शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

सामाजिक स्वास्थ्यासाठी विधवा पुनर्विवाहाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:33 IST

बीड : गुरुनिष्ठ संत, पंढरीचे निस्सीम वारकरी श्री संत खंडोजीबाबा यांच्या चरणांजवळ आलात की देव भेटेल, असे प्रतिपादन ह. ...

बीड : गुरुनिष्ठ संत, पंढरीचे निस्सीम वारकरी श्री संत खंडोजीबाबा यांच्या चरणांजवळ आलात की देव भेटेल, असे प्रतिपादन ह. भ. प. प्रा. नाना महाराज कदम यांनी केले. श्रीक्षेत्र लोणी वारणी येथे संत खंडोजी बाबा पुण्यतिथी सोहळ्यात चौथे कीर्तनपुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती महंत यादव बाबा, अभिमान महाराज ढाकणे, संजय महाराज देवकर, प्रा. सुरेश महाराज जाधव, योगेश महाराज जोगदंड, खंडोजी महाराज यांची होती.

यावेळी कदम महाराज म्हणाले, संत बंकट स्वामी महाराज यांचे शिष्य संत वामन भाऊ, संत भगवान बाबा यांनी महाराष्ट्रात प्रचार-प्रसाराचे खूप मोठे काम करीत जनसामान्यापर्यंत वारकरी संप्रदाय नेला. वैराग्याच्या जोरावरच देवत्व आपलेसे करण्याचे सामर्थ्य संतांमध्ये असते. खरा परमार्थ करताना आजच्या आधुनिक युगामध्ये संतांचे विचार जीवनामध्ये अंगिकारणे महत्त्वाची गोष्ट आहे. वारकरी संप्रदायाने सर्वप्रथम विधवा महिलांनाही सांप्रदायात महत्त्वाचे स्थान दिले. सद्य:स्थितीत लोकांनी तरुण वयामध्ये अकाली वैधव्य आलेल्या महिलांचे पुनर्विवाह करण्याचा विचारही करावा. सामाजिक स्वास्थ्य अबाधित राहण्यासाठी विधवा विवाहाची संकल्पना पुन्हा एकदा समाजामध्ये रूढ होणे गरजेचे असल्याचे नाना महाराज म्हणाले. या कीर्तनात उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. खंडोजी बाबा गडावरील टाळकरी, गायक-वादक सर्वांची साथसंगत लागल्याने कीर्तनात रंगत आली.