शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

४१ वर्षांत १५ वेळा भरले मांजरा धरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:38 IST

अविनाश मुडेगावकर लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : बीड-लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतील १७२ गावांची तहान भागविणारे मांजरा धरण ...

अविनाश मुडेगावकर

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : बीड-लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतील १७२ गावांची तहान भागविणारे मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे ग्रामीण व शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटला आहे. धरणाच्या उभारणीपासून गेल्या ४१ वर्षांत धरण १५ वेळा भरले आहे.

मांजरा धरणाची उभारणी १९८० मध्ये झाली. धरणाची क्षमता २२८ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. गेल्या ४१ वर्षांत आजपर्यंत १५ वेळा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे, तर धरणाच्या माध्यमातून बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील १८ हजार २२३ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येते. मात्र, आता गावोगावचा पाणीपुरवठा या धरणावरच अवलंबून असल्याने सिंचनापेक्षा पाणीपुरवठा योजनाच धरणाचा मोठा उपसा करीत आहेत.

धरणाच्या परिसरात परतीचा पाऊस समाधानकारक झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मांजरा धरणाच्या वरच्या बाजूस नदीच्या उगमस्थानापासून १४ बंधारे आणि लहान-मोठे २६ तलाव निर्माण करण्यात आले आहेत. तरीही यंदा धरण भरले आहे. मांजरा धरणाची संपूर्ण पाणी साठवण क्षमता २२४.०८३ दशलक्ष घनमीटर आहे. त्यामुळे मोठे शेतकरी व नेत्यांची पाणी शेतात ओढण्याची स्पर्धाच लागली आहे. बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील १७२ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या या धरणाची सुरक्षा राखण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. सध्या मांजरा धरण शंभर टक्के भरल्याने धरणाचे सहा दरवाजे उघडून नदीपात्रात व धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.

...

वर्षभरातच संपला धरणातील ८० टक्के पाणीसाठा

मांजरा धरण गेल्या वर्षीही पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र, पाणीपुरवठा योजना व सिंचनासाठी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे धरण ८० टक्के रिकामे झाले. पावसाने ओढ दिली असती, तर अंबाजोगाई, केज, धारूर, लातूर, कळंबसह इतर गावांमध्ये पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला असता. मात्र, पाऊस जोरदार झाल्याने पाणी प्रश्न मार्गी लागला आहे.

शहराला आठ दिवसांआड पाणीपुरवठा

अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात मुबलक पाणी साठा असला तरी शहराला आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. शहरातील पाणी वितरण व्यवस्था सक्षम नाही. त्यामुळे चार दिवसांआड किंवा सहा दिवसांआड पाणीपुरवठा होऊ शकत नाही. मागे एकदा चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न नगरपालिकेने केला; परंतु तो यशस्वी झाला नाही. वितरण व्यवस्था सक्षम नसल्याच्या कारणामुळे मुबलक पाणीसाठा असूनही अंबाजोगाईकरांना आठ दिवसांचे पाणी साठवून ठेवावे लागत आहे. परिणामी डासोत्पत्ती होऊन डेंग्यू आजाराचे रुग्ण वाढले आहेत.

....