शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

ग्रंथालयाचे अनुदान रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:32 IST

... बस सुरू करण्याची मागणी बीड : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून बससेवा बंद आहे. यामुळे परगावी, परजिल्ह्यात जाणाऱ्या नागरिकांची ...

...

बस सुरू करण्याची मागणी

बीड : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून बससेवा बंद आहे. यामुळे परगावी, परजिल्ह्यात जाणाऱ्या नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनाही बाजारपेठेत जाण्यासाठी मोठी अडचण होत आहे. १ जूनपासून कडक निर्बंध घालून बससेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

...

पेरणीची तयारी जोरात

कडा : आष्टी तालुक्यात कडा परिसरात शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीची तयारी केली आहे. कोरोनामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. उधार, उसनवारी करून शेतकऱ्यांनी शेती मशागत केली आहे. आता खते, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे.

....

पिण्याच्या पाण्याची टंचाई

आष्टी : तालुक्यातील डोंगरपट्ट्यातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. विहिरी, बोअरवेलची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे. जनावरांच्या पाणी, चाऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे आता सर्वांना पावसाची आस लागली आहे.

...

रानडुकरांचा उपद्रव वाढल्याने शेतकरी चिंतेत

पाटोदा : तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी यंदा भरपूर पाणी उपलब्ध असल्याने भुईमूग पिकाची लागवड केली होती; परंतु तालुक्यातील डोंगरपट्ट्यात रानडुकरांचा उपद्रव वाढल्याने एका रात्रीत शेतकरी भुईमूग पिके फस्त करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

...

रोजगार हमीची कामे सुरू करा

धानोरा : गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना लॉकडाऊन सुरू आहे. अनेकांना रोजगार मिळणे मुश्कील झाले आहे. यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लाॅकडाऊन उठताच रोजगार हमीची कामे सुरू करावीत, अशी मागणी होत आहे.

...

डासांमुळे आरोग्य धोक्यात

बीड : शहरात डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यात उकाडा वाढला आहे. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार होण्याची चिन्हे आहेत. पावसाळ्यापूर्वी नगर परिषदेने शहरात स्वच्छता मोहीम राबवावी, तसेच फवारणीची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

...

चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

धानोरा : परिसरात विहीर, बोअरवेलवरील मोटारी, केबल मोठ्या प्रमाणात चोरी जात आहे. अनेक शेतकऱ्यांचे केबल चोरी गेले आहे. किरकोळ कारणासाठी शेतकरी चोरीची तक्रार देण्यास जात नाहीत; परंतु आर्थिक नुकसान शेतकऱ्यांंना सहन करावे लागत आहे. या चोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.