शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

सरत्या वर्षात वरुणराजाची कृपा, दुष्काळ पुसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:31 IST

शिरूर कासार : पाहता पाहता २०२० या वर्षाने काही सकारात्मक तर निराशाजनक घटना दाखवल्या. त्यात दहा वर्षांनंतर तालुक्याला सरत्या ...

शिरूर कासार : पाहता पाहता २०२० या वर्षाने काही सकारात्मक तर निराशाजनक घटना दाखवल्या. त्यात दहा वर्षांनंतर तालुक्याला सरत्या वर्षाने जलसमृद्धी प्रदान केली. पावसाने सरासरी ओलांडून सर्व जलाशये ओसंडून वाहिले, असे विलोभनीय चित्र या वर्षाने दाखवले. मात्र कोरोनासारख्या महामारीने माणूस माणसापासून दूर केला. इतकेच नाही तर सुख-दुःखातही सहभागी होता आले नाही. लग्नाच्या अक्षदा व आशीर्वाद जसे घरबसल्याच द्यावे लागले, तसे अंत्यविधीला देखील जाऊ दिले नाही या वर्षाने.

या महामारीला अटकाव व काबू मिळवण्यासाठी महसूल, आरोग्य, पोलीस, शिक्षक, पंचायत समिती यासह सर्वांनाच घाम फोडला. नियमित कामाव्यतिरिक्त कामाचा अनुभव या वर्षाने दिला.

तालुक्याची पावसाची सरासरी ५९९.४ मि.मी. इतकी असताना या वर्षाने ती शिरूर ८३३.७५ मि.मी., रायमोहा ६६३.५ तर तिंतरवणी परिमंडळात ७४३.२५ मि.मी. इतक्या अधिक पटीने ओलांडली. सिंदफणा, उथळा, बेलपारा, घाटशिळा मध्यम प्रकल्पांसह साठवण तलाव, लघू प्रकल्प, नद्या, नाले, विहिरी, बोअर तुडुंब भरले. पावसामुळे नुकसान झाले; परंतु सतत पाणीटंचाई असणाऱ्या या तालुक्याला मावळत्या वर्षाने जलसमृद्धी प्रदान केली.

अवकाळी व अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून जवळपास बावीस कोटी रुपये या वर्षात वाटप केल्याची माहिती तहसीलदार श्रीराम बेंडे यांनी दिली.

पोलीस स्टेशन हद्दीत ६९ गावांत वर्षभरात पाच बलात्कार आणि सात विनयभंग, एक खून, सतरा मारामाऱ्या अशा अप्रिय काळिमा फासणाऱ्या घटना घडल्या, तर चोरीचे १४ गुन्हे, दखलपात्र गुन्हे ११८, जुगार मटका क्लब ५७ गुन्हे, दारूबंदी ६६, ॲट्राॅसिटी ४ गुन्हे दाखल व अकस्मात ४८ मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे पो. नि. सिद्धार्थ माने यांनी सांगितले. कोरोना संकटात नित्य बंदोबस्त करत असतानाच पोलीस संरक्षण कार्यात रात्रंदिवस काम करत होते.

अतिसंवेदनशील काळात बाधित तपासणी, त्यांच्या नोंदी, उपचार करत आरोग्य विभाग तारेवरची कसरत करत होता. तालुक्यात ६५८ बाधित रुग्ण निघाले, तर दुर्दैवाने बारा लोकांना प्राण यावर्षी गमवावा लागला. शिवाय वर्षभरात ४४ लोकांना सापाने डंख मारला होता. यातून मात्र सर्व सहीसलामत उपचारानंतर सुटले. तालुका आरोग्य अधिकारी अशोक गवळी, नोडल ऑफिसर शिवनाथ वाघमारे, राजश्री जाधवर, डॉ. सुहास खाडे, डॉ. किशोर खाडे, डॉ. सानप यांच्यासह सर्व आरोग्य विभाग, आशा, सिस्टर, आरोग्य सेवक, नगरपंचायत, ग्रामसेवक, तलाठी यांनी परिश्रम घेतले. शैक्षणिक क्षेत्रात मात्र मावळत्या वर्षाने शाळेला कुलूप लावले असल्याने शिक्षक व विद्यार्थी यांच्यात प्रदीर्घ काळ दुरावा निर्माण झाला होता. ऑनलाइन शिक्षण दिले जात होते. तालुक्यात प्राथमिक शाळेत ३७७२ मुले तर ४०४४ मुली प्रवेशित असून, माध्यमिकमध्ये मुलांची संख्या ९१३ व मुली ६१२ असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी जमीर शेख यांनी दिली. अध्यापन करण्यासाठी ४०२ शिक्षक व १३३ शिक्षिका प्राथमिकसाठी तर माध्यमिकसाठी शिक्षक ३६ व शिक्षिका १७ शिक्षण कार्यात आहेत. हा सर्व वर्ग वेगवेगळ्या कामात लाॅकडाउनमध्ये काम करत होता. या वर्षात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेने तालुक्याचे नाव झळकले. या स्पर्धेत हरियाणा संघ लक्षणीय ठरला तरी जिल्ह्यातील संघाने चांगलीच बाजी मारल्याचेही दाखवून दिले.

संकटकाळात सामाजिक बांधिलकी समजावून घेत गरिबांसाठी व गरजूंसाठी अनेक संस्था तसेच वैयक्तिक हात सरसावले होते. त्यात शांतीवन संस्थेचे दीपक नागरगोजे यांनी गरजूंना दोन घास दोन वेळेस भरवण्याचे मोलाचे काम केले.