शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

व्यावसायिक सिलिंडरची दरवाढ झाल्याने हॉटेल्सचालकांसमोर नवीन संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:35 IST

भाववाढ करावी, तर ग्राहक येईना अंबाजोगाई : कोरोना काळात दीड वर्षांत हॉटेल्स व चहाच्या टपऱ्या जवळपास आठ महिने ...

भाववाढ करावी, तर ग्राहक येईना

अंबाजोगाई : कोरोना काळात दीड वर्षांत हॉटेल्स व चहाच्या टपऱ्या जवळपास आठ महिने बंद राहिल्याने आणि कच्चा माल व व्यावसायिक सिलिंडरचे दर तब्बल ४३० रुपयांनी वाढल्याने हॉटेल्सचा व्यवसाय करणाऱ्यांची मोठी चिंता वाढली आहे.

गेल्यावर्षीपासून या व्यवसायाची बिघडलेली स्थिती अजूनही सुधारलेली नाही. यावर्षीही मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने बहुतांश दिवस हॉटेल्स व्यवसाय बंद राहिले, तर आता वेळेच्या मर्यादेमुळे ग्राहकांची संख्या घटली आहे. लोक हॉटेल्स आणि स्वीटहोममधील पदार्थांची खरेदी करणे टाळत आहेत. याशिवाय माल तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने हॉटेल व्यवसाय केवळ नावापुरतेच चालवावे लागत आहेत. आता नाश्ता आणि हॉटेलमध्ये जेवण महाग झाले आहे. त्यातच हॉटेलचालकांना लागणाऱ्या व्यावसायिक १९ किलोच्या सिलिंडरची वर्षभरात ४३० रुपयांनी वाढ झाली आहे. महागाई वाढल्याने कर्मचारी पगारवाढीची मागणी करीत आहेत. याशिवाय विजेचे दर, विविध कर, पाण्यावर होत असलेला खर्च आदींची वाढ झाली आहे. ना नफा ना तोटा या तत्त्वावर हॉटेल व्यवसाय सुरू आहे. कधी कधी पदार्थ उरल्यास तोटाही सहन करावा लागतो. सध्या सण नसल्याने मिठाईला मागणी कमीच आहे. या सर्व कारणांमुळे हा व्यवसाय चालवावा की नाही? ही गंभीर समस्या भेडसावू लागली आहे.

भाववाढ केली, तर ग्राहक येईना

भाज्या, खाद्यतेल आणि डिझेल वाढल्याने सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. अशा महागाईत मालाच्या किमती वाढविणे हाच एक पर्याय आहे. मात्र भाववाढ केल्यास ग्राहक येणार नाहीत, अशी स्थिती होऊ नये. त्यामुळे पदार्थांच्या किमती वाढवता येत नाहीत.

पार्सल विक्रीही थंडावली

हॉटेल व्यवसाय दुपारी ४ वाजता बंद झाल्यानंतर पार्सल विक्रीसाठी मुभा दिली गेली असली, तरीही एकदा बाजारपेठ बंद झाल्यानंतर ग्राहकही पार्सलच्या मागणीसाठी फिरकत नाहीत. अनेकांची इच्छा हॉटेलमध्ये बसून खाण्याचीच असते. याचाही मोठा फटका या व्यवसायाला कारणीभूत ठरू लागला आहे.