शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत २०१ पैकी फक्त ८६ प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:31 IST

बीड : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेद्वारे १० डिसेंबर २०१९ ते ९ डिसेंबर २०२० या कालावधीत शेतकरी अपघात ...

बीड : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेद्वारे १० डिसेंबर २०१९ ते ९ डिसेंबर २०२० या कालावधीत शेतकरी अपघात प्रकरणाचे २०१ प्रस्ताव कंपनीकडे पाठवण्यात आले होते. मात्र, त्यापैकी फक्त ८६ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तर, ११५ प्रस्ताव अद्याप धूळखात कंपनीकडे पडले आहेत. विशेष म्हणजे विमा कंपनीचा कार्यकाळ संपून ५ महिने उलटले आहेत. तरी देखील प्रस्तावासंदर्भात निर्णय झालेला नाही.

शेतात काम करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, संर्पदंश, विंचूदंश, विजेच्या तिव्र धक्क्याने मृत्यू, तसेच वाहन अपघात व इतर कोणत्याही कारणांमुळे होणारे मृत्यू व येणारे कायमचे अपंगत्व त्यामुळे शेतकरी कुटुंबाला मोठा धक्का बसतो. तसेच घरातील कर्ता व्यक्तीच्या झालेल्या अपघातामुळे उत्पन्नाचे साधन अचानक बंद होऊन आर्थिक परिस्थिती डबघाईला येते. या अपघातग्रस्त कुटुंबांना आधार देण्यासाठी भाजप शासन काळात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु करण्यात आली आहे.

योजनेच्या डिसेंबर २०१९ ते डिसेंबर २०२० या कालावधीत २०१ प्रस्ताव कृषी विभागाकडे आले होते. त्यानुसार कृषी विभागाने जायका इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.नागपूर व दि युनिव्हर्सल कंपनी लिमिटेड यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवले होते. मात्र, कार्यकाळ संपल्यानंतर देखील यामधील फक्त ८६ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तर, ११ प्रस्ताव नाकारण्यात आले आहेत. तसेच ४४ प्रस्तावांमध्ये कंपनीला त्रुटी आढळली आहे. ६० प्रस्ताव कंपनीचा कार्यकाळ संपल्यानंतर देखील मंजुर करण्यासाठी प्रलंबित आहेत. त्यामुळे हे प्रस्ताव कधी मंजूर होणार असा सवाल प्रस्ताव दाखल केलेल्या शेतकरी कुटुंबांकडून विचारला जात आहेत.

यांना आहे विमा संरक्षण

शेतकरी कुटुंबातील वहितीधारक शेतकरी, तसेच त्याची पत्नी किंवा मुलगा अथवा अपविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक अशा दोन जणांसाठी ही योजना वर्षभर लागू असणार आहे. या कालावधीत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख रुपये, अपघातामुळे दोन अवयव निकामी झाल्यास २ लाख रुपये तर, अपघातामुळे एक डोळा निकामी झाल्यास २ लाख तसेच एक अवयव निकामी झाल्यास १ लाख रुपये अनुदान देण्यात येते. यासाठी कृषी विभागामार्फत अर्ज करावा लागतो.

कार्यकाळ संपल्याने नवीन कंपनी

१०२९-२०२० करीता जायका इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.नागपूर व दि युनिव्हर्सल कंपनी लिमिटेड या विमा कंपनीला राज्याने ३.०४ कोटी शेतकरी व कुटुंबातील एक सदस्य यांच्या विम्यापोटी ९८ कोटी रुपये ५ लाख ८३४ रुपये भरले होेत. त्या तुलनेत प्रस्ताव मंजुर करण्याचे प्रमाणा मात्र, अत्याल्प आहे. तर, या कंपनीचा कार्यकाळ देखील संपला असून, ०७ एप्रिल २०२१ ते ०६ एप्रिल २०२२ या वर्षाकरीता युनिव्हर्सल सोंपो जनरल इन्शुरंन्स कंपनी लि. या कंपनीमार्फत तर, मे. ऑक्झिनियम.इन्शुरंन्स ब्रोकर्स प्रा.लि.नवी मुंबई या विमा सल्लागार कंपनीमार्फत संपुर्ण राज्यात राबवण्यात येत आहे. या कंपनीकडे आतापर्यंत ५३ प्रस्ताव दाखल झाले असून, अद्याप एकही मंजूर करण्यात आलेला नाही.