शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

ग्रंथालयाचे अनुदान रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:32 IST

... बस सुरू करण्याची मागणी बीड : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून बससेवा बंद आहे. यामुळे परगावी, परजिल्ह्यात जाणाऱ्या नागरिकांची ...

...

बस सुरू करण्याची मागणी

बीड : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून बससेवा बंद आहे. यामुळे परगावी, परजिल्ह्यात जाणाऱ्या नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनाही बाजारपेठेत जाण्यासाठी मोठी अडचण होत आहे. १ जूनपासून कडक निर्बंध घालून बससेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

...

पेरणीची तयारी जोरात

कडा : आष्टी तालुक्यात कडा परिसरात शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीची तयारी केली आहे. कोरोनामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. उधार, उसनवारी करून शेतकऱ्यांनी शेती मशागत केली आहे. आता खते, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे.

....

पिण्याच्या पाण्याची टंचाई

आष्टी : तालुक्यातील डोंगरपट्ट्यातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. विहिरी, बोअरवेलची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे. जनावरांच्या पाणी, चाऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे आता सर्वांना पावसाची आस लागली आहे.

...

रानडुकरांचा उपद्रव वाढल्याने शेतकरी चिंतेत

पाटोदा : तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी यंदा भरपूर पाणी उपलब्ध असल्याने भुईमूग पिकाची लागवड केली होती; परंतु तालुक्यातील डोंगरपट्ट्यात रानडुकरांचा उपद्रव वाढल्याने एका रात्रीत शेतकरी भुईमूग पिके फस्त करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

...

रोजगार हमीची कामे सुरू करा

धानोरा : गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना लॉकडाऊन सुरू आहे. अनेकांना रोजगार मिळणे मुश्कील झाले आहे. यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लाॅकडाऊन उठताच रोजगार हमीची कामे सुरू करावीत, अशी मागणी होत आहे.

...

डासांमुळे आरोग्य धोक्यात

बीड : शहरात डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यात उकाडा वाढला आहे. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार होण्याची चिन्हे आहेत. पावसाळ्यापूर्वी नगर परिषदेने शहरात स्वच्छता मोहीम राबवावी, तसेच फवारणीची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

...

चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

धानोरा : परिसरात विहीर, बोअरवेलवरील मोटारी, केबल मोठ्या प्रमाणात चोरी जात आहे. अनेक शेतकऱ्यांचे केबल चोरी गेले आहे. किरकोळ कारणासाठी शेतकरी चोरीची तक्रार देण्यास जात नाहीत; परंतु आर्थिक नुकसान शेतकऱ्यांंना सहन करावे लागत आहे. या चोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.