शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

मृत्युदर वाढताेय; चार दिवसांत नऊ कोरोना बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:33 IST

बीड : जिल्ह्यात उपचारात हलगर्जी होत असल्याने पुन्हा एकदा कोरोनाचा मृत्युदर वाढत आहे. गुरुवारी आणखी दोन मृत्यूची नोंद आरोग्य ...

बीड : जिल्ह्यात उपचारात हलगर्जी होत असल्याने पुन्हा एकदा कोरोनाचा मृत्युदर वाढत आहे. गुरुवारी आणखी दोन मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. मागील चार दिवसांत तब्बल चौघांचा कोरोनाने जीव घेतला आहे. तसेच नव्या रुग्णांची संख्याही वाढत असून, गुरुवारी आणखी ५७ रुग्णांची भर पडली. तसेच ४८ जण कोरोनामुक्त झाले.

जिल्ह्यातील कोरोनामुळे होणारे मृत्यू थांबविण्यात आरोग्य विभागाला पूर्णपणे अपयश येत असल्याचे दिसत आहे. तसेच नवे रुग्णही दिवसेेंदिवस वाढत आहेत. तीन दिवसांत ७ मृत्यू झाल्यानंतर गुरुवारी आणखी दोघांची यात भर पडली. यात आडस (ता. केज) येथील ८० वर्षीय पुरुष व गेवराई शहरातील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यातील ९४७ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. पैकी ८९० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर ५७ बाधित निष्पन्न झाले. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक २२, अंबाजोगाई ११, आष्टी ९, केज २, तसेच गेवराई, माजलगाव परळी व शिरुरकासार तालुक्यांत प्रत्येकी तीन व पाटोदा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. याशिवाय ४८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा १९ हजार २१ इतका झाला आहे. पैकी १८ हजार ७१ जण कोरोनामुक्त झाले असून, ५८५ जणांचा मृत्यू झाला आहे. जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, डॉ. पी. के. पिंगळे यांनी ही माहिती दिली.

मृत्यूसंख्या वाढल्याने चिंता

बीड जिल्ह्यात कोरोना रुग्ण मृत्यूचे प्रमाण गत दोन महिन्यांत आटोक्यात आले होते; मात्र मागील चार दिवसांत हेच मृत्यूचे प्रमाण वेगाने वाढले आहे. चार दिवसांत नऊ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली आहे. यात बुधवारी चार, तर त्यापूर्वी रविवार ते मंगळवार या तीन दिवसांत तिघांच्या मृत्यूची नोंद झाली होती, त्यानंतर गुरुवारी पुन्हा दोन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता आजपर्यंतच्या एकूण मृत्यूची संख्या ५८५ झाली आहे.

उपचारांबद्दल तक्रारी कायम

जिल्हा रुग्णालयासह स्वाराती रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यांना सुविधा दिल्या जात नाहीत. केवळ करोडो रुपयांची कागदोपत्री उधळपट्टी केली जात आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही जिल्हाधिकारी अथवा लोकप्रतिनिधी यावर कारवाई करीत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सीएसकडून राऊंडच नाही

जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून पदभार स्वीकारलेले डॉ. सूर्यकांत गित्ते हे स्वत: फिजिशियन आहेत. कोरोनाबाधितांवर उपचारात फिजिशियनची मोठी जबादारी आहे. परंतु डॉ. गित्ते हे कोरोना राऊंडकडे फिरकलेच नाहीत. केवळ प्रशिक्षण केंद्र व अस्थापना विभागातून सूचना करीत आहेत. त्यामुळे कोरोना वाॅर्डमधील राऊंड वेळेवर होत नाहीत. सुविधा मिळत नाहीत. एमबीबीएस डॉक्टर गायब होऊन बीएएमएस डॉक्टरांकडून उपचार केले जात आहेत. यापूर्वी डॉ. गित्ते यांना संपर्क करूनही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, ते माध्यमांपासून दूर राहात असल्याने त्यांना यावेळी संपर्क केला नाही.