातील आठ विविध पथकांमध्ये डीएचओ डॉ.आर.बी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एच.डी. वाघमारे, बी.एस. सांगळे, बी.एस. जोशी, बी.सी.चव्हाण, महंमद जुनैद रऊफ, एस.एम.जाधव, व्ही.यू. कदम, एन.आर.पत्की कर्मचारी लोकांची कोरोना चाचणी करतात.

कारणे तीच, कोणाचा दवाखाना तर कोणाचा भाजीपाला जे लोक ग्रामीण भागातून बीड शहरात येत आहेत, त्यांची वेगळी कारण नाहीत. कोणी भाजीपाला घेऊन येत आहे तर कोणी दवाखान्यासाठी येत असल्याचे समोर आले आहे. त्यांचीही चाचणी केली जात आहे. जे लोक विरोध करतात, त्यांना पोलिसांच्या मदतीने आणून चाचणी केली जात आहे.

शहरात आठ ठिकाणी तपासणी

बीड शहरात आठ ठिकाणी आरोग्य विभागाने पथके तैनात करून चाचणी केली आहे. यात चऱ्हाटा फाटा, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सावता माळी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, बार्शी नाका, बशीरगंज चौक, महालक्ष्मी चौक यांचा समावेश आहे.