शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

चढ्या दराने खतांची विक्री होण्याची शक्यता ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:33 IST

बीड : खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. मागील वर्षीप्रमाणे काही ठिकाणी खतांची कृत्रिम टंचाई ...

बीड : खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. मागील वर्षीप्रमाणे काही ठिकाणी खतांची कृत्रिम टंचाई करून जादा दराने खतांची विक्री केल्याचे समोर आले होते. यंदा खतांचा तुटवडा भासू नये यासाठी बीड कृषी विभागाकडून आवश्यकतेनुसार खताची मागणी करण्यात आली आहे. शासनाने ठरविलेल्या किमतीप्रमाणेच शेतकऱ्यांनी खताची खरेदी करावी व पक्की पावती घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

कृषी सेवा केंद्रांकडून कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी विक्रेत्यांवर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच कृषी विभागाच्या गुण नियंत्रण विभागाच्या वतीने वेळोवेळी तपासण्यादेखील केल्या जाणार आहेत. बोगस बियाण्यांप्रमाणे खतामध्ये देखील काळाबाजार होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे कृषी विभाग सतर्क असून, शेतकऱ्यांनी देखील सजग राहून खतांची व बियाणांची खरेदी करून फसवणूक व आर्थिक नुकसान टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खताच्या किमती कंपनीकडून निर्धारित करण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्याची किंमत कमी करण्याचा शासनाचा विचार असल्याची सूत्रांची महिती आहे. त्यामुळे शासनाकडून ठरलेल्या किमतीप्रमाणेच शेतकऱ्यांनी खतांची खरेदी करावी व पक्की पावती घ्यावे, असे आवाहन कृषी विभाग बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

खत विक्रेत्यांनी ई-पॉस मशीन बंधनकारक

जिल्ह्यातील सर्व परवानाधारक खत विक्रेत्यांना ई-पॉस मशीनद्वरे किंवा डेस्कटॉप प्रणालीचा वापर करणे

बंधनकारक असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अनुदानित खत विक्री करणे तसेच पक्की पावती देऊन एमआरपीप्रमाणे विक्री करणेदेखील बंधनकारक असणार आहे. दरम्यान, विक्री केंद्रासमोर खताचा साठा फलक व भावफलक लावून त्यामध्ये आवश्यकतेनुसार बदलदेखील करावे लागणार आहेत. शेतकऱ्यांना फसविण्याच्या दृष्टीने खत विक्रेत्यांनी कार्यवाही केली तर सबंधितांवर खत नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्याचे संकेत जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी बीड एस. डी. गरंडे यांनी दिले आहेत.

रासायनिक खतांचा संतुलित वापर करा

रासायनिक खतांचा शेतकऱ्यांनी भरमसाट वापर न करता संतुलित वापर करावा. तसेच रासायनिक खतांसोबत लिंबोळी पेंड व इतर जैविक खतांचा वापर केल्यास पिकांना चांगला फायदा होऊ शकतो.

प्रतिक्रिया

खत खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या काही तक्रारी असतील तर संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे तक्रार करावी त्यासंदर्भात चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.

दत्तात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड

खतांचा सरासरी वापर १ लाख ५१ हजार मेट्रिक टन

कृषी विभागाने केलेली मागणी २ लाख ७७ हजार मेट्रिक टन

शासनाने मंजूर केलेले आवंटन २ लाख १ हजार मेट्रिक टन

१६ एप्रिल २०२१ रोजीचा साठा ६८ हजार मेट्रिक टन

===Photopath===

170421\17_2_bed_25_17042021_14.jpg

===Caption===

खत पेरताना शेतकरी