शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत २०१ पैकी फक्त ८६ प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:31 IST

बीड : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेद्वारे १० डिसेंबर २०१९ ते ९ डिसेंबर २०२० या कालावधीत शेतकरी अपघात ...

बीड : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेद्वारे १० डिसेंबर २०१९ ते ९ डिसेंबर २०२० या कालावधीत शेतकरी अपघात प्रकरणाचे २०१ प्रस्ताव कंपनीकडे पाठवण्यात आले होते. मात्र, त्यापैकी फक्त ८६ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तर, ११५ प्रस्ताव अद्याप धूळखात कंपनीकडे पडले आहेत. विशेष म्हणजे विमा कंपनीचा कार्यकाळ संपून ५ महिने उलटले आहेत. तरी देखील प्रस्तावासंदर्भात निर्णय झालेला नाही.

शेतात काम करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, संर्पदंश, विंचूदंश, विजेच्या तिव्र धक्क्याने मृत्यू, तसेच वाहन अपघात व इतर कोणत्याही कारणांमुळे होणारे मृत्यू व येणारे कायमचे अपंगत्व त्यामुळे शेतकरी कुटुंबाला मोठा धक्का बसतो. तसेच घरातील कर्ता व्यक्तीच्या झालेल्या अपघातामुळे उत्पन्नाचे साधन अचानक बंद होऊन आर्थिक परिस्थिती डबघाईला येते. या अपघातग्रस्त कुटुंबांना आधार देण्यासाठी भाजप शासन काळात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु करण्यात आली आहे.

योजनेच्या डिसेंबर २०१९ ते डिसेंबर २०२० या कालावधीत २०१ प्रस्ताव कृषी विभागाकडे आले होते. त्यानुसार कृषी विभागाने जायका इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.नागपूर व दि युनिव्हर्सल कंपनी लिमिटेड यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवले होते. मात्र, कार्यकाळ संपल्यानंतर देखील यामधील फक्त ८६ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तर, ११ प्रस्ताव नाकारण्यात आले आहेत. तसेच ४४ प्रस्तावांमध्ये कंपनीला त्रुटी आढळली आहे. ६० प्रस्ताव कंपनीचा कार्यकाळ संपल्यानंतर देखील मंजुर करण्यासाठी प्रलंबित आहेत. त्यामुळे हे प्रस्ताव कधी मंजूर होणार असा सवाल प्रस्ताव दाखल केलेल्या शेतकरी कुटुंबांकडून विचारला जात आहेत.

यांना आहे विमा संरक्षण

शेतकरी कुटुंबातील वहितीधारक शेतकरी, तसेच त्याची पत्नी किंवा मुलगा अथवा अपविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक अशा दोन जणांसाठी ही योजना वर्षभर लागू असणार आहे. या कालावधीत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख रुपये, अपघातामुळे दोन अवयव निकामी झाल्यास २ लाख रुपये तर, अपघातामुळे एक डोळा निकामी झाल्यास २ लाख तसेच एक अवयव निकामी झाल्यास १ लाख रुपये अनुदान देण्यात येते. यासाठी कृषी विभागामार्फत अर्ज करावा लागतो.

कार्यकाळ संपल्याने नवीन कंपनी

१०२९-२०२० करीता जायका इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.नागपूर व दि युनिव्हर्सल कंपनी लिमिटेड या विमा कंपनीला राज्याने ३.०४ कोटी शेतकरी व कुटुंबातील एक सदस्य यांच्या विम्यापोटी ९८ कोटी रुपये ५ लाख ८३४ रुपये भरले होेत. त्या तुलनेत प्रस्ताव मंजुर करण्याचे प्रमाणा मात्र, अत्याल्प आहे. तर, या कंपनीचा कार्यकाळ देखील संपला असून, ०७ एप्रिल २०२१ ते ०६ एप्रिल २०२२ या वर्षाकरीता युनिव्हर्सल सोंपो जनरल इन्शुरंन्स कंपनी लि. या कंपनीमार्फत तर, मे. ऑक्झिनियम.इन्शुरंन्स ब्रोकर्स प्रा.लि.नवी मुंबई या विमा सल्लागार कंपनीमार्फत संपुर्ण राज्यात राबवण्यात येत आहे. या कंपनीकडे आतापर्यंत ५३ प्रस्ताव दाखल झाले असून, अद्याप एकही मंजूर करण्यात आलेला नाही.