शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

मुंबई-पुण्याने वाढविली जिल्ह्याची चिंता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोनाच्या पहिल्या लाटेत बाहेर गावाहून अथवा परजिल्ह्यातून येणाऱ्यांची कोरोना चाचणी केली होती, तशी आता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : कोरोनाच्या पहिल्या लाटेत बाहेर गावाहून अथवा परजिल्ह्यातून येणाऱ्यांची कोरोना चाचणी केली होती, तशी आता होत नाही. तसेच पूर्वीप्रमाणे आताही पुणे, मुंबईहून आलेल्यांनी जिल्ह्याची चिंता वाढविली आहे. प्रवास करून आलेले बहुतांश लोक कोरोनाबाधित आढळत असल्याचे सांगण्यात आले. काही लोक तर चाचणीही करत नाहीत. अशा लोकांची आरोग्य विभागाकडेही नोंद नसल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गतवर्षी पुणे, मुंबईहून आलेले लोक कोरोनाबाधित आढळले होते. त्यावेळीही याच प्रवाशांनी जिल्ह्याची चिंता वाढविली होती. आताही औरंगाबाद, पुणे, आणि मुंबईहून आलेले लोक कोरोनाबाधित आढळत असल्याने पुन्हा जिल्ह्याची चिंता वाढली आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांनी स्वता:ची व कुटूंबियांच्या आरोग्याची काळजी म्हणून कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करण्याची गरज आहे.

बाहेरगावातून येणाऱ्यांची चाचणीच नाही

कोरोनाच्या पहिल्या लाटेत परजिल्ह्यातून अथवा परराज्यातून आलेल्या प्रत्येकाची कोरोना चाचणी केली जात असे. तसेच त्यांना १४ ते २८ दिवसांसाठी होम क्वारंटाईन बंधनकारक केले होते.

बाहेरगावाहून येणाऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्याशी नियमित संपर्कही केला जात होता. ज्यांना लक्षणे आहेत, त्यांना तात्काळ आरोग्य पथकांमार्फत उपचार केले जात होते.

आता परिस्थिती बदलली आहे. सध्या बाहेरगावाहून येणाऱ्यांची चाचणी तर दुरच परंतु साधी नोंदही घेतली जात नाही.

बाहेरगावाहून आल्यानंतर लक्षणे असतानाही कोणीच स्वता:हुन पुढे येत चाचणी करत नाहीत. प्रशासनही दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते

दरराेज २ हजारापेक्षा जास्त लोकांचा प्रवास

एसटीबस

सध्या जिल्ह्यातील बससेवा बंद असली तरी परजिल्ह्यातील बसेसची ये-जा सुरूच आहे. दररोज किमान ५०० पेक्षा जास्त लोक परजिल्ह्यातून बीड जिल्ह्यात प्रवेश करत असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु यातील कोणीच कोरोना चाचणी करून सुरक्षित राहत नसल्याचे दिसते.

खाजगी वाहने

बस व इतर सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने लोक खाजगी वाहनांचा आधार घेत बीड जिल्हा जवळ करीत आहेत. यात मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यांतून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. औरंगाबादहून येणारे लोकही बीडमध्ये आल्यावर कोरोना चाचणी करीत नाहीत.

रेल्वे

जिल्ह्यात केवळ परळी येथे रेल्वेस्टेशन आहे. येथे हजारपेक्षा जास्त प्रवाशांची नेहमीच चढउतार असते. परंतु येथेही सध्या कोरोनाचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. प्रवासीही प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून स्वत:चा व इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत.