शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोरोनाकाळात पुरुषांचाही छळ, पत्नीविरोधात पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : पतीने पत्नीचा छळ केल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत; परंतु पतीचा छळ केल्याच्या घटनादेखील समोर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : पतीने पत्नीचा छळ केल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत; परंतु पतीचा छळ केल्याच्या घटनादेखील समोर आल्या आहेत. बीड जिल्ह्यात दीड वर्षात तब्बल ३१ तक्रारी भरोसा सेलकडे प्राप्त झाल्या असून, यामध्ये कोरोना काळातील तक्रारींचादेखील समावेश आहे. तर काही प्रकरणांत तडजोडदेखील झाली आहे.

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे शासनाकडे वेळोवेळी लॉकडाऊन तसेच संचारबंदीसारखे निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे अनेक व्यवसाय, उद्योग धंदे बंद आहेत. या परिस्थितीमुळे बहुतांश कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटली असून, त्याचसोबत इतर अडचणींचादेखील सामना करावा लागत आहे. त्यामुळे पर्यायाने अनेक जण घरी बसून होते. या काळात काही कुटुंबातील कलह वाढला असून, छोट्या-छोट्या कारणांवरून वाद टोकाला गेला आहे. कौटुंबिक हिंसाचारच्या घटनांमध्येदेखील वाढ झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पती व सासरच्या मंडळीकडून पत्नीचा छळ झाल्याच्या तक्रारींची संख्या जास्त आहे; मात्र त्याच तुलनेत पत्नी व तिच्या माहेरच्यांकडून छळ होत असल्याच्या जवळपास ३१ तक्रारी भरोसा सेल व महिला मुलांकरिता साहाय्य कक्षात प्राप्त झालेल्या आहेत. या प्रकरणांमध्ये तडजोडी होऊन अनेक संसार पुन्हा नव्याने उभा राहतात, तर काही प्रकरणांत गुन्हे दाखल होऊन पती-पत्नी विभक्त होतात.

...........

सहवास वाढला, भांडणेही वाढली

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन व संचारबंदी करण्यात आली. त्यामुळे सर्वांनाच घरात बसून राहावे लागत होते, त्यामुळे सहवास वाढला असला तरी वादांचे प्रमाणही वाढले आहे. हे वाद विकोपाला जात आहेत.

...

पुरुषांच्या महिलांविरुद्ध तक्रारी

३१

महिलांच्या पुरुषांविरुद्ध दीड वर्षातील तक्रारी

१२४४

भरोसा व महिला मुलांकरिता साहाय्य कक्ष दीड वर्षातील एकूण तक्रारी

१२७६

७६५ जणांचं पुन्हा जमलं

बीड येथील भरोसा सेल तसेच महिला व मुलांकरिता साहाय्य कक्षात दीड वर्षात जवळपास १२७६ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. प्रत्येक तक्रारीच्यासंदर्भात दोन्ही विभागात सुनावणी होऊन, त्यासंदर्भातील अडचणी व वाद मिटवण्यासाठी समजून सांगत समुपदेशन करून पुन्हा संसार सुरू करण्यासाठी या विभागांकडून प्रयत्न केला जातो. त्यामध्ये बहुतांश वेळा यशदेखील मिळते. झालेल्या तक्रारींपैकी जवळपास ६० ते ७० टक्के प्रकरणांमध्ये तडजोड होऊन संसार पुन्हा उभे राहतात. यामुळे मुलांची होणारी वाताहात थांबते. दोन्ही कुटुंबातील कटुता कमी होण्यास मदत होते. यामागे दोन्ही कक्षातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असतो.

....

भांडणाची ही काय कारणं झाली

पती किंवा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणे, फोनचा अतिवापर करणे, घरातील कामे येत नाहीत, पतीला व्यवस्थित न बोलणे, सतत माहेरी जाणे, सासू-सासऱ्यांसोबत वाद घालणे, विनाकारण भांडण करणे यांसह अनेक छोट्या-छोट्या कारणांमुळे कुटुंब विभक्त होण्याची कारणे आहेत.

...

संसार जुळवण्यासाठी प्रयत्न

आमच्याकडे घरगुती वादातून विभक्त होण्यासाठी पती व पत्नी अर्ज करतात. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्यांचेदेखील समुपदेशन केले जाते. त्यामुळे अनेक संसार पुन्हा उभे राहतात, अशी माहिती भरोसा सेलप्रमुख एस. म्हेत्रे व महिला व बालक साहाय्य कक्षाचे गोकुळ धस यांनी दिली.