शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

कृषी विज्ञान केंद्राचा महिला शेतकरी मेळावा - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:30 IST

अंबाजोगाई : दिनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई यांच्या माध्यमातून ‘कृषीपूरक उद्योग’ या विषयावर महिला शेतकरी मेळाव्याचे आयोजन ...

अंबाजोगाई : दिनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई यांच्या माध्यमातून ‘कृषीपूरक उद्योग’ या विषयावर महिला शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. उपेंद्र कुलकर्णी (प्रकल्पप्रमुख, दिनदयाल शोध संस्थान, बीड), श्रद्धा देशमुख (संचालक, उत्कर्ष लर्निंग सेंटर, सगरोळी, जिल्हा नांदेड), माधुरी रेवणवार (शास्त्रज्ञ, गृहविज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी), संध्या कुलकर्णी (सामाजिक कार्यकर्त्या, औरंगाबाद), डॉ. प्रतिभा मिसाळ (मधुमेहतज्ज्ञ, लातूर) व डॉ. सौरभ शर्मा (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र) यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. शर्मा यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक करताना सांगितले की, कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यावर नेहमीच भर देण्यात येत आहे. महिलांनी शेतीसोबतच कृषीपूरक व्यवसायामध्ये प्रशिक्षण घेऊन व्यवसाय सुरू करावा, त्याची माहिती घेऊन उद्योगांमध्ये यश संपादन करावे, यासाठीच या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. ‘मधुमेह समज-गैरसमज’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. मिसाळ म्हणाल्या की, शरीरात इन्सुलिन महत्त्वाचा घटक आहे. इन्सुलिनच्या असमतोलामुळे मधुमेह हा आजार होतो. मधुमेही व्यक्तीने औषधांसोबत व्यायाम व आहाराची पथ्ये पाळली पाहिजेत. गृहविज्ञान शास्त्रज्ञ रेवनवार यांनी महिलांशी संवाद साधताना सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा या महिला आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला अग्रस्थानी आहेत. प्रत्येक महिलेला अर्थार्जन करणे आज गरजेचे झाले आहे. त्यामुळे शेतीसोबतच इतर जोडधंदा करणे आवश्यक आहे.

संध्या कुलकर्णी यांनी महिला शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, महिलांनी स्वतःच्या आवडीनुसार उद्योग सुरू करावे. ग्रामीण भागातील महिला खूप मेहनत घेतात. माझ्या गावात राहून मी काय उद्योग करू शकते, याचा त्यांनी विचार केला पाहिजे.

या मेळाव्याच्या प्रमुख मार्गदर्शक श्रद्धा देशमुख यांनी सांगितले की, त्यांनी सोयाबीन प्रक्रियेपासून उद्योगाला सुरुवात केली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सोयाबीन प्रक्रिया यंत्र मिळाले. जिल्हा उद्योग केंद्रात नोंदणी केली. उत्कर्ष लर्निंग सेंटरच्या माध्यमातून दरवर्षी एक हजारपेक्षा जास्त महिला प्रशिक्षण घेतात. प्रत्येक महिला स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे यासाठी प्रयत्न केला जातो.

या मेळाव्याचे अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. कुलकर्णी यांनी उपस्थित महिला शेतकऱ्यांना केंद्राला वारंवार भेट देण्याचे आवाहन केले. केंद्राने उपलब्ध केलेल्या संसाधनांचा लाभ घ्यावा, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रातील गृहविज्ञान शास्त्रज्ञ रोहिणी भरड यांनी केले तर कृषी अभियंता प्रमोद रेणापूरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. केज, अंबाजोगाई व परळी तालुक्यातून मोठ्या संख्येने महिला शेतकरी या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या.