गेवराई : केवळ निवडणूक, राजकारणासाठी पक्ष संघटना मजबूत लागते, असे नाही, तर समाजकारण करतानासुद्धा पक्ष संघटनेची आवश्यकता भासते. कोरोनाच्या कठीण संक्रमण काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. पक्ष संघटना मजबूत करताना स्वतःची काळजी घ्या, स्वतःसह इतरांचेही लसीकरण करून घेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले.
गेवराई विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांनी आढावा बैठक घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा मराठवाड्यात सुरू आहे. बीड जिल्ह्यातील यात्रेचा प्रस्तावित दौरा रद्द झाला असला तरीही विजयसिंह पंडित यांनी गेवराई विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध सेल व फ्रंटचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांशी आढावा बैठकीच्या माध्यमातून संवाद साधला.
यावेळी व्यासपीठावर भाऊसाहेब नाटकर, बाबूराव जाधव, जगन पाटील काळे, जगन्नाथ शिंदे, कुमार ढाकणे, फुलचंद बोरकर, जालिंदर पिसाळ, सुनील पाटील, अब्दुल हन्नान, मोनिका खरात, विलास सोनवणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात बैठक आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमात सुनील पाटील, फुलचंद बोरकर, गजानन काळे, भाऊसाहेब माखले, राजेंद्र बरकसे, अॅड. स्वप्नील येवले आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा युवकचे उपाध्यक्ष शेख सलीम यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्य अहवाल सादर केला. सूत्रसंचालन सुधीर गाडे यांनी केले. मोनिका खरात यांनी आभार मानले.
010721\291701bed_6_01072021_14.jpg