शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

खडकाळ माळरानात फुलवली संत्रीची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:29 IST

अविनाश कदम आष्टी : तालुक्यातील कडा येथील सुरेश कुंजीर व विजय कुंजीर या भावंडांनी रोजगारासाठी इतर ठिकाणी न ...

अविनाश कदम

आष्टी : तालुक्यातील कडा येथील सुरेश कुंजीर व विजय कुंजीर या भावंडांनी रोजगारासाठी इतर ठिकाणी न जाता, स्वतःच्या शेतातच पारंपरिकऐवजी आधुनिक पद्धतीने शेती करत, माळरानावरील साडेचार एकर जिरायती व खडकाळ जमिनीवरच संत्रीची बाग फुलविली आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी नेहमीच अडचणीत येत असून, त्यातच दुष्काळ हा तालुक्याच्या पाचवीलाच पुजलेला. रोजगाराच्या निमित्ताने आष्टी तालुक्यातील युवक, नागरिक हे महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील अनेक भागांत पाहावयास मिळतात, परंतु कडा येथील कुंजीर बंधुंनी शेतीमध्ये काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास घेत फळबागेत रमणे पसंत केले. वर्षभरापासून कोरोनामुळे सी व्हिटॅमिनच्या फळांना मोठी मागणी आहे. एरव्हीही सीट्रस फ्रुटला मागणी असते. ही बाब ओळखून कुंजीर यांनी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांचे मार्गदर्शन घेत संत्री बाग उभारली. कुंजीर बंधूंनी तीन वर्षांपूर्वी नगर जिल्ह्यातील वाळकी येथील नर्सरीतून संत्रीची बाराशे रोप खरेदी केले. वेळोवेळी शेणखताचा वापर आणि फवारणी केली. कमी पाण्यावर ठिबक सिंचनाद्वारे किमया साधली. वातावरणातील बदल, निसर्गाचा लहरीपणा, तसेच शेतमालाचे सतत कोलमडणारे भाव, यामुळे शेतीसाठी केलेला खर्च निघणे ही अवघड होतो. कधी-कधी उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्याने अनेकदा शेतकरी खचून जातो. अशा कठीण परिस्थितीवर मात करीत कुंजीर बंधुंनी झाडे जोपासली आहेत.

शेततळे, मत्स्यपालनही

आजपर्यंत बागेसाठी एकरी वार्षिक दीड ते दोन लाखाचा खर्च केल्याचे विजय कुंजीर यांनी सांगीतले. भविष्यात पाण्याची टंचाई येऊ नये, म्हणून कुंजीर यांनी वीस-वीस गुंठ्यात दोन शेततळे करून त्यामध्येच विहिरीचे पाणी साठविले आहे. शेतीला जोड व्यावसाय म्हणून बंधुंनी याच शेततळ्यात मत्स्यपालनही केले आहे.

४० लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा

प्रत्येक झाडाला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. शेतात संत्री बागेसोबतच आंबा, पेरू, चिकू, सीताफळ, जांभूळ, नारळ इत्यादी फळझाडेही लावली आहेत. बाजारात प्रतिकिलो शंभर रुपये भाव मिळाला, तर पस्तीस ते चाळीस लाखांचे उत्पन्न एकाच वर्षात मिळेल, अशी अपेक्षा कुंजीर बंधुंना आहे.

कडा येथील सुरेश आणि विजय कुंजीर भावंडाने खडकाळ जमिनीवर संत्री बाग जोपासली आहे. पाण्याची टंचाई जाणवू नये, म्हणून शेततळे उभारून व्यवस्था केली आहे.

===Photopath===

250421\img-20210409-wa0410_14.jpg~250421\img-20210409-wa0409_14.jpg