शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:45 IST

अंबाजोगाई : कोरोना काळात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस पाहिजे त्या प्रमाणात वेळात येत नसल्याने खासगी प्रवासी वाहतूक वाढली आहे. ...

अंबाजोगाई : कोरोना काळात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस पाहिजे त्या प्रमाणात वेळात येत नसल्याने खासगी प्रवासी वाहतूक वाढली आहे. याचा फायदा घेत काळी-पिवळीसह ट्रॅव्हल्समध्ये जागेपेक्षा जास्त प्रवासी कोंबले जातात. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. या प्रकाराकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.

....

ऑटोरिक्षा चालक मदत अभावी अडचणीत

अंबाजोगाई : लॉकडाऊन काळातही ऑटोरिक्षा व्यवसाय सुरू झाला आहे. शहराच्या विविध भागात ऑटोरिक्षा उभ्या राहतात. मात्र सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे ऑटोरिक्षा व्यावसायिकांचा व्यवसाय संथगतीने सुरू आहे. शाळा महाविद्यालय बंद असल्याने व्यवसायावर मोठा परिणाम झालेला आहे. शासनाने रिक्षाचालकांना मदत करावी, अशी मागणी होत आहे.

.....

एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

अंबाजोगाई : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरू केला. या माध्यमातून पहिली ते पीजी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शुल्कामध्ये सवलत देऊन त्यांना दिलासा मिळावा, यासाठी निवेदन देण्यात आले. दरम्यान, शुल्काबाबत काही तक्रार असल्यास अपील करण्यासाठी विभागीय शुल्क नियामक समिती गठित करण्याच्या सूचना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

.....

संमिश्र वातावरणाचा नागरिकांना त्रास

अंबाजोगाई : कोरोना पाठोपाठ आता बदलत्या हवामानाचा फटका नागरिकांना बसू लागला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे संकट आटोक्यात आले आहे. या वातावरणामुळे आजारपणात वाढ होऊ लागली आहे. कधी ऊन तर कधी आभाळ अशा संमिश्र वातावरणाचा त्रास नागरिकांना होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

.....

अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण वाढले

अंबाजोगाई : शहरातील काही भागात अस्वच्छता निर्माण झाली आहे. या अस्वच्छतेमुळे डास व मच्छरांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक ठिकाणी तर रस्त्याच्या कडेलाच कचरा फेकून दिला जात असल्याचे दिसत आहे.

....

पीक कर्जासाठी शेतकरी बँकांमध्ये

अंबाजोगाई : तालुक्यातील विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये शेतकरी पीक कर्ज मागणीसाठी हजेरी लावत आहेत. खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकरी पेरणीच्या तयारीत आहेत. यासाठी बँकांकडून कर्ज मागणी होत आहे. जिल्हा बँक वगळता इतर कोणत्याही बँकेकडून पूर्ण क्षमतेने यंदा कर्ज देण्यात आलेले नसल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांचीही कर्जासाठी धावपळ होत आहे.

....

ग्रामपंचायतींनी घंटागाड्या सुरू कराव्यात

अंबाजोगाई : शहरालगतच्या घाटनांदूर, बरदापूर, जोगाईवाडी, मोरेवाडी परिसरात मोठ्या संख्येने रहिवासी वसाहती आहेत. नागरिकांची संख्या वाढत असताना येथील कचऱ्याची समस्याही पुढे येत आहे. कचरा वाहून नेण्यासाठी घंटागाड्या नसल्याने नागरिक येथील मोकळ्या जागा व रस्त्यांच्या कडेला कचरा टाकत आहेत. यामुळे रस्तेच कचरा कुंड्या बनल्या आहेत. या ग्रामपंचायतींना कचरा कुंड्या व घंटागाड्या देण्याची गरज आहे.

....

पावसाळ्यात सांभाळा गुरांचे आरोग्य

अंबाजोगाई : पावसाळ्यात जनावरांना होणारे आजार टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेऊन जनावरांचे आरोग्य सांभाळावे, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्रातील पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मुंडे यांनी दिला आहे. पावसाळ्यात जनावरांच्या खाद्यात बदल झाल्यामुळे पोटाचे विकार, आजार निर्माण होतात. पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला व इतर नुकतेच गवत उगवलेले असते. गवताची उंची जास्त नसल्याने जनावरांचे तोंड जमिनीला घासते व जखमा होतात. असे झाल्यास पशुपालकांनी त्वरित पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून उपचार करून घ्यावेत व आपले नुकसान टाळावे.