शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
6
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
7
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
8
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
9
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
10
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
11
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
12
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
13
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
14
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
15
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
16
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
17
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
18
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
19
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
20
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?

महावितरणचा जीवघेणा शॉक; तीन वर्षांत ८३ लोकांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:31 IST

सोमनाथ खताळ बीड : जिल्ह्यात महावितरणच्या दुर्लक्षामुळे वाकलेले खांब, लोंबकळलेल्या तारा सामान्यांसाठी जीवघेण्या ठरत आहेत, तसेच कर्मचाऱ्यांनाही निष्काळजी अंगलट ...

सोमनाथ खताळ

बीड : जिल्ह्यात महावितरणच्या दुर्लक्षामुळे वाकलेले खांब, लोंबकळलेल्या तारा सामान्यांसाठी जीवघेण्या ठरत आहेत, तसेच कर्मचाऱ्यांनाही निष्काळजी अंगलट येत आहे. मागील तीन वर्षांत तब्बल ८३ लोकांचा शॉक लागल्याने जीव गेला आहे, तसेच ६६ प्राण्यांचाही अशा अपघातात मृत्यू झाला आहे. अपघातांत वाढ होत असतानाही महावितरणकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

परळी शहरात एका चिमुकलीचा खेळताना खांबाला धक्का लागला. यात आगोदरच विद्युत प्रवाह उतरलेला असल्याने शॉक लागून तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर केज तालुक्यातही विद्युत मोटार सुरू करताना शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दोन दिवसांत दोघांचा बळी गेला. हाच धागा पकडून 'लोकमत'ने जिल्ह्याचा आढावा घेतला. यात मागील तीन वर्षांत अपघातात तब्बल ८३ लोकांचा जीव गेल्याचे समोर आले. यामध्ये २७ लोक महावितरणचेच कर्मचारी आहेत तर ५९ हे सामान्य नागरिक आहेत. मनुष्यहानीबरोबरच ६६ प्राण्यांचाही शॉक लागून मृत्यू झाला आहे. अपघातात वाढ झालेली असतानाही महावितरणकडून ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. आजही खांब वाकलेले दिसतात. जम्पर व्यवस्थित नाहीत. तारा लोंबकळल्या आहेत. केवळ मेन्टेनन्सच्या नावाखाली कंत्राटदारांना पोसले जात आहे. दर्जाहीन कामे होत असल्यानेच आणि अभियंता, कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच अपघात कमी होत नाहीत. यात सामान्य नागरिकांसह निष्पाप प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे. यावर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

७२ मयतांना मिळाली मदत

आतापर्यंत ७२ लोकांना मदत देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना अपघाती विमा तर सामान्य नागरिकांना ४ लाख रुपयांपर्यंत मदत दिली जात असल्याचे सांगण्यात आले. अद्यापही ११ प्रकरणांत मदत मिळालेली नाही. याची कारणे महावितरणला सांगता आली नाहीत.

मदतीसाठी वर्षभर हेलपाटे

वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथील सखाराम वाळेकर या शेतकऱ्याचा घरावर तार पडल्याने शॉक लागून मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या मुलाला वर्षभर मदतीसाठी महावितरणच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागले. माणूस गमावलेले असतानाही डोक्यावर दु:खाचे ओझे घेऊन वारसांना मदतीसाठी धावपळ करावी लागत आहे. महावितरणचे अधिकारी काही ना काही त्रुटी काढून हे प्रकरण नाकारण्याचा प्रयत्न करतात. विशेष म्हणजे एकाचवेळी ही त्रुटी न काढता वारंवार काढली जाते. त्यामुळे नाहक त्रास होतो.

म्हैस दगावली; पण अद्याप मदत नाही

बीड तालुक्यातील वरवटी येथील बंडू वारभाऊ यांची म्हैस शॉक लागून दगावली होती. याचा पंचनामा करून इतर सर्व कारवाई झाली; परंतु अद्यापही त्यांना मदत मिळालेली नाही. बीड ग्रामीणच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविले; परंतु अद्यापही त्यांनी एक रुपयाचीही मदत हातावर टेकली नाही. केवळ राजकारण्यांसारखी आश्वासने दिली जात असल्याचे संभाजी ब्रिगेडचे माजी अध्यक्ष राहुल वायकर यांनी सांगितले.

कोट

याबाबत सविस्तर माहिती मंगळवारी किंवा बुधवारी देईल. याची कारणे काय आहेत, हे कागदपत्रे पाहून सांगावी लागतील. आताच त्यावर काही सांगता येणार नाही.

रवींद्र कोळप

अधीक्षक अभियंता, महावितरण बीड.

----

अशी आहे आकडेवारी

महावितरणचे कर्मचारी मृत्यू - २७

सामान्य नागरिक मृत्यू - ५९

मदत मिळालेले - ७२

----

मनुष्यहानी

विभाग२०१८-१९२०१९-२०२०२०-२१

बीड १६ २६ १४

अंबाजोगाई १० १४ ३

एकूण २६ ४० १७

पशुहानी

विभाग२०१८-१९२०१९-२०२०२०-२१

बीड ४ १२ २५

अंबाजोगाई७ ११ ७

एकूण ११ २३ ३२