शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पद्मशाली संघमतर्फे महर्षी मार्कंडेय ऋषी जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:29 IST

पद्मशाली संघमतर्फे महर्षी मार्कंडेय ऋषी जयंती बीड : येथील पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत महर्षी मार्कंडेय भगवान यांची जयंती उत्साहात ...

पद्मशाली संघमतर्फे महर्षी मार्कंडेय ऋषी जयंती

बीड : येथील पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत महर्षी मार्कंडेय भगवान यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळी साईनाथ आरटवार यांच्या हस्ते सुभाष रोड डीपी रोडवरील मार्कंडेय शिव मंदिरात अभिषेक व पूजन करून अभिवादन करण्यात आले, तसेच यावेळी उपस्थित सर्व समाज बांधवांनी महर्षी मार्कंडेय यांच्या मूर्तीचे पूजन व आरती करून अभिवादन केले.

तालखेड येथे क्लबवर धाड, जुगाऱ्यांमध्ये डॉक्टर, शिक्षकाचा समावेश

माजलगाव : तालुक्यातील तालखेड येथील कैलास मोरे यांच्या शेतातील गोठ्यात तिरट नावाचा जुगार खेळताना माजलगाव ग्रामीण पोलिसांनी शनिवारी दुपारी धाड टाकून ५ आरोपींविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडील १३ हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली. आरोपींमध्ये एक डॉक्टर व शिक्षकाचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

उर्दूच्या बालवाडीताईंना सहा वर्षांपासून मानधनच नाही

माजलगाव : अल्पसंख्याक समाजाला विशेष म्हणजे उर्दू भाषिक पाल्यांना राष्ट्रीय शैक्षणिक प्रवाहामध्ये सामावून घेण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा नमुना समोर आला आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात असलेल्या ३३ उर्दू बालवाड्यांमध्ये काम करणाऱ्या ताईंना तब्बल सहा वर्षांपासून मानधनच देण्यात आले नसल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत सतत पाठपुरावा करूनदेखील प्राथमिक शिक्षण विभागाची उदासीनता दिसून येत असल्याने येत्या १ मार्च रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उर्दू ॲक्शन कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.

जय भवानी कारखान्यात ३ लाख मेट्रिक टन ऊस गाळप

गेवराई : गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांचा केंद्रबिंदू असलेल्या जय भवानी सहकारी साखर कारखान्याच्या २०२०-२१च्या दुसऱ्या टप्प्यातील चालू हंगामामध्ये १०४ दिवसांत ३ लाख मेट्रिक टन गाळप करून जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी ९.५१ टक्के साखर उतारा मिळवत २,८२,६७५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. त्यामुळे यंदा जय भवानी कारखान्याने साखर उतारा व ऊस दरात जिल्ह्यात अव्वल स्थान निर्माण केले आहे.