शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

गावचे नाव ‘खडक’वाडी ; पण प्रेरणादायी संस्काराची पंढरी! -

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:27 IST

एका टेकडीवरील अगदी खडकावर वसलेल्या या खडकवाडीचे हे छायाचित्र. छाया : अनिल गायकवाड अनिल गायकवाड कुसळंब ...

एका टेकडीवरील अगदी खडकावर वसलेल्या या खडकवाडीचे हे छायाचित्र. छाया : अनिल गायकवाड

अनिल गायकवाड

कुसळंब (जि. बीड) : ‘नावात काय असतं, असं म्हटलं जातं; किंबहुना अगदी त्याच अनुषंगाने गावाचं नाव खडकवाडी असलं तरी या भूमीतून शेकडो तरुण विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवित राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध प्रशासनातील क्षेत्रात उत्तुंग कार्य करीत या भूमीचा नावलौकिक वाढवीत आहेत. अगदी खडकावर वसलेल्या या खडकवाडीच्या तरुणांनी शेतीक्षेत्र अत्यंत कमी असल्याने व त्यामुळे ऊसतोडीशिवाय पर्याय नसल्याने स्वतःला अभ्यासात गाडून घेतले आणि या भूमीचा नावलौकिक वाढविला.

बीड- कल्याण महामार्गावरील खडकवाडी (ता. पाटोदा) हे छोटेसे टुमदार गाव. एका टेकडीवर वसलेले आहे. गावाला अल्प क्षेत्र असल्याने ऊसतोडीशिवाय पर्याय नव्हता आणि म्हणून येथील तरुणांनी लहानपणापासूनच प्रचंड कष्ट घेत शाळा-महाविद्यालयात शिकून प्रशासनातल्या विविध क्षेत्रांत जाऊन गावचा इतिहास बदलला!

आजपर्यंत या गावातील तरुणांनी शिपायापासून ते कलेक्टरपर्यंत मजल मारली आहे. गावचे भूमिपुत्र निवृत्त जिल्हाधिकारी बी. डी. सानप यांनी कानिफनाथांच्या आशीर्वादाने गावचा झेंडा महाराष्ट्राच्या क्षितिजावर नेऊन पोहोचविला. शिक्षक, प्राध्यापक, सैनिक, पोलीस, बांधकाम, कृषी शिक्षण आदींसह आरोग्य, तसेच विविध क्षेत्रांत येथील तरुण महाराष्ट्रभर आणि देशात कार्यरत आहेत. उपजीविकेचे साधन नसल्याने त्यांना अभ्यासाशिवाय पर्याय नव्हता आणि हीच गरज त्यांना यशापर्यंत नेऊ शकली.

दूधविक्री न करण्याची परंपरा!

गावामध्ये दूध-दही विक्री न करण्याची परंपरा आहे. विविध जाती, धर्म, पंथ गुण्यागोविंदाने नांदतात. सात सदस्यीय ग्रामपंचायत असलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेने २७ एकर गावच्या जागेमध्ये कंपाऊंड करून उत्कृष्ट विविध फळझाडांची वनराई खडकावर फुलविली आहे! एमआरईजीएसच्या माध्यमातून चार हजार वृक्षांची लागवड केली. यात साडेसहाशे झाडांची डाळिंबाची लागवड तसेच चिंच, आवळा, आंबा, सीताफळ, लिंबोणी आदी फळांची झाडेही गावची शोभा वाढवीत आहेत. यंदा येथूनच चार टन डाळिंबाची विक्री झाली आहे!

प्रा. संजय सानप

(माजी सरपंच, खडकवाडी)

‘कानिफनाथ’ देवस्थान गावचे श्रद्धास्थान! कानिफनाथांचे सुंदर भव्यदिव्य मंदिर गावच्या टेकडीवर उभारले असून, गावच्या वैभवात भर घालत आहे. श्रावण महिन्यात सप्ताह होतो. नोव्हेंबरमध्ये प्राणप्रतिष्ठा असते. गावात माडी बांधत नाहीत. बैलांना नाल ठोकत नाहीत, तसेच शिंगांना सेंबीही नसते तसेच घरात सनलाही मारला जात नाही. या काही गावच्या प्रथा आहेत.

२००२ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करून भव्य मंदिर उभारणी करण्यात आली. यावेळी हभप निगमानंद महाराज मायंबा आणि गावचे भूमिपुत्र तत्कालीन जिल्हाधिकारी बी. डी. सानप तसेच रामकृष्ण बांगर आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला होता.

वृक्षलागवड अन् अभ्यासिका!

कानिफनाथ मंदिरालगत प्रचंड मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली असून, मंदिरालगत अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासिकागृह बांधण्यात आले आहे. महंत हभप लक्ष्मण महाराज फड यांच्या मार्गदर्शनातून अध्यात्म विचारांचा सुंदर आविष्कार आणि संस्काररूपी लोकशिक्षणाचा प्रसार केला जात आहे. २००२ मध्ये मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमापासून येथील कित्येक वर्षांपासून बोकड कापण्याची अर्थात कंदुरीचा प्रकार बंद केला आहे.