शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
3
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
4
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
5
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
6
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
7
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
8
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
9
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
10
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
11
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
12
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
13
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
14
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
15
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
16
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
17
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
18
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
19
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
20
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

ग्रामीण भागातून मिळेना बसला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:35 IST

पुरुषोत्तम करवा माजलगाव : मागील तीन आठवड्यांपासून येथील आगाराने ग्रामीण भागात अनेक गावांत बस सुरू केली होती. अनेक सुविधा ...

पुरुषोत्तम करवा

माजलगाव : मागील तीन आठवड्यांपासून येथील आगाराने ग्रामीण भागात अनेक गावांत बस सुरू केली होती. अनेक सुविधा असताना प्रवासी बसला पाठ दाखवत असल्याने आगाराचे नुकसान होत असून, काही गावात बस सोडायची की नाही, असा प्रश्न आगारप्रमुखांना पडला आहे.

माजलगाव आगारातून १५-१६ महिन्यांपासून बस अनेकवेळा चालू बंद करण्यात आल्या. शहरी भागात जाणाऱ्या बसला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद पाहता बस वाढवण्याची वेळ येथील आगारावर आली, तर २०-२२ दिवसांपासून येथील आगारातून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बससेवा सुरू केली होती. सुरुवातीला दोन फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. सध्या तालुक्यातील खतगव्हाण, गुंजथडी, डुब्बाथडी, गोवर्धन, पुंगणी, आनंदगाव, मंजरथ, आबेगाव, पुरुषोत्तमपुरी आदी गावांना बससेवा सुरू करण्यात आली आहे.

गुंजथडी, आबेगाव, पुरुषोत्तमपुरी, गोवर्धन या गावात जात असलेल्या बसला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने फेऱ्या वाढवण्यात आल्या असून, सध्या या गावांना दिवसातून तीन वेळा बस सोडण्यात येत आहेत. प्रवासी वाढल्यास त्या गावांना जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत, तर बाकीच्या गावांना प्रवाशांकडून बसला पाठ दाखवण्यात येत आहे. या गावात बसमध्ये २०-२५ टक्केच प्रवासी प्रवास करताना दिसून येत आहेत. सध्या मोहखेडमार्गे अंबाजोगाई ही नवीन बससेवा सुरू करण्यात आली असल्याचे या आगाराकडून सांगण्यात येत आहे.

बसमधून प्रवासाची भीती जाईना

ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये कोरोनाच्या बाबतचे भीतीचे वातावरण अद्याप कमी झालेले दिसत नाही. विशेष म्हणजे वयोवृद्ध नागरिकांमध्ये याची भीती जास्त असल्याने वयोवृद्ध नागरिक बसमधून प्रवास करण्यात टाळाटाळ करताना दिसत आहेत. ते मोटारसायकल किंवा अवैध वाहनांना प्राधान्य देताना दिसत आहेत.

------

बसमधून अंध, अपंग, वयोवृद्ध नागरिकांना सुविधा मिळत असतानादेखील ग्रामीण भागातील हे नागरिक बसने प्रवास करण्यास टाळाटाळ करताना दिसत आहेत. सध्या ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात प्रवास करणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढत आहे. यामुळे चालणाऱ्या गाड्यात फायदा होत असून, ग्रामीण भागातील बस तोट्यात चालल्या आहेत.

-दत्तात्रय काळम पाटील, आगारप्रमुख, माजलगाव

---