शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

ऊस वाहतूक ट्रक, ट्रॅक्टरच्या कर्कश साउंड आणि बेभान वेगावर नियंत्रण नाही; नागरिकांच्या सुरक्षतेची काळजी धाब्यावर, अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:26 IST

माजलगाव तालुका हा उसाचा बेल्ट म्हणून ओळखला जातो. या पट्ट्यात १५ हजार हेक्टर ऊस उपलब्ध असून, या ...

माजलगाव तालुका हा उसाचा बेल्ट म्हणून ओळखला जातो. या पट्ट्यात १५ हजार हेक्टर ऊस उपलब्ध असून, या भागात दोन सहकारी व एक खाजगी साखर कारखाना आहे. मागील काही वर्षांत या भागातील ऊस गाळपास नेण्याची जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा दिसून येते. परतीच्या पावसाने झालेल्या अतिवृष्टीनंतर यंदा ऊस गाळप हंगाम जोरात सुरू झाला आहे. तालुक्यातील सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना, छत्रपती सहकारी साखर कारखाना व जयमहेश शुगर्स हे खाजगी कारखाने सुरू झाले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील जवळपास १०-१२ कारखान्यांच्या वतीने या भागातील ऊस गाळप होत आहे.

सर्वच कारखान्यांची तगडी तोड यंत्रणा उसाच्या फडात उभी आहे. त्याचबरोबर वाहतूक यंत्रणा रस्त्यावर धावत आहे. स्थानिक कारखाना कार्यक्षेत्रात काही प्रमाणात बैलगाडी व ट्रॅक्टरद्वारे उसाची वाहतूक केली जाते. मात्र, दूर पल्ल्याच्या ट्रक आणि ट्रॅक्टरमधून वाहतूक होते, ज्या भागात रस्ते खराब आहेत, अशा भागात तर ट्रॅक्टरमधूनच वाहतूक होत आहे. ऊसतोडणी वाहतूक यंत्रणेचा अधिकांश भार उचलणाऱ्या ट्रॅक्टरचालकाकडून मात्र इतरांच्या सुरक्षिततेची काळजी ‘धाब्यावर’ बसवल्याचे दिसून येत आहे.

बहुतांश ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाने मोठ्या आवाजाची साऊंड सिस्टीम बसवली आहे. याचा कर्णकर्कश आवाज रस्त्यावरून जाताना सर्रास ऐकावयास मिळतो. त्याचा नाहक त्रास नागरिकांना होतो. ऊस वाहतूक करणारी वाहने अपघाताला निमंत्रण देणारी ठरत असून, त्यांना कोणी तरी शिस्त लावण्याची गरज आहे. या साऱ्या प्रकाराकडे कोणत्याही यंत्रणेचे लक्ष नाही.