शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

मानवलोकतर्फे सेंद्रिय सोयाबीन, कापूस शेती दिन साजरा - A - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:37 IST

धारूर : मानवलोक संस्थेच्या वतीने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी व सामान्य शेतकरी सेंद्रिय शेतीकडे प्रोत्साहित व्हावा, याकरिता मानवलोकचा सेंद्रिय ...

धारूर : मानवलोक संस्थेच्या वतीने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी व सामान्य शेतकरी सेंद्रिय शेतीकडे प्रोत्साहित व्हावा, याकरिता मानवलोकचा सेंद्रिय शेती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत सेंद्रिय सोयाबीन व कापूस दिन साजरा करण्यात आला. सेंद्रिय शेती करण्यासाठी मानवलोक शेतकऱ्यांना मार्गदर्शन व मदत करीत आहे. कोळपिंपरी येथील सेंद्रिय शेती करणारे सुरेश सोळंके यांच्या सेंद्रिय सोयाबीन पिकांमध्ये व हासनाबाद येथील राहुल नखाते यांच्या सेंद्रिय कापूस पिकांमध्ये अंबाजोगाई, परळी, केज, धारूर या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्रक्षेत्र आयोजित केली होती. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या सोयाबीन व कापूस पिकांची निरीक्षणे दाखवण्यात आली. मानवलोकमार्फत देण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब करीत कामगंध सापळे, सापळा पिके, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, चिकट सापळे इत्यादी यांचा अवलंब केल्यामुळे सेंद्रिय सोयाबीन पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रणात दिसून आला. अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे सेंद्रिय शेती शक्य आहे, असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले. सेंद्रिय शेती करण्यासाठीच्या अडचणी व शेतकऱ्यांच्या मनात असणाऱ्या समस्या ओळखून सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मानवलोक सेंद्रिय शेती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई उपविभागीय कृषी अधिकारी एस. डी. शिनगारे, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी, अंबाजोगाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. जायवार नरेशकुमार, अंबाजोगाई कृषी सहायक पंडित काकडे, मानवलोकचे लालासाहेब आगळे, अण्णा रोहम यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

... ५ हजार हेक्टरचे उद्दिष्ट

सेंद्रिय शेतीला बदलत्या हवामानास पूरक व जगभरातील ग्राहकांकडून प्रचंड मागणी आहे. शेतीमधील खर्चाचे प्रमाण पाहता शेती परवडत नाही, यामुळे कमी खर्चाची शेती म्हणून सेंद्रिय शेतीला ओळखले जाते. मानवलोकच्या पुढाकाराने अंबाजोगाई, धारूर, केज व परळी या भागातील ४५० एकरवर सेंद्रिय शेती शेतकरी करतात. त्यांना मार्गदर्शन व सहकार्य मानवलोक करीत आहे. पुढील तीन वर्षांत ५ हजार हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्यासाठी मानवलोक प्रयत्नशील आहे.