शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

माजलगावकरांना मिळेना दहा-दहा दिवस पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:35 IST

माजलगाव : येथील चिंचगव्हाण येथील जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार खंडित होत आहे. याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर ...

माजलगाव : येथील चिंचगव्हाण येथील जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार खंडित होत आहे. याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. यामुळे सध्या माजलगावकरांना दहा-दहा दिवस पाणी मिळत नाही. अनेक भागातील नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

माजलगाव धरणाजवळ माजलगाव शहर व अकरा खेड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राच्या बाजूलाच असलेल्या १३२ के.व्ही. केंद्रातून वीजपुरवठा करण्यात येतो. परंतु मागील आठ दिवसांपासून या ठिकाणी वारंवार काही ना काही बिघाड होत आहे. त्यातच विजेचा लपंडाव सुरू आहे. या लपंडावामुळे येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील पाण्याच्या मोटारी वारंवार बंद होत आहेत. पाण्याची टाकी भरायला वेळ लागत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात असते. असे असताना केवळ विजेच्या लपंडावामुळे शहरातील नागरिकांना दहा ते बारा दिवसाला पाणी मिळत आहे.

-----

आम्ही वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही त्यांना बिघाड सापडत नाही. यामुळे शहरातील नागरिकांना पाणी उशिरा व कमी वेळ मिळू लागले आहे. लवकरात लवकर बिघाड दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल.

-शेख मंजूर, नगराध्यक्ष, माजलगाव नगरपरिषद.