शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत २०१ पैकी फक्त ८६ प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:31 IST

बीड : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेद्वारे १० डिसेंबर २०१९ ते ९ डिसेंबर २०२० या कालावधीत शेतकरी अपघात ...

बीड : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेद्वारे १० डिसेंबर २०१९ ते ९ डिसेंबर २०२० या कालावधीत शेतकरी अपघात प्रकरणाचे २०१ प्रस्ताव कंपनीकडे पाठवण्यात आले होते. मात्र, त्यापैकी फक्त ८६ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तर, ११५ प्रस्ताव अद्याप धूळखात कंपनीकडे पडले आहेत. विशेष म्हणजे विमा कंपनीचा कार्यकाळ संपून ५ महिने उलटले आहेत. तरी देखील प्रस्तावासंदर्भात निर्णय झालेला नाही.

शेतात काम करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, संर्पदंश, विंचूदंश, विजेच्या तिव्र धक्क्याने मृत्यू, तसेच वाहन अपघात व इतर कोणत्याही कारणांमुळे होणारे मृत्यू व येणारे कायमचे अपंगत्व त्यामुळे शेतकरी कुटुंबाला मोठा धक्का बसतो. तसेच घरातील कर्ता व्यक्तीच्या झालेल्या अपघातामुळे उत्पन्नाचे साधन अचानक बंद होऊन आर्थिक परिस्थिती डबघाईला येते. या अपघातग्रस्त कुटुंबांना आधार देण्यासाठी भाजप शासन काळात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु करण्यात आली आहे.

योजनेच्या डिसेंबर २०१९ ते डिसेंबर २०२० या कालावधीत २०१ प्रस्ताव कृषी विभागाकडे आले होते. त्यानुसार कृषी विभागाने जायका इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.नागपूर व दि युनिव्हर्सल कंपनी लिमिटेड यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवले होते. मात्र, कार्यकाळ संपल्यानंतर देखील यामधील फक्त ८६ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तर, ११ प्रस्ताव नाकारण्यात आले आहेत. तसेच ४४ प्रस्तावांमध्ये कंपनीला त्रुटी आढळली आहे. ६० प्रस्ताव कंपनीचा कार्यकाळ संपल्यानंतर देखील मंजुर करण्यासाठी प्रलंबित आहेत. त्यामुळे हे प्रस्ताव कधी मंजूर होणार असा सवाल प्रस्ताव दाखल केलेल्या शेतकरी कुटुंबांकडून विचारला जात आहेत.

यांना आहे विमा संरक्षण

शेतकरी कुटुंबातील वहितीधारक शेतकरी, तसेच त्याची पत्नी किंवा मुलगा अथवा अपविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक अशा दोन जणांसाठी ही योजना वर्षभर लागू असणार आहे. या कालावधीत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख रुपये, अपघातामुळे दोन अवयव निकामी झाल्यास २ लाख रुपये तर, अपघातामुळे एक डोळा निकामी झाल्यास २ लाख तसेच एक अवयव निकामी झाल्यास १ लाख रुपये अनुदान देण्यात येते. यासाठी कृषी विभागामार्फत अर्ज करावा लागतो.

कार्यकाळ संपल्याने नवीन कंपनी

१०२९-२०२० करीता जायका इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.नागपूर व दि युनिव्हर्सल कंपनी लिमिटेड या विमा कंपनीला राज्याने ३.०४ कोटी शेतकरी व कुटुंबातील एक सदस्य यांच्या विम्यापोटी ९८ कोटी रुपये ५ लाख ८३४ रुपये भरले होेत. त्या तुलनेत प्रस्ताव मंजुर करण्याचे प्रमाणा मात्र, अत्याल्प आहे. तर, या कंपनीचा कार्यकाळ देखील संपला असून, ०७ एप्रिल २०२१ ते ०६ एप्रिल २०२२ या वर्षाकरीता युनिव्हर्सल सोंपो जनरल इन्शुरंन्स कंपनी लि. या कंपनीमार्फत तर, मे. ऑक्झिनियम.इन्शुरंन्स ब्रोकर्स प्रा.लि.नवी मुंबई या विमा सल्लागार कंपनीमार्फत संपुर्ण राज्यात राबवण्यात येत आहे. या कंपनीकडे आतापर्यंत ५३ प्रस्ताव दाखल झाले असून, अद्याप एकही मंजूर करण्यात आलेला नाही.