शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी व्यापारी संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:34 IST

अंबाजोगाई : २६ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन जाहीर केले होते. त्यानंतर ५ तारखेला सर्व बाजारपेठ नेहमीप्रमाणे खुल्या ...

अंबाजोगाई : २६ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन जाहीर केले होते. त्यानंतर ५ तारखेला सर्व बाजारपेठ नेहमीप्रमाणे खुल्या झाल्या. राज्यशासनाने कडक निर्बंध लावल्याने जिल्हा प्रशासनाने तीच री ओढली. त्यामुळे काय उघडे राहणार आणि काय बंद याचा उलगडा न झाल्याने मंगळवारी सकाळी सर्व बाजारपेठ नेहमीप्रमाणे उघडली. परंतु १० वाजेनंतर पोलीस व महसूल यंत्रणा रस्त्यावर उतरल्यानंतर बाजारपेठा बंद करण्यात आल्या.

बाजारपेठा बंद झाल्या तरी वाहनांची गर्दी रोडवर मोठ्या प्रमाणावर दिसून आली. प्रशांत नगर भागातील रस्ता तर रहदारीने जाम झाला होता. कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढू लागल्याने शासनाच्या कडक निर्बंधाची अंमलबजावणी होताना दिसून आली नाही.

तीन तास दुकाने उघडे ठेवण्याचा व्यापाऱ्यांनी स्वतःहून घेतला निर्णय

शासनाच्या कडक निर्बंधातून शेतीविषयक व्यवसायांना सूट देण्यात आली असली तरी मोंढा भागातील कृषी आधारित मशिनरी व्यावसायिकांनी स्वतःहून उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांची भेट घेतली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शेतीविषय दुकाने १० ते १ दरम्यान सुरु ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतल्याचे उपजिल्हाधिकारी झाडके यांनी सांगितले. असाच निर्णय इतर व्यापाऱ्यांनी घेतला तर कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येऊ शकतो असे आरोग्य यंत्रणेला वाटते.मशिनरी संघटनेच्या वतीने व्यापारी धनराज सोळंकी व इतरांनी पुढाकार घेतला.