शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

ताणतणाव टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:30 IST

अट्टल कॉलेजमध्ये शिबिर : ताणतणाव व्यवस्थापनावर मार्गदर्शन गेवराई : आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेत नाही. ...

अट्टल कॉलेजमध्ये शिबिर : ताणतणाव व्यवस्थापनावर मार्गदर्शन

गेवराई : आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेत नाही. आपली जीवनशैली बदलल्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात ताणतणाव निर्माण होत आहेत. हे ताणतणाव कमी करण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य बदल करणे आवश्यक आहे. पुरेशी झोप, वेळेवर जेवण, व्यायाम आणि आपले छंद जोपासणे यामुळे आपण ताणतणावाचे व्यवस्थापन करू शकतो, असे प्रतिपादन जिल्हा मानसिक आरोग्य विभागाचे डॉ. सुदाम मोगले यांनी केले.

येथील र. भ. अट्टल महाविद्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समिती व आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘ताणतणावाचे व्यवस्थापन’ या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. रजनी शिखरे कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या. मंचावर रुग्णालयाचे डॉ. जाधव, डॉ. मते, उपप्राचार्य डॉ. विजय सांगळे, डॉ. प्रशांत पांगरीकर, प्रा. अशोक जगताप उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. मते यांनी केले. प्रमुख भाषणात डॉ. मोगले म्हणाले की, युवकांमध्ये नैराश्य वाढत आहे. वाढत्या अपेक्षा या मानसिक आजारासाठी कारणीभूत ठरतात. भूक न लागणे, मानसिक केंद्रीकरण न होणे, ही ताणतणावाची लक्षणे आहेत. हृदयाचे विकार, कर्करोगासारखे गंभीर स्वरूपाचे आजार यामुळे निर्माण होतात. असे गंभीर आजार होऊ नयेत म्हणून योग्य जीवनशैली स्वीकारावी, असेही ते म्हणाले. अध्यक्षीय समारोप प्राचार्या डॉ. रजनी शिखरे यांनी केला. सूत्रसंचालन डॉ. सुदर्शना बढे यांनी केले. डॉ. वृषाली गव्हाणे यांनी आभार मानले. शिबिराला महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.