शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोविड काळ हा असंघटित कामगारांसाठी अंधारयुगच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:35 IST

बीड : जगावर आलेले कोरोनारूपी संकट मार्च-२०२० पासून भारतात आले. यामुळे केलेल्या लाॅकडाऊनचे सर्व क्षेत्रांवर गंभीर परिणाम झाले. ...

बीड : जगावर आलेले कोरोनारूपी संकट मार्च-२०२० पासून भारतात आले. यामुळे केलेल्या लाॅकडाऊनचे सर्व क्षेत्रांवर गंभीर परिणाम झाले. असंघटित क्षेत्रातील तसेच रोजंदारीवर काम करणारा कामगार अक्षरशः हताश झाला. कोरोनाने त्यांचा रोजगार हिरावला. त्यांच्यासाठी कोरोना काळ म्हणजे एक प्रकारचे अंधारयुगच होते, असे प्रतिपादन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता प्रोफेसर डाॅ. वाल्मीक सरवदे यांनी केले.

बलभीम महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने ‘कोरोना महामारीचा असंघटित क्षेत्र व रोजंदारी कर्मचाऱ्यांवर झालेला परिणाम’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र पार पडले. उद‌्घाटक म्हणून डॉ. सरवदे हे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.वसंत सानप हे होते, तर उपप्राचार्य डाॅ. संतोष उंदरे, उपप्राचार्य डाॅ. गणेश मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.

डाॅ. सरवदे यांनी कोविडमुळे संपूर्ण जगातील विविध क्षेत्रांवर कसा प्रतिकूल परिणाम झाला, याची मांडणी करून भारतातील असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या जीवनमानावर भाष्य केले. डॉ. वसंत सानप म्हणाले, कोरोनाने जगातील सर्व क्षेत्रांना प्रभावित केले असून, अजूनही हे संकट दूर झाले नाही. भारताच्या इतिहासातील सर्वांत वाईट काळ म्हणून कोरोना काळ गणला जाईल, असे ते म्हणाले.

पहिल्या सत्रात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेचे विभागप्रमुख डाॅ. सय्यद अझरुद्दीन यांनी कोविडमुळे असंघटित क्षेत्रावर कशा पद्धतीने आर्थिक संकट निर्माण झाले, याचा आढावा घेतला. दुसऱ्या सत्रात हैदराबाद येथील विवेकवर्धिनी महाविद्यालयाचे प्रा.डाॅ. कनकीपती राव यांनी कोविडमुळे सर्वांत जास्त हानी रोजंदारी कामगारांची झाली. कसलेही काम नसल्याने त्यांना उपाशीपोटीही राहावे लागल्याचे नमूद केले. तिसऱ्या सत्रात ओरिसा येथील रामदेवी महिला विद्यापीठातील वाणिज्य विभागाचे प्रा.डाॅ. सबतकुमार दिगल यांनी कोविड काळात छोट्या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे जीवन खूप वाईट होते. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्याचे स्पष्ट केले. समारोपप्रसंगी उपप्राचार्य डाॅ. गणेश मोहिते म्हणाले, कोविडने समाजातील सर्व घटकांना प्रभावित केले असून सामान्य माणूस आर्थिक संकटात सापडला आहे.

प्रास्ताविक वाणिज्य विभागप्रमुख डाॅ. ईश्वर छानवाल यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एन.बी. मुदिराज यांनी केले. डाॅ. वैशाली कुटे यांनी आभार मानले. या वेबिनारला देशभरातून १७० प्राध्यापक सहभागी झाले होते. यशस्वीतेसाठी डाॅ. भारत दहे यांच्यासह वाणिज्य विभागाच्या प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.

290721\29bed_8_29072021_14.jpg