शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
3
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
4
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
6
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
7
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
8
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
9
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
10
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
11
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
12
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
13
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
14
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
15
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
16
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
17
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
18
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
19
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार

आडत बाजारात कांदा १२ रुपये, घराजवळ २० रूपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:34 IST

बीड : शहरातील खासबाग येथील आडत बाजारात रोज दहा ते पंधरा टन आवक होत होती. ती आता १५ ते ...

बीड : शहरातील खासबाग येथील आडत बाजारात रोज दहा ते पंधरा टन आवक होत होती. ती आता १५ ते २० टन होत आहे. मात्र होलसेल बाजारात भाजीपाला स्वस्त तर शहरातील विविध भागात आणि कॉलन्यांमध्ये विकल्या जाणाऱ्या भाज्यांचे दर दुप्पट, तिप्पट तर कुठे वाजवी असल्याचे पहायला मिळाले. सध्या भाज्यांची आवक जास्त व ग्राहकी कमी असल्याने भाव पडले आहेत. यातच कोरोनानंतरच्या परिस्थितीमुळे वीटभट्टी, बांधकामावरील मजूर, फेरीवाले, भंगार खरेदी करणारे भाजीपाला विक्री व्यवसायाकडे वळले आहेत. किरायाचा हातगाडा घेऊन किंवा एकाच ठिकाणी बसून ते भाजी विक्री करतात. वाहतूक खर्च, दिवसभर करावी लागणारी पायपीट यामुळे या विक्रेत्यांकडील भाजीपाला तुलनेने काहीसा महाग वाटतो. परंतु घरपोच ताजा भाजीपाला मिळत असल्याने मंडईपासून दूर अंतरावर राहणाऱ्यांची सोय झाली आहे.

१) हा बघा दरांमधील फरक (प्रतिकिलो दर )

भाजीपाला आडतबाजार घराजवळ

कांदे १२ २०

बटाटे १३ ३०

टोमॅटो १२ २०

शिमला मिरची १० ४०

शेवगा ४० ८०

दोडका २५ ४०

भेंडी २० ४०

फ्लॉवर २० ४०

वांगी २५ ६०

मेथी जुडी ०५ ०७

२) पेठेत शेवगा ८० तर उत्तमनगरमध्ये कांदा २५ रुपये

पेठ बीड भागात कांदा २० रुपये तर शेवगा ८० रुपये किलो होता. उत्तमनगर भागात कांदा ३० रुपये तर दोडके ६० रुपये किलो होते. धानोरा रोड भागात बटाटे ३० तर मेथी जुडी १० रुपयांना होती. राजीव गांधी चौकात शिमला मिरची ४० रुपये, फ्लॉवर ६० रुपये किलो होते. तर भेंडी २५ ते ३० रुपये किलो होती.

३) पिकवतात शेतकरी, जास्तीचा पैसा तिसऱ्याच्याच हातात !

आडत बाजारातून भाजीपाला खरेदी करून अनेकजण हातगाडे किरायाने घेऊन शहरातील विविध भागात, वसाहतींमध्ये विकतात. मात्र या किरकोळ विक्रेत्यांकडील दर चढेच असतात. ग्राहकाची गरज समजून ते महाग विकतात, असे काही ग्राहकांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांऐवजी जास्तीचा पैसा तिसऱ्याच्या हातात जात असल्याचे दिसते.

४) एवढा फरक कसा?

शहरात कोठेही भाजीपाला विकणाऱ्यांचे दर आणि ठोक बाजारातील दरामध्ये किलोमागे ५ ते १० रुपयांपर्यंत फरक असू शकतो. त्यांना दिवसभर फिरावे लागते. रोजंदारीइतके उत्पन्न अपेक्षित असते. सध्या ठोक बाजारात ग्राहकी नसून भाव कमीच आहेत. समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. -- हुसेन जाफर बागवान, भाजीपाला अडत व्यापारी.

-----------

हातगाड्यावर मावेल इतकीच भाजी ठोक बाजारातून खरेदी करताना थोडा जास्त भाव मोजावा लागतो. शिवाय ढळते माप द्यावे लागते. शहरात भाजी विक्रीसाठी पायपीट करावी लागते. हातगाड्याचा किराया आहेच. घरपोच भाजी मिळत असल्याने व दरात फारसा फरक नसल्याने ग्राहकांना महाग वाटण्याचे काहीच कारण नाही. - शकुर बागवान, फिरता भाजी विक्रेता, बीड.

------

५) अर्धा-पाव किलोसाठी होलसेल बाजारात जाणे परवडत नाही !

होलसेल भाजी बाजारातून किमान दोन ते पाच किलो एकाच प्रकारची भाजी खरेदी करावी लागते. एवढा भाजीपाला घरात साठवून ठेवणेही नुकसानीचेच आहे. तसेच किरकोळ मंडई काय किंवा होलसेल बाजार काय तेथ जाण्यासाठी लागणारा पेट्रोल अथवा रिक्षा खर्च पाहता घराजवळ दोन- पाच रुपये जास्त लागलेले परवडतात. -- संजीवनी शिंदे, बीड.

---------------

भाजीपाला घरात लागतोच किती? अर्धा- पाव किलोसाठी दूरवर पायपीट तसेच गर्दीत जाण्यापेक्षा घराजवळ येणाऱ्या विक्रेत्याकडून आम्ही हवी ती भाजी खरेदी करतो. होलसेल भावात एकदम जादा भाजीपाला आणण्यापेक्षा रोज दारात ताजी भाजी मिळते शिवाय बाजारात जाण्याचा वेळही वाचतो. --- शकुंतला फुलसांगवीकर, बीड.

-------------