शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
2
"मामला 'गंभीर' है..."! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
3
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
4
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
5
"त्या बाजूला फार बघू नका..., धोका आहे...!", भरसंसदेत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना नेमकं काय म्हणाले खर्गे?
6
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
7
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
8
VIRAL VIDEO : पाकिस्तानी व्लॉगरनं रशियन तरुणींना विचारला एक प्रश्न! त्यांनी जे उत्तर दिलं ऐकून फटक्यात झाला गप्प
9
१००% पर्यंत माफीची संधी! सीटबेल्ट, सिग्नल तोडणे यांसारख्या ट्रॅफिक चलनांवर मिळणार सूट! कसा करायचा अर्ज?
10
छोटा शेअर, मोठा धमाका, ज्यानं ₹१ लाख गुंतवले, त्याचं मूल्य आज झालं ₹८१ लाख; तुमच्याकडे आहे का?
11
विराटचा प्रोटीन बार, रोहितचा डाळ-भात! क्रिकेटर्सचं व्हायरल 'डाएट' सिक्रेट, मॅचमध्ये कशी मिळते एनर्जी?
12
मार्गशीर्ष भौम प्रदोष २०२५: मंगलदोष मुक्त, हनुमंत प्रसन्न; ‘असे करा’ शिवव्रत, शुभ-लाभ होतील!
13
५० वर्षांनी चतुर्ग्रही योग: ९ राशींना कल्पनेपलीकडे चौफेर लाभ; चौपट नफा-फायदा, मनासारखा काळ!
14
SMAT 2025 : दोन टी-२० सामन्यात नाबाद २१४ धावा! १८ वर्षीय मुंबईकराचा शतकी धडाका
15
परदेशी झगमगाट हवा होता, अन् झाली जैश-ए-मोहम्मदची कमांडर! डॉक्टर शाहीनची ३ निकाहानंतरही एक इच्छा अपूर्ण
16
500 km रेंज, टॉप क्लास फीचर्स; लॉन्चला एक दिवस बाकी; कशी आहे मारुतीची पहिली EV कार?
17
पराभवाच्या चर्चेने विरोधक संतप्त, नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेची आठवण करून दिली
18
पत्नीने PUBG खेळू दिले नाही, पतीने बायकोची हत्या केली; सहा महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न
19
उघडताच पूर्ण भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट प्रीमिअमवरुन बंपर लिस्टिंगची शक्यता, पाहा डिटेल्स
20
Renuka Chaudhary: चक्क श्वानाला घेऊन काँग्रेस खासदार संसदेत पोहचल्या; सत्ताधारी भाजपानं घातला गोंधळ, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अन्नत्याग आंदोलनात विविध संघटनांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:34 IST

अंबेजोगाई : १९ मार्च, १९८६ पासून देशात आणि राज्यात आजपर्यंत केलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांप्रकरणी सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसानपुत्रांच्या वतीने अंबेजोगाईत ...

अंबेजोगाई : १९ मार्च, १९८६ पासून देशात आणि राज्यात आजपर्यंत केलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांप्रकरणी सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसानपुत्रांच्या वतीने अंबेजोगाईत १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.

या वर्षी या अन्नत्याग आंदोलनात देशभरातील किसानपुत्र सहभागी होणारच आहेत, तसेच विदेशात गेलेली भारतातली मुले-मुलीही सहभागी होणार आहेत. ‘अन्नदात्याच्या सलामतीसाठी किसानपुत्रांचा अन्नत्याग’ हे या आंदोलनाचे साधे सूत्र आहे. अंबेजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या या अन्नत्याग आंदोलनात सातत्याने ज्येष्ठ नागरिक मंच, योगेश्वरी रोटरी क्लब, रोटरी क्लब ऑफ अंबेजोगाई सिटी, वकील संघ अंबेजोगाई, मराठी पत्रकार परिषद शाखा अंबेजोगाई, मानवलोक अंबेजोगाई, अक्षर मानव शाखा अंबेजोगाई, आधार माणुसकीचा, मसाप शाखा अंबेजोगाई, ज्येष्ठ नागरी मंच महिला आघाडी, हेमंत राजमाने बहुउदेशीय सेवाभावी संस्था, स्वाभिमानी संघटना अंबेजोगाई, शिवसेना तालुका शाखा अंबेजोगाई, बेटी बचाव अभियान, त्र्यंबक आसरडोहकर प्रतिष्ठान या व इतर संघटनांनी या आंदोलनात सहभागी होण्यास सहमती दर्शविली आहे. किसानपुत्रांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अमर हबीब, सुदर्शन रापतवार, वैजनाथ शेंगुळे, बालासाहेब कराड व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे या शेतकऱ्याने १९ मार्च, १९८६ रोजी सहकुटुंब आत्महत्या केली होती. ही शेतकऱ्यांची पहिली सहकुटुंब आत्महत्या मानली जाते. या घटनेपासून आजपर्यंत अव्याहतपणे शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालूच आहेत. आजपर्यंत शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी १९ मार्च रोजी अन्नत्याग आंंदोलनात किसानपुत्रांनी आपला राजकीय अभिनवेष बाजूला ठेवून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

शेतकरी आत्महत्यांना सरकारी धोरण जबाबदार आहे. कायदे करून ते धोरण राबविले जात आहे. सरकारे बदलली, पण धोरणे बदलले नाहीत. त्याच जाचक कायद्यांच्या बेड्यांत शेतकरी अडकलेला आहे. या धोरणांचा निषेध करण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून १९ मार्च रोजी सातत्याने अंबेजोगाईत हे अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे.