शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

ताणतणाव टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:32 IST

गेवराई : आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेत नाहीत. आपली जीवनशैली बदलल्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात ताणतणाव निर्माण ...

गेवराई : आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेत नाहीत. आपली जीवनशैली बदलल्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात ताणतणाव निर्माण होत आहेत. हे ताणतणाव कमी करण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य बदल करणे आवश्यक आहे. पुरेशी झोप, वेळेवर जेवण, व्यायाम आणि आपले छंद जोपासणे यामुळे आपण ताणतणावाचे व्यवस्थापन करू शकतो, असे प्रतिपादन जिल्हा मानसिक आरोग्य विभागाचे डॉ. सुदाम मोगले यांनी केले.

येथील र. भ. अट्टल महाविद्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समिती व आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘ताणतणावाचे व्यवस्थापन’ या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. रजनी शिखरे कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या. मंचावर रुग्णालयाचे डॉ. जाधव, डॉ. मते, उपप्राचार्य डॉ. विजय सांगळे, डॉ. प्रशांत पांगरीकर, प्रा. अशोक जगताप उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. मते यांनी केले. आपल्या प्रमुख भाषणात डॉ. मोगले म्हणाले की, युवकांमध्ये नैराश्य वाढत आहे. वाढत्या अपेक्षा या मानसिक आजारासाठी कारणीभूत ठरतात. भूक न लागणे, मानसिक केंद्रीकरण न होणे, ही ताणतणावाची लक्षणे आहेत. हृदयाचे विकार, कर्करोगासारखे गंभीर स्वरूपाचे आजार यामुळे निर्माण होतात. असे गंभीर आजार होऊ नयेत म्हणून योग्य जीवनशैली स्वीकारावी, असेही ते म्हणाले. अध्यक्षीय समारोप प्राचार्या डॉ. रजनी शिखरे यांनी केला. सूत्रसंचालन डॉ. सुदर्शना बढे यांनी केले. डॉ. वृषाली गव्हाणे यांनी आभार मानले. शिबिरास महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.