शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
3
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
4
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
5
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
6
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
7
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
8
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
9
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
10
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
11
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
12
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
13
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
14
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
15
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
16
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
17
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
18
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
19
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
20
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प

ऑनलाइनच्या घोळात हुशार शेतकऱ्यांना लॉटरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:37 IST

नृसिंह सूर्यवंशी घाटनांदूर : कृषी विभागाच्या सर्वच योजना सध्या ऑनलाइन झाल्या असून कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असलेला हुशार शेतकरी ...

नृसिंह सूर्यवंशी

घाटनांदूर : कृषी विभागाच्या सर्वच योजना सध्या ऑनलाइन झाल्या असून कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असलेला हुशार शेतकरी सतत ऑनलाइनवर राहून सर्वच योजनांचा लाभ घेत असला तरीही छोटे व गरीब शेतकरी या विविध योजनांच्या लाभांपासून वंचित राहत आहे. काय योजना आहेत, कुठे चौकशी करायची, ऑनलाइन कसे करायचे, याची तिळमात्रही कल्पना नसल्याने कृषी विभागाच्या योजनेपासून लहान शेतकरी अद्यापही कोसो दूर आहेत.

केंद्र शासन, राज्य शासनाच्या शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना आहेत. कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर कृषीच्या सर्वच योजनांची माहिती आहे. त्यात वेळोवेळी सुधारणा होते. परंतु कृषी विभागाच्या शासकीय योजनांची माहिती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नाही. कारण कृषी सहायक मंडळ कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेच नाहीत. प्रत्यक्ष भेट देण्यापेक्षा सोशल मीडियावर मेसेज टाकून कृषी विभाग नामानिराळे राहत आहे. पूर्वी कृषी विभागाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून सातबारा, आठ अ दिल्यानंतर योजनेचा फायदा मिळत असे. मात्र, हल्ली ऑनलाइनच्या नावाखाली ज्यांना योजना आल्याचे कळते, तेच लोक घरातील चारचार व्यक्तींच्या नावे ऑनलाइन अर्ज सादर करतात. ऑनलाइनमध्ये घोळ होत नाही, असे म्हटले जात असताना एकाच घरातीत तीन- तीन चार-चार लोकांना योजना मिळतेच कशी, हे मोठे गौडबंगाल असल्याचे वंचित शेतकरी सांगतात. एखाद्या शेतकऱ्याला कुठल्या एका योजनेचा लाभ मिळाला तर दुसरी योजना मिळू शकत नाही, असे म्हटले जाते. मग अशा वेळी संगणकही चुकतो का हा प्रश्न आहे.

एक हेक्टरच्या आत जमिनी असलेले शेतकऱ्याच्या बांधावर कृषी विभाग त्यातील कृषी सहायक, कर्मचारी, अधिकारी अद्याप पोहोचलेच नाहीत. पुढारी त्यांचे बगलबच्चे, संपर्कात असलेले बोटावर मोजण्याइतपत हुशार शेतकरी सोडले तर कोणालाही कृषी योजनांची माहिती नाही. ऑनलाइन कसे करतात, याचा अनुल्लेखही लहान, गरीब शेतकऱ्यांच्या गावी नाही. कृषी विभाग फक्त सोशल मीडियावर माहिती टाकून हात झटकते. ऑनलाइनमध्येही मोठ्या प्रमाणात घोळ होणे, पूर्वापार तेच ते लाभार्थी पुन्हा योजनेत समाविष्ट होणे हे कोडेच आहे. ‘सबका साथ सबका विकास’ याचे घोडे नेमके कुठे अडकले, हे कळावयास मार्ग नाही.

याबाबत या भागाचे मंडळ कृषी अधिकारी जयदीप गिराम यांना विचारले असता महाडीबीटी पोर्टलवर जो शेतकरी ऑनलाइन अर्ज सादर करतो, त्याची योजनेसाठी निवड होते. या व्यतिरिक्त आम्हाला काहीही करता येत नाही, असे लोकमतशी बोलताना सांगितले.