शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

अंबाजोगाई नगरपरिषदेत विविध कामांत गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : नगरपरिषदेत स्वछता, पाणीपुरवठा, खरेदी, बांधकाम कंत्राटात मोठा गैरव्यवहार झाला आहे. या सर्व प्रकरणाच्या तक्रारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : नगरपरिषदेत स्वछता, पाणीपुरवठा, खरेदी, बांधकाम कंत्राटात मोठा गैरव्यवहार झाला आहे. या सर्व प्रकरणाच्या तक्रारी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आल्या आहेत. या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी नगरसेवक सारंग पुजारी व नगरसेवक शेख रहीम यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.

अंबाजोगाई नगरपरिषदेने कोरोनाकाळात कामे न करता स्वच्छता विभागातील देयके काढली. शहरातील झारेगल्ली, धनगर गल्ली, बोरूळ तलावाशेजारी असणाऱ्या स्मशानभूमी, एपीजे अब्दुल कलाम सभागृहासमोर विद्युत व्यवस्थेचा ठराव घेऊनही निधी दिला नाही. सॅनिटायझर फवारणी अल्प प्रमाणात केली. साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी फवारणी करणे आवश्यक असताना फॉगिंग मशीन बंद, नादुरुस्त असल्याचे कारण पुढे केले जात आहे. परिणामी शहरात डेंग्यू व चिकनगुनियासारखे आजार वाढू लागले आहेत, असा आरोप करीत पाणीपुरवठा विभागाच्या विहिरी कारखाना परिसरात आहेत. त्या विहिरीतील गाळ काढण्यासाठी १८ लाख ५० हजार रुपये एवढे देयक दाखविल्याचा आरोपही या नगरसेवकांनी केला आहे.

नगरपरिषदेने स्वछता विभागाच्या कामातही मंजुरीपेक्षा ९० लाखांचे देयक अधिक दाखविले आहे. स्वच्छतेचे काम करताना कचरा वाहून नेण्यासाठी ज्या वाहनांचा वापर करण्यात आला. त्या वाहनांचे क्रमांकही कार व जीपचे आहेत. या गैरव्यवहारात पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचे संगनमत असल्याचे म्हटले आहे. नगरपरिषदेत स्वछता विभागासह इतरही विभागांत अनियमितता झाल्याची कागदपत्रे पुराव्यासह जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आल्याचे सारंग पुजारी व शेख रहीम यांनी सांगितले. तर, आ. नमिता मुंदडा यांनीही या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. भूखंड, अनियमित बांधकाम, बोगस ठराव याबाबत संबंधिताविरुद्ध अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. या संदर्भात प्रशासनाने दखल न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही पुजारी व रहीम यांनी दिला आहे.

यावेळी नंदकिशोर मुंदडा व अक्षय मुंदडा उपस्थित होते.

....

केवळ राजकीय दृष्टिकोनातून आरोप

अंबाजोगाई नगरपरिषदेत गेल्या २५ वर्षांपासून मी काम करीत आहे. ही कामे करताना कुठेही कसला गैरव्यवहार झालेला नाही. होणारे आरोप हे केवळ राजकीय दृष्टिकोन समोर ठेवून केले जात आहेत.

-राजकिशोर मोदी, प्रभारी नगराध्यक्ष, अंबाजोगाई.