शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

अन्नत्याग आंदोलनात विविध संघटनांचा सहभाग - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:33 IST

अंबाजोगाई : १९ मार्च, १९८६ पासून देशात आणि राज्यात आजपर्यंत केलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांप्रकरणी सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसानपुत्रांच्या वतीने अंबेजोगाईत ...

अंबाजोगाई : १९ मार्च, १९८६ पासून देशात आणि राज्यात आजपर्यंत केलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांप्रकरणी सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसानपुत्रांच्या वतीने अंबेजोगाईत १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. या वर्षी या अन्नत्याग आंदोलनात देशभरातील किसानपुत्र सहभागी होणारच आहेत, तसेच विदेशात गेलेली भारतातली मुले-मुलीही सहभागी होणार आहेत.

‘अन्नदात्याच्या सलामतीसाठी किसानपुत्रांचा अन्नत्याग’ हे या आंदोलनाचे साधे सूत्र आहे. अंबेजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या या अन्नत्याग आंदोलनात सातत्याने ज्येष्ठ नागरिक मंच, योगेश्वरी रोटरी क्लब, रोटरी क्लब ऑफ अंबेजोगाई सिटी, वकील संघ अंबेजोगाई, मराठी पत्रकार परिषद शाखा अंबेजोगाई, मानवलोक अंबेजोगाई, अक्षर मानव शाखा अंबेजोगाई, आधार माणुसकीचा, मसाप शाखा अंबेजोगाई, ज्येष्ठ नागरी मंच महिला आघाडी, हेमंत राजमाने बहुउदेशीय सेवाभावी संस्था, स्वाभिमानी संघटना अंबेजोगाई, शिवसेना तालुका शाखा अंबेजोगाई, बेटी बचाव अभियान, त्र्यंबक आसरडोहकर प्रतिष्ठान या व इतर संघटनांनी या आंदोलनात सहभागी होण्यास सहमती दर्शविली आहे. किसानपुत्रांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अमर हबीब, सुदर्शन रापतवार, वैजनाथ शेंगुळे, बालासाहेब कराड व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे या शेतकऱ्याने १९ मार्च, १९८६ रोजी सहकुटुंब आत्महत्या केली होती. ही शेतकऱ्यांची पहिली सहकुटुंब आत्महत्या मानली जाते. या घटनेपासून आजपर्यंत अव्याहतपणे शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालूच आहेत. आजपर्यंत शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी १९ मार्च रोजी अन्नत्याग आंंदोलनात किसानपुत्रांनी आपला राजकीय अभिनवेष बाजूला ठेवून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

शेतकरी आत्महत्यांना सरकारी धोरण जबाबदार आहे. कायदे करून ते धोरण राबविले जात आहे. सरकारे बदलली, पण धोरणे बदलले नाहीत. त्याच जाचक कायद्यांच्या बेड्यांत शेतकरी अडकलेला आहे. या धोरणांचा निषेध करण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून १९ मार्च रोजी सातत्याने अंबेजोगाईत हे अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे.