शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

महावितरणचा जीवघेणा शॉक; तीन वर्षांत ८३ लोकांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:31 IST

सोमनाथ खताळ बीड : जिल्ह्यात महावितरणच्या दुर्लक्षामुळे वाकलेले खांब, लोंबकळलेल्या तारा सामान्यांसाठी जीवघेण्या ठरत आहेत, तसेच कर्मचाऱ्यांनाही निष्काळजी अंगलट ...

सोमनाथ खताळ

बीड : जिल्ह्यात महावितरणच्या दुर्लक्षामुळे वाकलेले खांब, लोंबकळलेल्या तारा सामान्यांसाठी जीवघेण्या ठरत आहेत, तसेच कर्मचाऱ्यांनाही निष्काळजी अंगलट येत आहे. मागील तीन वर्षांत तब्बल ८३ लोकांचा शॉक लागल्याने जीव गेला आहे, तसेच ६६ प्राण्यांचाही अशा अपघातात मृत्यू झाला आहे. अपघातांत वाढ होत असतानाही महावितरणकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

परळी शहरात एका चिमुकलीचा खेळताना खांबाला धक्का लागला. यात आगोदरच विद्युत प्रवाह उतरलेला असल्याने शॉक लागून तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर केज तालुक्यातही विद्युत मोटार सुरू करताना शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दोन दिवसांत दोघांचा बळी गेला. हाच धागा पकडून 'लोकमत'ने जिल्ह्याचा आढावा घेतला. यात मागील तीन वर्षांत अपघातात तब्बल ८३ लोकांचा जीव गेल्याचे समोर आले. यामध्ये २७ लोक महावितरणचेच कर्मचारी आहेत तर ५९ हे सामान्य नागरिक आहेत. मनुष्यहानीबरोबरच ६६ प्राण्यांचाही शॉक लागून मृत्यू झाला आहे. अपघातात वाढ झालेली असतानाही महावितरणकडून ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. आजही खांब वाकलेले दिसतात. जम्पर व्यवस्थित नाहीत. तारा लोंबकळल्या आहेत. केवळ मेन्टेनन्सच्या नावाखाली कंत्राटदारांना पोसले जात आहे. दर्जाहीन कामे होत असल्यानेच आणि अभियंता, कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच अपघात कमी होत नाहीत. यात सामान्य नागरिकांसह निष्पाप प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे. यावर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

७२ मयतांना मिळाली मदत

आतापर्यंत ७२ लोकांना मदत देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना अपघाती विमा तर सामान्य नागरिकांना ४ लाख रुपयांपर्यंत मदत दिली जात असल्याचे सांगण्यात आले. अद्यापही ११ प्रकरणांत मदत मिळालेली नाही. याची कारणे महावितरणला सांगता आली नाहीत.

मदतीसाठी वर्षभर हेलपाटे

वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथील सखाराम वाळेकर या शेतकऱ्याचा घरावर तार पडल्याने शॉक लागून मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या मुलाला वर्षभर मदतीसाठी महावितरणच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागले. माणूस गमावलेले असतानाही डोक्यावर दु:खाचे ओझे घेऊन वारसांना मदतीसाठी धावपळ करावी लागत आहे. महावितरणचे अधिकारी काही ना काही त्रुटी काढून हे प्रकरण नाकारण्याचा प्रयत्न करतात. विशेष म्हणजे एकाचवेळी ही त्रुटी न काढता वारंवार काढली जाते. त्यामुळे नाहक त्रास होतो.

म्हैस दगावली; पण अद्याप मदत नाही

बीड तालुक्यातील वरवटी येथील बंडू वारभाऊ यांची म्हैस शॉक लागून दगावली होती. याचा पंचनामा करून इतर सर्व कारवाई झाली; परंतु अद्यापही त्यांना मदत मिळालेली नाही. बीड ग्रामीणच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविले; परंतु अद्यापही त्यांनी एक रुपयाचीही मदत हातावर टेकली नाही. केवळ राजकारण्यांसारखी आश्वासने दिली जात असल्याचे संभाजी ब्रिगेडचे माजी अध्यक्ष राहुल वायकर यांनी सांगितले.

कोट

याबाबत सविस्तर माहिती मंगळवारी किंवा बुधवारी देईल. याची कारणे काय आहेत, हे कागदपत्रे पाहून सांगावी लागतील. आताच त्यावर काही सांगता येणार नाही.

रवींद्र कोळप

अधीक्षक अभियंता, महावितरण बीड.

----

अशी आहे आकडेवारी

महावितरणचे कर्मचारी मृत्यू - २७

सामान्य नागरिक मृत्यू - ५९

मदत मिळालेले - ७२

----

मनुष्यहानी

विभाग२०१८-१९२०१९-२०२०२०-२१

बीड १६ २६ १४

अंबाजोगाई १० १४ ३

एकूण २६ ४० १७

पशुहानी

विभाग२०१८-१९२०१९-२०२०२०-२१

बीड ४ १२ २५

अंबाजोगाई७ ११ ७

एकूण ११ २३ ३२