शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

आता रक्त पिशव्यांचा तुटवडा; कसा होणार डेंग्यू रुग्णांवर उपचार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:37 IST

अविनाश मुडेगावकर/ लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : कोरोनामुळे ऐच्छिक रक्तदानाचे प्रमाण कमी झाल्याने आधीच अडचणीत आलेल्या शासकीय रक्तपेढ्यांना आता ...

अविनाश मुडेगावकर/

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : कोरोनामुळे ऐच्छिक रक्तदानाचे प्रमाण कमी झाल्याने आधीच अडचणीत आलेल्या शासकीय रक्तपेढ्यांना आता रक्त पिशव्यांच्या तुटवड्याला तोंड द्यावे लागत आहे. सध्या डेंग्यूमुळे व दैनंदिन शस्त्रक्रियांमुळे रक्तपेढीत दररोज २० ते २५ बॅगांची मागणी होत आहे. याशिवाय प्लेटलेट्सची मागणीही वाढली आहे. मात्र, बॅगांचीच कमतरता जाणवत असल्याने प्लेटलेट्स द्यायच्या कशा? असा प्रश्न रुग्णालय प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील रुग्ण अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी येतात. सध्या विविध ठिकाणी डेंग्यू व डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. या आजारावर अँटिबायोटिक किंवा अँटिव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. डेंग्यूच्या गंभीर रुग्णांमध्ये शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होण्याचा धोका असतो. जेव्हा प्लेटलेट्स काउंट १५ हजार प्रतिमायक्रोलिटरपेक्षाखाली येतात तेव्हा त्याला लो प्लेटलेट्स’मानले जाते. अशावेळी रुग्णाला रँडम डोनर प्लेटलेट्स किंवा सिंगल डोनर प्लेटलेट्स दिले जाते; परंतु कोरोनामुळे रक्तदानाची मोहीम थंडावल्याने प्लेटलेट्सचा तुटवडा जाणवू लागला आहे. परिणामी प्लेटलेट्ससाठी सामान्य रुग्णांच्या नातेवाइकांना लातूर येथील खाजगी रक्तपेढीमधून चढ्या दरात पदरमोड करून खासगी रक्तपेढीतून प्लेटलेट्स आणण्याची वेळ आली आहे.

...

ट्रिपल बॅगच्या मागणीत वाढ

एका रक्तदात्याचा रक्तातून लाल पेशी, प्लेटलेट्स, प्लाझ्मा अशा तीन घटकांना वेगळे करता येते. यासाठी ट्रिपल बॅगची गरज पडते. सूत्रानुसार कोरोनामुळे या बॅगच्या उत्पादनावर प्रभाव पडला आहे. कोरोना कमी होताच रक्त व रक्त घटकांच्या मागणीत वाढ झाली आहे. यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठादारांकडून कमी पुरवठा होत असल्याची माहिती आहे.

...

मागणीप्रमाणे पुरवठा बंद

स्वाराती शासकीय रुग्णालयांच्या रक्तपेढीत कोरोनापूर्वी रक्तदात्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असल्याने रक्ताचा तुटवडा जाणवत नव्हता. सातत्याने रक्तदान शिबिर सुरूच असते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व लसीकरण यामुळे रक्तदात्यांची संख्या कमी झाली आहे. रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तदान करण्यासाठी जनजागृती सुरू आहे. रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी पुढे आले तर निश्चितच तुटवडा कमी होऊन गरजू रुग्णांना रक्तपुरवठा होईल.

-डॉ. शीला गायकवाड, रक्तपेढी, अंबाजोगाई.