शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जमियत उलेमा-ए-हिंदच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती लावून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 00:02 IST

बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालावर जमियत उलेमा-ए-हिंद संघटनेच्या वतीने शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देबीड जिल्ह्यात आंदोलन : ‘नागरिकत्व सुधारणा विधेयक रद्द करा’

बीड : केंद्र शासनाने लोकसभा आणि राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर केले आहे. मात्र, ते अन्यायकारक आहे, व संविधान विरोधी आहे. त्यामुळे देशामध्ये फाळणी होऊ शकते. त्यामुळे हे विधेयक धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे, घटनाविरोधी आहे. त्यामुळे ते तात्काळ रद्द करावे या मागणीसाठी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालावर जमियत उलेमा-ए-हिंद संघटनेच्या वतीने शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी धरणे आंदोलन करून मागणीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलक डोक्यास व दंडावर काळ्या फिती लावून सहभागी झाले होते. यावेळी ‘सीएबी नाही शिक्षण, रोजगार पाहिजे’ अशा घोषणा दिल्या जात होत्या.१३ डिसेंबर रोजी दुपारच्या नमाजनंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. सीएबी-एनसीआर हे नागरिकत्व सुधारणा विधेयक केंद्र शासनाने आणले आहे. ते दोन्ही सभागृहात पास झालेले आहे. यामध्ये देशातील जवळपास सर्व जाती धर्मांना सामावून घेण्यात आले आहे. मात्र, मुस्लिमांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे या माध्यमातून देशातील मुस्लिमांवर अन्याय झाल्याची भावना नागरिकांधून व्यक्त केली जात आहे. असे विधेयक आणून केंद्र सरकार समाजासमाजात तेढ निर्माण करत आहे. तर या कायद्यामुळे संविधानाची पायमल्ली केली जात आहे. या कायद्यास देशभरात विरोध करण्यात येत आहे. याचे पडसाद बीड जिल्ह्यात देखील उमटले. सीएबीच्या विरोधात काल बीड सह धारूर, केज, माजलगावसह अन्य काही ठिकाणी आंदोलन करण्यात आले.शांततेत व शिस्तीत आंदोलनबीड येथे मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव काळ्या फिती बांधून रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या हातात ‘सीएबी नाही रोजगार, शिक्षण, संरक्षण, अपराध मुक्त देश पाहिजे’ असे लिहिलेले घोषणाफलक होते. यावेळी शांततेत व शिस्तीत आंदोलन पार पडले.संघटनेच्या वतीने मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी मुफ्ती जावेद कासमी, मुफ्ती अब्दुल कासमी, सौलाना सय्यद साबीर, मौलाना जाकीर, मुफ्ती मोहीयोद्दीन, मौलाना इलियास कासमी, काझी जफर, अ‍ॅड शफीक , प्र.इलियास इनामदार, सौलाना अब्दुल रहीम, अब्दुल सलाम सेठ, महमद खामोद्दीन, माजी आ. सय्यद सलीम, न.प.उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर, माजी आ. सुनिल धांडे, संजय मालाणी, भागवत तावरे, अशोक हिंगे आदींनी मार्गदर्शन करून भारताच्या एकतेच्या व अखंडतेवर कोणालाही गंडातर आणू देणार नाही. आम्ही सर्व जण एकत्र येऊ असा नारा यावेळी दिला.

टॅग्स :BeedबीडMuslimमुस्लीमMorchaमोर्चाagitationआंदोलनcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक