शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
3
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
4
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
5
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
6
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
7
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
8
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
9
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
10
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
11
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
12
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
13
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
14
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
15
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
17
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
18
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
19
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
20
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!

४१ वर्षांत १५ वेळा भरले मांजरा धरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:38 IST

अविनाश मुडेगावकर लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : बीड-लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतील १७२ गावांची तहान भागविणारे मांजरा धरण ...

अविनाश मुडेगावकर

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : बीड-लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतील १७२ गावांची तहान भागविणारे मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे ग्रामीण व शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटला आहे. धरणाच्या उभारणीपासून गेल्या ४१ वर्षांत धरण १५ वेळा भरले आहे.

मांजरा धरणाची उभारणी १९८० मध्ये झाली. धरणाची क्षमता २२८ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. गेल्या ४१ वर्षांत आजपर्यंत १५ वेळा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे, तर धरणाच्या माध्यमातून बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील १८ हजार २२३ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येते. मात्र, आता गावोगावचा पाणीपुरवठा या धरणावरच अवलंबून असल्याने सिंचनापेक्षा पाणीपुरवठा योजनाच धरणाचा मोठा उपसा करीत आहेत.

धरणाच्या परिसरात परतीचा पाऊस समाधानकारक झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मांजरा धरणाच्या वरच्या बाजूस नदीच्या उगमस्थानापासून १४ बंधारे आणि लहान-मोठे २६ तलाव निर्माण करण्यात आले आहेत. तरीही यंदा धरण भरले आहे. मांजरा धरणाची संपूर्ण पाणी साठवण क्षमता २२४.०८३ दशलक्ष घनमीटर आहे. त्यामुळे मोठे शेतकरी व नेत्यांची पाणी शेतात ओढण्याची स्पर्धाच लागली आहे. बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील १७२ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या या धरणाची सुरक्षा राखण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. सध्या मांजरा धरण शंभर टक्के भरल्याने धरणाचे सहा दरवाजे उघडून नदीपात्रात व धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.

...

वर्षभरातच संपला धरणातील ८० टक्के पाणीसाठा

मांजरा धरण गेल्या वर्षीही पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र, पाणीपुरवठा योजना व सिंचनासाठी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे धरण ८० टक्के रिकामे झाले. पावसाने ओढ दिली असती, तर अंबाजोगाई, केज, धारूर, लातूर, कळंबसह इतर गावांमध्ये पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला असता. मात्र, पाऊस जोरदार झाल्याने पाणी प्रश्न मार्गी लागला आहे.

शहराला आठ दिवसांआड पाणीपुरवठा

अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात मुबलक पाणी साठा असला तरी शहराला आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. शहरातील पाणी वितरण व्यवस्था सक्षम नाही. त्यामुळे चार दिवसांआड किंवा सहा दिवसांआड पाणीपुरवठा होऊ शकत नाही. मागे एकदा चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न नगरपालिकेने केला; परंतु तो यशस्वी झाला नाही. वितरण व्यवस्था सक्षम नसल्याच्या कारणामुळे मुबलक पाणीसाठा असूनही अंबाजोगाईकरांना आठ दिवसांचे पाणी साठवून ठेवावे लागत आहे. परिणामी डासोत्पत्ती होऊन डेंग्यू आजाराचे रुग्ण वाढले आहेत.

....