शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

४१ वर्षांत १५ वेळा भरले मांजरा धरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:38 IST

अविनाश मुडेगावकर लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : बीड-लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतील १७२ गावांची तहान भागविणारे मांजरा धरण ...

अविनाश मुडेगावकर

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : बीड-लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतील १७२ गावांची तहान भागविणारे मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे ग्रामीण व शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटला आहे. धरणाच्या उभारणीपासून गेल्या ४१ वर्षांत धरण १५ वेळा भरले आहे.

मांजरा धरणाची उभारणी १९८० मध्ये झाली. धरणाची क्षमता २२८ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. गेल्या ४१ वर्षांत आजपर्यंत १५ वेळा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे, तर धरणाच्या माध्यमातून बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील १८ हजार २२३ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येते. मात्र, आता गावोगावचा पाणीपुरवठा या धरणावरच अवलंबून असल्याने सिंचनापेक्षा पाणीपुरवठा योजनाच धरणाचा मोठा उपसा करीत आहेत.

धरणाच्या परिसरात परतीचा पाऊस समाधानकारक झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मांजरा धरणाच्या वरच्या बाजूस नदीच्या उगमस्थानापासून १४ बंधारे आणि लहान-मोठे २६ तलाव निर्माण करण्यात आले आहेत. तरीही यंदा धरण भरले आहे. मांजरा धरणाची संपूर्ण पाणी साठवण क्षमता २२४.०८३ दशलक्ष घनमीटर आहे. त्यामुळे मोठे शेतकरी व नेत्यांची पाणी शेतात ओढण्याची स्पर्धाच लागली आहे. बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील १७२ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या या धरणाची सुरक्षा राखण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. सध्या मांजरा धरण शंभर टक्के भरल्याने धरणाचे सहा दरवाजे उघडून नदीपात्रात व धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.

...

वर्षभरातच संपला धरणातील ८० टक्के पाणीसाठा

मांजरा धरण गेल्या वर्षीही पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र, पाणीपुरवठा योजना व सिंचनासाठी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे धरण ८० टक्के रिकामे झाले. पावसाने ओढ दिली असती, तर अंबाजोगाई, केज, धारूर, लातूर, कळंबसह इतर गावांमध्ये पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला असता. मात्र, पाऊस जोरदार झाल्याने पाणी प्रश्न मार्गी लागला आहे.

शहराला आठ दिवसांआड पाणीपुरवठा

अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात मुबलक पाणी साठा असला तरी शहराला आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. शहरातील पाणी वितरण व्यवस्था सक्षम नाही. त्यामुळे चार दिवसांआड किंवा सहा दिवसांआड पाणीपुरवठा होऊ शकत नाही. मागे एकदा चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न नगरपालिकेने केला; परंतु तो यशस्वी झाला नाही. वितरण व्यवस्था सक्षम नसल्याच्या कारणामुळे मुबलक पाणीसाठा असूनही अंबाजोगाईकरांना आठ दिवसांचे पाणी साठवून ठेवावे लागत आहे. परिणामी डासोत्पत्ती होऊन डेंग्यू आजाराचे रुग्ण वाढले आहेत.

....