शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
2
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
3
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
4
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
5
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
6
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
7
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
8
विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?
9
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
10
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
11
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
12
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
13
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
14
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
15
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!
16
Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
17
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
18
PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट
19
ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज
20
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाची नाइट शिफ्ट; दिवसा ब्रेक; भांडुपमध्ये भिंत कोसळली

निधी पळविण्याचे मनसुबे उधळले !

By admin | Updated: August 17, 2014 00:13 IST

संजय तिपाले , बीड दलित वस्ती विकासासाठी आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या पळवापळवीला ‘कोल्हे पॅटर्न’ने यंदा चांगलाच दणका दिला आहे. निधीसाठी दरवर्षी होणारी रस्सीखेच यावेळी नाही.

संजय तिपाले , बीडदलित वस्ती विकासासाठी आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या पळवापळवीला ‘कोल्हे पॅटर्न’ने यंदा चांगलाच दणका दिला आहे. निधीसाठी दरवर्षी होणारी रस्सीखेच यावेळी नाही. त्यामुळे दलित वस्त्यांतील विकासाचा ‘बॅकलाग’ तर भरुन निघेलच शिवाय अनावश्यक खर्चालाही ‘ब्रेक’ लागणार आहे. समाजकल्याणकडून १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून दायित्वाचे ७ कोटी वजा जाता १३ कोटी रुपये खर्चासाठी शिल्लक राहतात. समाजकल्याण विभागाकडून दलित वस्त्यांमध्ये वीज, नाल्या, रस्ता, समाजमंदिर, पाणवठे आदी कामे करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो़ जिल्हा नियोजन समितीकडून हा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात येतो़ गतवर्षी १३ कोटी रुपये आले होते़ मात्र निधी वाटपावरुन चांगलेच राजकारण रंगले होते़ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ अशोक कोल्हे हे रजेवर गेल्यानंतर निधी वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली़ मात्र या निधी वाटपात विशिष्ट भागाचा प्रभाव राहिल्याच्या तक्रारी झाल्या़ दोन वर्षापूर्वी डॉ़ कोल्हे यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता़ तेव्हा त्यांनी ग्रामपंचायतींमधील अनुसूचित जाती जमातीच्या लोकसंख्येच्या अनुषंगाने निधी वाटपाची आॅनलाईन प्रक्रिया राबविली होती़ त्यामुळे दलित वस्ती विकासासाठीच्या निधीपासून वंचित राहिलेल्या गावांना न्याय मिळाला होता़आता यावर्षी देखील अशाच पध्दतीने निधी वाटप होणार आहे़ यासाठी तालुकानिहाय कामांची मागणी करण्यात आली असून चढत्या क्रमाने निधी वाटप केले जाणार आहे़ ज्या गावांना आतापर्यंत निधीच मिळाला नाही, ज्या गावांना अत्यल्प निधी मिळाला अशा गावांना प्राधान्य दिले जाणार आहे़ दरम्यान गटनेते मदनराव चव्हाण यांनी सांगितले की, निधी वाटपात वंचित गावांना न्याय मिळत असेल तर ही चांगलीच बाब आहे़ कामांसाठी आर्थिक व्यवहार करु नयेत, असे आवाहन त्यांनी केले़अनुशेष भरुन निघेलसमाजकल्याण कडून येणारा निधी योग्य पध्दतीने खर्च झाला पाहिजे़ त्यासाठी दोन वर्षापूर्वी आॅनलाईन प्रक्रिया राबविली होती़ यावर्षी ही प्रक्रिया राबविण्याची गरज पडेल, असे वाटत नाही़ कारण बहुतांश पदाधिकाऱ्यांनी सूचविलेली कामे निकष पूर्ण करुनच सूचविली आहेत़ पदाधिकाऱ्यांचे सहकार्य आहे त्यामुळे निधी वाटप योग्य पध्दतीने होईल, असा विश्वास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ अशोक कोल्हे यांनी व्यक्त केला़