शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
3
लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
4
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
5
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
6
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
7
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
8
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
9
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
10
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
13
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
14
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
15
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
16
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
17
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
18
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
19
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
20
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...

कोरोनाकाळात पुरुषांचाही छळ, पत्नीविरोधात पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : पतीने पत्नीचा छळ केल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत; परंतु पतीचा छळ केल्याच्या घटनादेखील समोर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : पतीने पत्नीचा छळ केल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत; परंतु पतीचा छळ केल्याच्या घटनादेखील समोर आल्या आहेत. बीड जिल्ह्यात दीड वर्षात तब्बल ३१ तक्रारी भरोसा सेलकडे प्राप्त झाल्या असून, यामध्ये कोरोना काळातील तक्रारींचादेखील समावेश आहे. तर काही प्रकरणांत तडजोडदेखील झाली आहे.

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे शासनाकडे वेळोवेळी लॉकडाऊन तसेच संचारबंदीसारखे निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे अनेक व्यवसाय, उद्योग धंदे बंद आहेत. या परिस्थितीमुळे बहुतांश कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटली असून, त्याचसोबत इतर अडचणींचादेखील सामना करावा लागत आहे. त्यामुळे पर्यायाने अनेक जण घरी बसून होते. या काळात काही कुटुंबातील कलह वाढला असून, छोट्या-छोट्या कारणांवरून वाद टोकाला गेला आहे. कौटुंबिक हिंसाचारच्या घटनांमध्येदेखील वाढ झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पती व सासरच्या मंडळीकडून पत्नीचा छळ झाल्याच्या तक्रारींची संख्या जास्त आहे; मात्र त्याच तुलनेत पत्नी व तिच्या माहेरच्यांकडून छळ होत असल्याच्या जवळपास ३१ तक्रारी भरोसा सेल व महिला मुलांकरिता साहाय्य कक्षात प्राप्त झालेल्या आहेत. या प्रकरणांमध्ये तडजोडी होऊन अनेक संसार पुन्हा नव्याने उभा राहतात, तर काही प्रकरणांत गुन्हे दाखल होऊन पती-पत्नी विभक्त होतात.

...........

सहवास वाढला, भांडणेही वाढली

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन व संचारबंदी करण्यात आली. त्यामुळे सर्वांनाच घरात बसून राहावे लागत होते, त्यामुळे सहवास वाढला असला तरी वादांचे प्रमाणही वाढले आहे. हे वाद विकोपाला जात आहेत.

...

पुरुषांच्या महिलांविरुद्ध तक्रारी

३१

महिलांच्या पुरुषांविरुद्ध दीड वर्षातील तक्रारी

१२४४

भरोसा व महिला मुलांकरिता साहाय्य कक्ष दीड वर्षातील एकूण तक्रारी

१२७६

७६५ जणांचं पुन्हा जमलं

बीड येथील भरोसा सेल तसेच महिला व मुलांकरिता साहाय्य कक्षात दीड वर्षात जवळपास १२७६ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. प्रत्येक तक्रारीच्यासंदर्भात दोन्ही विभागात सुनावणी होऊन, त्यासंदर्भातील अडचणी व वाद मिटवण्यासाठी समजून सांगत समुपदेशन करून पुन्हा संसार सुरू करण्यासाठी या विभागांकडून प्रयत्न केला जातो. त्यामध्ये बहुतांश वेळा यशदेखील मिळते. झालेल्या तक्रारींपैकी जवळपास ६० ते ७० टक्के प्रकरणांमध्ये तडजोड होऊन संसार पुन्हा उभे राहतात. यामुळे मुलांची होणारी वाताहात थांबते. दोन्ही कुटुंबातील कटुता कमी होण्यास मदत होते. यामागे दोन्ही कक्षातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असतो.

....

भांडणाची ही काय कारणं झाली

पती किंवा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणे, फोनचा अतिवापर करणे, घरातील कामे येत नाहीत, पतीला व्यवस्थित न बोलणे, सतत माहेरी जाणे, सासू-सासऱ्यांसोबत वाद घालणे, विनाकारण भांडण करणे यांसह अनेक छोट्या-छोट्या कारणांमुळे कुटुंब विभक्त होण्याची कारणे आहेत.

...

संसार जुळवण्यासाठी प्रयत्न

आमच्याकडे घरगुती वादातून विभक्त होण्यासाठी पती व पत्नी अर्ज करतात. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्यांचेदेखील समुपदेशन केले जाते. त्यामुळे अनेक संसार पुन्हा उभे राहतात, अशी माहिती भरोसा सेलप्रमुख एस. म्हेत्रे व महिला व बालक साहाय्य कक्षाचे गोकुळ धस यांनी दिली.