शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

दुय्यम निबंधक कार्यालयास नियमित दुय्यम निबंधक मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:33 IST

गेवराई : गेवराई येथील दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयात मागील तीन महिन्यांपासून प्रभारी अधिकाऱ्यांवर कामकाज सुरू होते. त्यातच तीन महिन्यात ...

गेवराई : गेवराई येथील दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयात मागील तीन महिन्यांपासून प्रभारी अधिकाऱ्यांवर कामकाज सुरू होते. त्यातच तीन महिन्यात चार प्रभारी अधिकारी बदलल्याने कार्यालयातील कामकाज पूर्णतः कोलमडले होते. वेळेवर कामे होत नसल्याने जमीन, प्लाॅट, घर आदी खरेदी - विक्रीसाठी शेतकरी, नागरिकांना कार्यालयात ताटकळत बसावे लागत होते. शिवाय वारंवार खेटे मारण्याची वेळ येत होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी येथे नियमित दुय्यम निबंधक यांची नियुक्ती झाल्याने त्यांनी रेंगाळलेला कारभार पूर्वपदावर आणला आहे.

कार्यालयात वेळेवर कामे होऊ लागल्याने समाधान व्यक्त होऊ लागले आहे. शासनाला सर्वाधिक महसूल निबंधक कार्यालयातून जातो. या कार्यालयाअंतर्गत कर्ज प्रकरणातील गहाणखत, जमीन, प्लाॅट, घर खरेदी - विक्रीची कामे होतात. गेवराई शहरात मोंढा भागात दुय्यम निबंधक श्रेणी - १चे कार्यालय आहे. या कार्यालयात रोज मोठ्या प्रमाणावर खरेदी - विक्री करण्यासाठी शेतकरी, नागरिकांची गर्दी असते. मात्र, या कार्यालयातील कायम दुय्यम निबंधक यांना तीन महिन्यांपूर्वी बीड जिल्हा कार्यालयात बोलावून याठिकाणी प्रभारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यातच तीन महिन्यात चार प्रभारी अधिकारी बदलल्याने येथील कर्मचाऱ्यांवरील वचक कमी झाल्याने कार्यालयातील कामकाज पूर्णतः कोलमडले गेले होते. परिणामी खरेदी - विक्रीसाठी आलेल्या शेतकरी, नागरिकांची कामे वेळेवर होत नव्हती. कामे वेळेवर होत नसल्याने अनेकदा गोंधळदेखील होत होता.

खरेदी - विक्रीसाठी आलेल्या नागरिकांना कार्यालयात ताटकळत बसावे लागत होते, तसेच वारंवार खेटे मारावे लागत असल्याने संताप व्यक्त होत होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी येथे नियमित दुय्यम निबंधक बी. डी. दारेवार हे रूजू झाले आहेत. त्यांनी या कार्यालयातील रेंगाळलेला कारभार पुन्हा एकदा सुरळीत केला आहे. सर्वर डाऊन वगळता इतर वेळेत योग्य नियोजन करून जमीन खरेदी - विक्रीचे कामकाज होऊ लागले आहे. त्यांच्या योग्य नियोजनामुळे सध्या या कार्यालयात व्यवहारासाठी ताटकळत बसावे लागत नाही. त्यामुळे सध्या कार्यालयातील कामांची गती वाढली असून, कामे वेळेवर होऊ लागल्याने खरेदी-विक्रीसाठी येणाऱ्या शेतकरी, नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

खरेदी - विक्रीसाठी येणाऱ्या नागरिकांची कामे लवकर व वेळेत व्हावीत, यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. कार्यालयात कोणाचीही अडवणूक व त्यांच्या कामात दिरंगाई होऊ नये, यासाठी कर्मचाऱ्यांना दक्षता घेण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.

बी. डी. दारेवार दुय्यम निबंधक, गेवराई