शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना महामारीवर लिंबू, संत्री, मोसंबीचा उतारा; दरही वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:34 IST

बीड : कोराना महामारीवर उतारा म्हणून औषधोपचारांसोबतच लिंबू, संत्री, मोसंबी व इतर फळांचे सेवन केले जात असून, बाजारात मागील ...

बीड : कोराना महामारीवर उतारा म्हणून औषधोपचारांसोबतच लिंबू, संत्री, मोसंबी व इतर फळांचे सेवन केले जात असून, बाजारात मागील काही दिवसांपासून मागणी वाढली आहे. परंतु, आवक कमी होत असल्याने दरही वाढले आहेत. जिल्ह्यात महिनाभरापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. त्यामुळे प्रत्येकजण आरोग्याची काळजी घेताना दिसत आहेत. सी जीवनसत्त्व, तसेच बहुजीवनसत्त्वयुक्त फळांना मागणी आहे. शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी, पचनक्रिया व्यवस्थित राहण्यासाठी शक्तिवर्धक फळे बाजारात उपलब्ध आहेत. कोरोना काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लिंबूवर्गीय फळांना प्राधान्य दिले जात आहे. परंतु, मागील काही महिन्यांच्या तुलनेत आवक घटली असून, दरही कमालीचे वाढले आहेत. कोरोना व इतर आजारांपासून संरक्षण व्हावे, शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून ही फळे महाग झाली असली तरी खरेदीचा ओघ कायम आहे.

--------

फळांमध्ये ९० टक्के पाणी भरपूर जीवनसत्त्व असतात. शरीरास हवे असणारे सर्व घटक मिळतात. उन्हाळ्यात प्रामुख्याने टरबूज, खरबूज, मोसंबी अशा पाणीदार फळांचा आहारात समावेश असल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण व तापमान नियंत्रित राहते. सध्या कोरोनाच्या काळातही या फळांचा उपयोग उत्तम मानला जातो. मोसंबी, संत्री, द्राक्ष अशा सिट्रस फ्रुटमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. - डॉ. रितू गवते, फिजिओथेरेपिस्ट,बीड.

--------

लिंबूवर्गीय सर्व प्रकारची फळे जसे लिंबू, संत्रा, मोसंबी ही व्हिटॅमिन सी, कॅल्शियम व विविध रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी प्रभावी असल्यामुळे याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे, आणि हे खरे आहे. सर्व प्रकारची फळे याच प्रकारे पौष्टिक असतात व शक्तिवर्धक असतात. परंतु, कोरोना पार्श्वभूमीवर लिंबूवर्गीय फळांचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. - रामेश्वर चांडक, कृषी व आहार तज्ज्ञ, बीड.

----------

सी व्हिटॅमिनयुक्त फळे इम्युनिटी वाढवितात. रसदार फळांमुळे डिहायड्रेशन टाळता येईल. प्रतिकार शक्ती वाढते. बद्धकोष्ठता टाळता येते. फळांतील पोटॅशिअम शरीरातील प्रमाणावर नियंत्रण ठेवते. फळांतील ॲन्टीऑक्सिडंटमुळे ॲनिमियासारखे आजारही टळू शकतात. फळे घरी आणून स्वच्छ धुवून खावीत, काळजी घ्यावी.- डॉ. अनिल बारकूल, माजी अध्यक्ष आयएमए, बीड.

------------

कोरोनाबाधितांसाठी फळे महत्त्वाची आहेत. सी तसेच अन्य व्हिटॅमिन फळांमधून नैसर्गिकरीत्या मिळते. त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. मी दहा दिवस रुग्णालयात होतो, त्यावेळी फळांवर भर दिला. आजारपणात फळे मोठा आधार ठरली. -भगीरथ बियाणी, बीड.

-------

कोविडच्या काळात शक्तिवर्धक फळांमधून ऊर्जा मिळते, तसेच आजारांवर नियंत्रण राहते. दोन वेळा मोसमी फळांचे सेवन केले पाहिजे. शरीराला थंडावा मिळतो. कोरोना व तणावाच्या काळात फळे शरीरासाठी पौष्टिक आहेत. मी दररोज फळांचे सेवन करतो. - हसीन अख्तर, बीड.

----------------

फळे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल

मोसंबी ५० ७०, ८० १००

संत्री ४० ५० ८० १००

लिंबू ५० ६० ७० ८०

----------

जालना, पाचोड, बीडमधून मोसंबी, नागपूर, गंगानगर, विदेशांतून संत्री, तर लिंबू बीडमधून

जालना, पाचोड, तसेच बीड जिल्ह्यांतून मोसंबीची आवक होते. नागपुरी संत्रीची काही महिने आवक झाली. त्यानंतर राजस्थानातील गंगानगरहून किनू व सध्या विदेशातील माल्टा जातीची संत्रींची आवक आहे. लिंबू मात्र बीड जिल्ह्यातील उत्पादकांकडून आवक होतो.