शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीतूनच घडले नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:47 IST

बीड : ग्रामपंचायत ही भारतीय राजकारणाचा पाया आहे, नेतृत्व घडवणारी स्थानिक स्वराज संस्था आहे. केशरकाकू क्षीरसागर यांनी ग्रामपंचायत सदस्य, ...

बीड : ग्रामपंचायत ही भारतीय राजकारणाचा पाया आहे, नेतृत्व घडवणारी स्थानिक स्वराज संस्था आहे. केशरकाकू क्षीरसागर यांनी ग्रामपंचायत सदस्य, सरपंचापासून राजकीय जीवनाची कारकीर्द सुरू करून आमदार, तीन वेळा खासदार, अशी गरुडझेप घेत राजकारणात आपला ठसा उमटविला.

केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर, असे त्यांचे नाव असले तरी संपूर्ण राज्यात त्या काकू या टोपणनावानेच त्या ओळखल्या जात. जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या केशरकाकू यांनी जनसंपर्क वाढवत प्रस्थापितांविरुद्ध सर्व जाती-धर्मांना सोबत घेत राजकारणाच्या व्यासपीठावर समाजकारण केले. त्यांच्या या समाजकारणाच्या पायावर दुसऱ्या पिढीतील माजी मंत्री जयदत्त आणि बीडचे नगराध्यक्ष डाॅ. भारतभूषण क्षीरसागर राजकारणात यशस्वी झाले. आता बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, उपनगराध्यक्ष हेमंत, डाॅ. योगेश क्षीरसागर ही तिसरी पिढी यशस्वी होत आहे.

केशरकाकू यांनी लोकांची कामे करत जनसंपर्क एवढा वाढवला होता की, १९७२ साली त्या चौसाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार होत त्यांनी राज्याच्या राजकारणात प्रवेश केला. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या त्या कट्टर समर्थक होत्या. राजुरी येथे गजानन सहकारी साखर कारखाना काढून त्या सहकार क्षेत्रात उडी घेत चेअरमन झाल्या. चेअरमन होणाऱ्या त्या राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या महिला होत्या. या गोष्टीचे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना खूप कौतुक वाटायचे. त्यांनी या साखर कारखान्यास सर्वतोपरी मदत केली. अशा प्रकारे त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा निर्माण केला होता.

केशरकाकूंची जिल्ह्यावरील पकड पाहता त्यांना काँग्रेस (आय)ने १९८० साली बीड लोकसभा मतदारसंघांची उमेदवारी दिली. जवळपास ६७ हजारांच्या फरकाने निवडणूक जिंकत त्यांनी पक्षाचा विश्वास सार्थ ठरविला. त्यानंतर त्यांनी १९८४ आणि १९८९ ची लोकसभा निवडणूकही जिंकली. त्यांनी आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात अनेक संसदीय समित्यावर प्रतिनिधित्व केले. अनेक शैक्षणिक संस्था काढून विद्याज्ञानासोबतच हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. थोडक्यात सांगायचे झाल्यास ग्रामपंचायत निवडणूक ही राजकारणाचा पाया असून, नेतृत्वाची संधी देणारी स्थानिक स्वराज संस्था आहे.

केशरकाकू यांनी १९५९ ते ६२ या काळात बीड तालुक्यातील नवगण राजुरी ग्रामपंचायत सदस्यांपासून राजकीय कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. याच काळात त्या राजुरीच्या सरपंचही झाल्या. त्यानंतर त्यांनी मागे वळून न पाहता त्या राजकारणात यश मिळवत गेल्या. १९६९-७८ मध्ये त्या बीड पंचायत समितीच्या सभापती झाल्या.