शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमांनी काेविड रुग्णांचे मनोधैर्य वाढवणाऱ्या बातम्या द्याव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:33 IST

अंबाजोगाई : सध्या कोविड संक्रमणाचा काळ हा आपल्या सर्वांच्याच दुर्दैवाने अतिशय वाईट असून या काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन समाज ...

अंबाजोगाई : सध्या कोविड संक्रमणाचा काळ हा आपल्या सर्वांच्याच दुर्दैवाने अतिशय वाईट असून या काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन समाज माध्यमांनी कोविड रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचे मनोधैर्य वाढवणाऱ्या बातम्या प्रसिद्ध कराव्यात, असे कळकळीचे आवाहन मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार यांनी केले आहे.

सध्या बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यात कोविड पॉझिटिव्ह रुग्ण निघण्याची संख्या सर्वाधिक आहे. तालुक्यातील शेकडो रुग्ण दररोज कोविड उपचारासाठी स्वारातीच्या रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. शिवाय अंबाजोगाई येथील कोविड उपचाराबद्दल रुग्ण आणि नातेवाइकांमध्ये विश्वासार्हता निर्माण झाल्यामुळे या परिसरातील सात-आठ तालुक्यांतील रुग्ण येथे उपचारासाठी येत आहेत.

येथे कोविडच्या उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णांमध्ये वयोवृद्धांची संख्या जास्त आहे. आपल्या कुटुंबीयांना सोडून दूर राहून प्रत्येक रुग्णाला कोविडचा उपचार घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत कोविडविषयी भीती दर्शविणाऱ्या बातम्या समाज माध्यमातून प्रसिद्ध होत राहिल्या तर उपचार घेत असलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण होते. व त्याचा परिणाम त्यांचे आरोग्य बिघडण्यासाठी होतो. याउलट जर सकारात्मक बातम्या प्रसिद्ध झाल्या तर त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

वैद्यकीय डॉक्टर, कर्मचारीही जातात डिप्रेशनमध्ये

अंबाजोगाई येथीलच नव्हेतर, संपूर्ण राज्यातील डॉक्टर, परिचारिका व इतर वैद्यकीय कर्मचारी गेल्या वर्षभरापासून आपले, आपल्या कुटुंबीयांचे भवितव्य विसरून सतत कोविड रुग्णांच्या सेवेत काम करीत आहेत. हे करताना अनेक डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही कोविडचा प्रादुर्भाव झाला. हे सर्व विसरून ते परत रुग्ण सेवेत कार्यरत आहेत. त्यामुळे कोविड रुग्ण सेवेबद्दल सकारात्मक बातम्या समाज माध्यमात उमटल्या तर त्यांचे मनोधैर्य वाढेल.

निरंक मृत्यूची हवी बातमी

कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना कोविडसोबत विविध व्याधी असतात. अनेक वयोवृद्ध रुग्ण या आजाराला बळी पडत आहेत. एखाद्या दिवशी जास्त रुग्ण मृत्यू पावले तर त्याची बातमी येते; मात्र ज्या दिवशी एकही मृत्यू होत नाही त्याचीही बातमी यायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले.