शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
3
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
4
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
5
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
6
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
7
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
8
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
9
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
10
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
11
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
12
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
13
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
14
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
15
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
16
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
17
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
18
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
19
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
20
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!

अन्नत्याग आंदोलनात विविध संघटनांचा सहभाग - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:33 IST

अंबाजोगाई : १९ मार्च, १९८६ पासून देशात आणि राज्यात आजपर्यंत केलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांप्रकरणी सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसानपुत्रांच्या वतीने अंबेजोगाईत ...

अंबाजोगाई : १९ मार्च, १९८६ पासून देशात आणि राज्यात आजपर्यंत केलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांप्रकरणी सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसानपुत्रांच्या वतीने अंबेजोगाईत १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. या वर्षी या अन्नत्याग आंदोलनात देशभरातील किसानपुत्र सहभागी होणारच आहेत, तसेच विदेशात गेलेली भारतातली मुले-मुलीही सहभागी होणार आहेत.

‘अन्नदात्याच्या सलामतीसाठी किसानपुत्रांचा अन्नत्याग’ हे या आंदोलनाचे साधे सूत्र आहे. अंबेजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या या अन्नत्याग आंदोलनात सातत्याने ज्येष्ठ नागरिक मंच, योगेश्वरी रोटरी क्लब, रोटरी क्लब ऑफ अंबेजोगाई सिटी, वकील संघ अंबेजोगाई, मराठी पत्रकार परिषद शाखा अंबेजोगाई, मानवलोक अंबेजोगाई, अक्षर मानव शाखा अंबेजोगाई, आधार माणुसकीचा, मसाप शाखा अंबेजोगाई, ज्येष्ठ नागरी मंच महिला आघाडी, हेमंत राजमाने बहुउदेशीय सेवाभावी संस्था, स्वाभिमानी संघटना अंबेजोगाई, शिवसेना तालुका शाखा अंबेजोगाई, बेटी बचाव अभियान, त्र्यंबक आसरडोहकर प्रतिष्ठान या व इतर संघटनांनी या आंदोलनात सहभागी होण्यास सहमती दर्शविली आहे. किसानपुत्रांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अमर हबीब, सुदर्शन रापतवार, वैजनाथ शेंगुळे, बालासाहेब कराड व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे या शेतकऱ्याने १९ मार्च, १९८६ रोजी सहकुटुंब आत्महत्या केली होती. ही शेतकऱ्यांची पहिली सहकुटुंब आत्महत्या मानली जाते. या घटनेपासून आजपर्यंत अव्याहतपणे शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालूच आहेत. आजपर्यंत शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी १९ मार्च रोजी अन्नत्याग आंंदोलनात किसानपुत्रांनी आपला राजकीय अभिनवेष बाजूला ठेवून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

शेतकरी आत्महत्यांना सरकारी धोरण जबाबदार आहे. कायदे करून ते धोरण राबविले जात आहे. सरकारे बदलली, पण धोरणे बदलले नाहीत. त्याच जाचक कायद्यांच्या बेड्यांत शेतकरी अडकलेला आहे. या धोरणांचा निषेध करण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून १९ मार्च रोजी सातत्याने अंबेजोगाईत हे अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे.