शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

५० हजारांची लाच स्वीकारताना कनिष्ठ लिपिकासह एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST

बीड : आरओ प्लांटचे वाढीव वीजबील कमी करण्यासाठी तक्रारदाराने महावितरण, परळी येथील कार्यालयात अर्ज केला होता. दरम्यान, ते कमी ...

बीड : आरओ प्लांटचे वाढीव वीजबील कमी करण्यासाठी तक्रारदाराने महावितरण, परळी येथील कार्यालयात अर्ज केला होता. दरम्यान, ते कमी करण्यासाठी ५० हजारांची लाच कनिष्ठ लिपिकाने मागितली होती. यापैकी ३० हजारांची लाच स्वीकारताना कनिष्ठ लिपिक व एका खासगी व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने गुरुवारी केली.

तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावाने असलेल्या आर. ओ. प्लांटचे फेब्रुवारी २०२१ मध्ये व्यावसायिक मीटरचे ३ लाख ५५ हजार ७५० रुपये रुपये बिल आलेले होते. परंतु बिलामधील रिडिंग आणि मीटरमधील रिडिंग यात तफावत येत असल्याने तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने परळी येथील महावितरण कार्यालयात बिल दुरुस्त करून देण्यासाठी अर्ज दाखल केला होता. बिल दुरुस्तीनंतर तक्रारदार यांनी ९४ हजार रुपये बिल परळी येथील महावितरण कार्यालयात भरले होते, परंतु, एक लाखापुढील बिल दुरुस्तीचे अधिकार महावितरणचे विभागीय कार्यालय, अंबाजोगाई यांना असल्याने तक्रारदार यांनी पत्नीच्या नावाने बिल दुरुस्तीबाबत विभागीय कार्यालयात अर्ज केला. हा बिल दुरुस्ती प्रस्ताव वरिष्ठांकडून मंजूर करून घेण्यासाठी आरोपी सचिन निशिकांत सूर्यवंशी (कनिष्ठ लिपिक महावितरण कार्यालय, परळी ) याने तक्रारदारास ५० हजारांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ३० हजारांची लाच गुरुवारी व उर्वरित २० हजार रुपयांची लाचेची रक्कम काम झाल्यानंतर स्वीकारण्याचे मान्य करून ३० हजार रुपये लाच खासगी व्यक्ती शेख सगीर फकीर महम्मद (रा. हबीबपुरा, परळी) याच्यामार्फत पंचांसमक्ष स्वीकारताना त्याच्यावर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक मारुती पंडित, उस्मानाबाद पोलीस प्रशांत संपते, बाळकृष्ण हनपुडे- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबादचे पोलीस निरीक्षक अशोक हुलगे पोलीस अंमलदार, इफ्तेकर शेख, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, चालक दत्तात्रय करडे यांनी केली.

नागरिकांनी करावी तक्रार

कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खासगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल, तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन उस्मानाबाद उपाधीक्षक प्रशांत संपते यांनी केले आहे.