शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

मोरांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:30 IST

आरोग्याची काळजी घ्या अंबाजोगाई : सध्या वातावरणात बदल झाल्याने व उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालल्याने आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालला ...

आरोग्याची काळजी घ्या

अंबाजोगाई : सध्या वातावरणात बदल झाल्याने व उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालल्याने आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यातच अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा वाढता संसर्ग यामुळे अनेक नागरिकांना सर्दी, ताप येणे, मळमळणे असे विविध आजार जाणवू लागले आहेत. या आजारांपासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच कोरोनाची साथ सुरू असल्याने लक्षणे आढळतात. रुग्णालयात जाऊन कोरोनाची तपासणी करा व स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. राहुल धाकडे यांनी केले आहे.

रिकाम्या बाटल्यांमुळे डोकेदुखी वाढली

अंबाजोगाई : सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अंबाजोगाई शहरातील मुकुंदराज परिसर, रेणुकादेवी परिसर, बाराखांबी परिसर व वन विभागातील वृक्षाच्या खाली प्लास्टिकच्या ग्लासांसह रिकाम्या मद्याच्या बाटल्यांचा मोठा खच पडला आहे. लॉकडाऊन असल्यामुळे अनेक मद्यपी आपली पिण्याची हौस भागविण्यासाठी या निसर्गरम्य वातावरणाचा सहारा घेऊ लागले आहेत. मद्यपान करून रिकाम्या बाटल्या या परिसरात फेकून तो परिसर अस्वच्छ करू लागले आहेत. अशा मद्यपींवर पोलिसांनी करडी नजर ठेवावी, अशी मागणी शहरवासीयांमधून होऊ लागली आहे.

कोरोना नियमांचे उल्लंघन, कारवाई सुरू

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व स्थानिक पोलिस यंत्रणेच्या वतीने शहरात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. सकाळी ७ ते १ या वेळेत शहरवासीयांसाठी लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे. मात्र, दुपारी एक नंतर रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या युवकांवर कारवाईचा बडगा प्रशासनाच्या वतीने उगारण्यात आला आहे. जे नागरिक नियमांचे उल्लंघन करतात. त्यांना पोलिसांच्या वतीने चोप दिला जात आहे.

दारे नसलेले विद्युत जनित्र धोकादायक

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात बहुतांश ठिकाणी असणाऱ्या जनित्र विद्युत पेट्यांची दारे तुटलेले आहेत. तर अनेक विद्युत पेट्यांना दरवाजेच नाहीत. ही स्थिती गेल्या अनेक वर्षांपासून आहे. अनेक विद्युत जनित्र शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहेत. रस्त्याची उंची वाढल्याने हे जनित्र सहज हाताला येतात. त्यामुळे संभाव्य धोका मोठ्या प्रमाणात आहे. तर ग्रामीण भागात जनावरे कधीही अशा विद्युत पेट्यांकडे जाऊ शकतात. त्यामुळे हा संभाव्य धोका टाळण्यासाठी जनित्रांना दरवाजे बसवावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत देशपांडे यांनी केली आहे.

===Photopath===

020421\022_bed_7_02042021_14.jpg

===Caption===

मोर