शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाचा छळ करतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:04 IST

बीड : भाजप सरकारने मिळवून दिलेले आरक्षण महाविकास आघाडी सरकारला टिकवून ठेवता आलेले नाही. हे सरकार मराठा आरक्षणसंदर्भात न्यायालयात ...

बीड : भाजप सरकारने मिळवून दिलेले आरक्षण महाविकास आघाडी सरकारला टिकवून ठेवता आलेले नाही. हे सरकार मराठा आरक्षणसंदर्भात न्यायालयात भक्कमपणे बाजू न मांडून एक प्रकारे छळच करत असल्याचा आरोप पुणे येथील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रघुनाथ चित्रे यांनी पत्रकार परिषदेत केला. पुणे ते साष्टंपिंपळगाव मराठा संघर्ष यात्रा काढण्यात आली असून गुरूवारी बीडमध्ये यात्रेचे स्वागत करण्यात आले.

क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजीत पत्रकार परिषदेस बीड येथील समन्वयक भानुदास जाधव, राजेंद्र मस्के, अशोक हिंगे, गोरख शिंदे, विनोद सावंत, अशोक सुखवसे, यांची यावेळी उपस्थिती होती. पुढे चित्रे म्हणाले, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रात ५८ मूकमोर्चे अत्यत शिस्तीने संयमाने व शांततेने निघाले. मराठ्यांनी जगामध्ये आदर्श निर्माण केला आहे. यापुढे देखील मराठा समाजास संयम राखूनच लढाई करावी लागणार आहे. मराठा क्रांती मोर्चा पुढेही शांततेच्या मार्गानेच जाणार आहे. साष्ठपिंपळगाव येथे मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि राज्यातील तरूणांचे नैराश घालविण्यासाठी संघर्ष यात्रा काढण्यात आलेली आहे. आम्ही पुणे येथून बीड आणि मालेगाव येथील आंदोलकांना भेट देवून साष्टंपिंपळगावला जाणार आहोत.

केवळ आरक्षणच नाही तर विद्यार्थ्यांचे प्रवेश आणि कोरोनाच्या आधीच्या काळात झालेल्या नोकर भरतीत निवड झालेल्या मराठा तरूणांना अद्याप नियुक्ती दिलेली नाही. तसे पाहिले तर त्यावेळीच नियुक्ती देणे आवश्यक होते, परंतु ते जाणून बुजून त्रास देण्याचा प्रकार आहे. यामुळे मराठा समाजाच्या मनात संतोष पसरत आहे. सरकारमध्ये असलेले मंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या पंरतु ते टोलवाटोलवी करत आहेत. वकील आणि सरकारमध्ये कसलाही समन्वय दिसून येत नाही. यामुळे सरकारने आता खंबीरपणे बाजु मांडण्यासाठी प्रयत्न केला नाही तर याचे परिणाम भोगण्यास सरकारने तयार रहावे, असेही चित्रे म्हणाले.